शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

धर्मगुरूंनी स्वीकारला गृह जीवनाकडे परतण्याचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:09 IST

योगेंद्र शंभरकर नागपूर : समाजात नव्या पिढीला धर्म, संस्कार व कर्तव्याची जाणीव करून देण्यात धर्मगुरूंची भूमिका महत्त्वाची असते. याप्रमाणेच ...

योगेंद्र शंभरकर

नागपूर : समाजात नव्या पिढीला धर्म, संस्कार व कर्तव्याची जाणीव करून देण्यात धर्मगुरूंची भूमिका महत्त्वाची असते. याप्रमाणेच बाैद्ध भिक्खू घर, कुटुंबाचा त्याग करून समाजसेवा आणि धम्म प्रचाराच्या कार्यासाठी विहारात वास्तव्य करतात. मात्र काेराेना महामारीचे सावट धम्म प्रचाराच्या कार्यावरही पसरले आहे. लाॅकडाऊनमुळे शहरात अनेक भिक्खू संघाशी जुळलेल्या भिक्खूंचे धम्म प्रसारासाठी बाहेर जाणे बंद झाले आहे. दुसरीकडे उपासक-उपासिकांचेही विहारात येणेही बंद झाले आहे. अशा परिस्थितीत या भिक्खूंची विचारपूस करणारा कुणी नाही. त्यामुळे भिक्खूंसमाेर जीवन कंठण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे अनेक भिक्खू त्यांच्या घराकडे परतले आहेत तर काही परतण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे.

प्रसंग १ : आराेग्य समस्यांनी वाढविली चिंता

उत्तर नागपुरातील एका माेठ्या बुद्धविहारातील ७२ वर्षीय भन्तेजी काेराेना काळात आपल्या घराकडे परतले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती बिघडली हाेती. या काळात त्यांची देखभाल करणारे कुणी नव्हते. याच चिंतेमुळे ते घरी परतल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रसंग दुसरा : मुलीच्या घरी गेले

याचप्रमाणे नारा रिंग राेडवरील एका विहारातील ७० वर्षीय भदन्त संघपाल यांचेही जीवनयापन करणे कठीण झाले हाेते. त्यामुळे त्यांनाही मुलीच्या घरी परत जावे लागले.

प्रसंग तिसरा : तरुण भिक्खूही परतले

स्थानिकांच्या माहितीनुसार काैशल्यानगर येथील विकारात राहून काही तरुण भदन्त धम्मप्रसार करीत हाेते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना घराकडे परतावे लागले.

काेराेनाने घेतला अनेक भिक्खूंचा बळी

शहरात जवळपास ८०० बुद्धविहार आहेत. यामध्ये बहुतेक वृद्ध भन्ते सेवा करीत आहेत. मात्र त्यांच्या उपचाराचा, औषधांचा खर्च करण्याची जबाबदारी घेणाऱ्या उपासकांची संख्या नगण्य आहे. नुकतेच गिट्टीखदान व सम्यकनगर येथील विहारात राहणाऱ्या काही भिक्खूंचे काेराेनामुळे निधन झाले.

समाजाला पुढे यावे लागेल

ज्येष्ठ भदन्त नागवंश म्हणाले, समाज प्रबाेधन व धर्म प्रचारासाठी प्रत्येक समाजाचे धर्मगुरू, पुराेहित आपला गृहत्याग करून समाजसेवेसाठी कार्य करतात. बाैद्ध भिक्खूंचेही तसेच आहे. या भिक्खूंचे जीवन उपासकांच्या दानावरच अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांनी थाेडी का हाेईना पण यथाशक्ती मदत करण्याची गरज आहे.