शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अधिवेशनाचा वार्षिक ‘फार्स’ बंद करा, आशिष देशमुख यांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:08 IST

नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता आ. आशिष देशमुख यांनी सरकारला ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे.

नागपूर : नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता आ. आशिष देशमुख यांनी सरकारला ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कालाव२धीवरून दुसरा ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. नागपूर कराराचा सन्मान करत हिवाळी अधिवेशन सहा आठवड्यांचे करावे. अन्यथा नागपूर अधिवेशनाचा वार्षिक ‘फार्स’ तरी बंद करावा, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यापूर्वी नागपूर ही मध्यप्रांताची राजधानी होती. राजधानी मुंबई होणार असल्यामुळे इकडचे प्रश्न सोडवण्यात अडचणी येतील हे ओळखून तत्कालीन नेत्यांनी नागपूर करार केला. त्यानुसार हे अधिवेशन सुरू झाले आहे. परंतु या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न सुटत नाहीत. विदर्भाच्या विकासासाठी भाजपची असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हे अधिवेशन किमान सहा आठवडे चालविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.या मागणीची दखल घेतली जाणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घ्यावासभागृहातील गोंधळ आणि सभागृहाबाहेरचे मोर्चे यातून जनतेचे मूळ प्रश्न सुटत नाहीत. जर सभागृह दीड महिना चालले तर नक्कीच विदर्भाच्या हिताचे निर्णय होतील. दीर्घकाळ अधिवेशन चालणे विदर्भाच्या हिताचे आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील जाणतात. त्यामुळे त्यांनीच यासंदर्भात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७