शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यांची साफसफाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सत्रापूर उपसा सिंचन याेजनेंतर्गत तालुक्यात कालव्याची निर्मिती करण्यात आली. काेरडवाहू क्षेत्र ओलितखाली यावे, हा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : सत्रापूर उपसा सिंचन याेजनेंतर्गत तालुक्यात कालव्याची निर्मिती करण्यात आली. काेरडवाहू क्षेत्र ओलितखाली यावे, हा या मागील मुख्य उद्देश हाेता. त्यामुळेच तालुक्यातील साेनेघाट, मुसेवाडीपर्यंत याेजनेचा विस्तार करीत या भागात लहान कालवे बनविण्यात आले. परंतु या कालव्यांच्या स्वच्छतेकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत कालव्यांमध्ये कचरा व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कालव्यांची साफसफाई करा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

पावसाळ्यापूर्वी कालव्याच्या पाटचऱ्यांची दुरुस्ती तसेच साफसफाई करणे नितांत गरजेचे आहे. कालव्यामध्ये कचरा व झाडेझुडपे वाढली आहे. त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाेहचत नाही. शिवाय, कालवे बनविताना उताराकडे व्यवस्थित लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे वरच्या भागात पाणी चढत नाही. यामुळे काही शेतकऱ्यांना पाणी मिळते, तर काहींना मिळत नाही. त्यामुळे कालव्यांचे खाेलीकरण करणे गरजेचे झाले आहे.

या भागातील बहुतांश शेतकरी धान पीक घेतात. ऐन धान राेवणीदरम्यान वीज बिलापाेटी वीज पुरवठा खंडित केला जाताे. महत्त्वाच्या वेळी पाणी पुरवठा बंद हाेताे. त्यामुळे प्रशासनाने पाण्यासाठी आधीच उपाययाेजना करून ठेवावी. नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. मागील वर्षी तुडतुडा व इतर राेगांमुळे धान पीक उद्ध्वस्त झाले. यात शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकडील विद्युत बिल माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

....

पुलाचे बांधकाम करा

सत्रापूरपासून पेंच प्रकल्पावर ही उपसा सिंचन याेजना सुरू करण्यात आली. साेनेघाट, मुसेवाडीपर्यंत याेजनेचा विस्तार आहे. याेजनेंतर्गत या भागात लहान कालव्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांच्या वहिवाटीबाबत काेणताही विचार झालेला नाही. शेतात ये-जा करण्यासाठी काेणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचण निर्माण हाेते. त्यामुळे या कालव्यावर किमान ३०० मीटरपर्यंत एका पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.