शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ केवळ घोषणाच? नागपूर रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांकडून नियमांची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 10:31 IST

भाजपाच्या नेत्यांकडून नियमांचे पालन, ‘स्वच्छ भारत’ यासंदर्भात मोठमोठे बौद्धिक देण्यात येते. विविध कार्यक्रम आयोजित करून त्याचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आज अजनी रेल्वेस्थानकात दिसून आले.

ठळक मुद्देसर्रासपणे ओलांडत होते रेल्वे रुळअजनी रेल्वे स्टेशन की कचरा घर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाच्या नेत्यांकडून नियमांचे पालन, ‘स्वच्छ भारत’ यासंदर्भात मोठमोठे बौद्धिक देण्यात येते. विविध कार्यक्रम आयोजित करून त्याचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आज अजनी रेल्वेस्थानकात दिसून आले. ‘सोशल मीडिया’वर ‘बौद्धिक’ देण्यात आघाडीवर असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय रेल्वे

च्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आमदार, वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समोर हा प्रकार सुरू असताना कुणीही त्यांना थांबविण्याची तसदीदेखील घेतली नाही. सकाळी ८.१५ वाजता नियोजित रेल्वेगाडी निघून गेल्यामुळे मुंबई येथे पक्षाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला जाणारे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते पाच तासांहून अधिक वेळ अजनी रेल्वेस्थानकावर अडकून पडले होते. या कालावधीत कार्यकर्त्यांकडून शिस्तीची अपेक्षा होती. परंतु साधे कचरापेटीत कचरा टाकण्याचे सौजन्यदेखील काही कार्यकर्त्यांनी दाखविले नाही. रेल्वेकडून विविध माध्यमातून रेल्वेट्रॅक ओलांडणे नियमबाह्य आहे, याची जागृती करण्यात येते. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना साधा रेल्वेपूल ओलांडून जाणे जीवावर येत होते व अनेक कार्यकर्ते थेट प्लॅटफॉर्मवरुन रेल्वेरुळावरच जाताना दिसून आले. एका प्लॅटफॉर्मवरुन दुसरीकडे पाण्याच्या पाऊचच्या पिशव्या पोहोचविताना तर पूर्ण ‘ट्रॅक’वर डझनाहून अधिक कार्यकर्त्यांनी शृंखलाच तयार केली होती.

‘आरपीएफ’च्या सूचनेकडे ‘भाजयुमो’ कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष४रेल्वेरुळ ओलांडणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना ‘आरपीएफ’तर्फे असे न करण्याची सूचना करण्यात आली. मात्र काही कार्यकर्त्यांनी ‘तुम अपना काम करो’ असे म्हणत या सूचनेकडे दुर्लक्ष केले. यावेळी ‘भाजयुमो’च्या शहर अध्यक्ष शिवानी दाणी यांनीदेखील याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांना नियम पाळण्याबाबत आग्रह केला नाही.प्लॅटफॉर्मवर कचराच कचरास्वच्छ भारत मोहिम देशभरात राबविण्यात येत असून नागपुरातदेखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यात पुढाकार घेतला होता. मात्र त्यांच्याकडून अजनी रेल्वेस्थानकावर प्रत्यक्षात कृती मात्र दिसून आली नाही. जागोजागी पिण्याच्या पाण्याचे पाऊच, चिप्स-बिस्किटांची रिकामी पाकिटे पडली होती. विशेष रेल्वेगाडीवर पक्षाचे स्टीकर्स व बॅनर्स लावण्यात आले होते. त्याचा कचरादेखील प्लॅटफॉमवरच फेकण्यात आला होता.

टॅग्स :BJP rally in Mumbaiभाजपाचा महामेळावा 2018