शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कालव्यांची साफसफाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सत्रापूर उपसा सिंचन याेजनेंतर्गत तालुक्यात कालव्याची निर्मिती करण्यात आली. काेरडवाहू क्षेत्र ओलितखाली यावे, हा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : सत्रापूर उपसा सिंचन याेजनेंतर्गत तालुक्यात कालव्याची निर्मिती करण्यात आली. काेरडवाहू क्षेत्र ओलितखाली यावे, हा या मागील मुख्य उद्देश हाेता. त्यामुळेच तालुक्यातील साेनेघाट, मुसेवाडीपर्यंत याेजनेचा विस्तार करीत या भागात लहान कालवे बनविण्यात आले. परंतु या कालव्यांच्या स्वच्छतेकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत कालव्यांमध्ये कचरा व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कालव्यांची साफसफाई करा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

पावसाळ्यापूर्वी कालव्याच्या पाटचऱ्यांची दुरुस्ती तसेच साफसफाई करणे नितांत गरजेचे आहे. कालव्यामध्ये कचरा व झाडेझुडपे वाढली आहे. त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाेहचत नाही. शिवाय, कालवे बनविताना उताराकडे व्यवस्थित लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे वरच्या भागात पाणी चढत नाही. यामुळे काही शेतकऱ्यांना पाणी मिळते, तर काहींना मिळत नाही. त्यामुळे कालव्यांचे खाेलीकरण करणे गरजेचे झाले आहे.

या भागातील बहुतांश शेतकरी धान पीक घेतात. ऐन धान राेवणीदरम्यान वीज बिलापाेटी वीज पुरवठा खंडित केला जाताे. महत्त्वाच्या वेळी पाणी पुरवठा बंद हाेताे. त्यामुळे प्रशासनाने पाण्यासाठी आधीच उपाययाेजना करून ठेवावी. नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. मागील वर्षी तुडतुडा व इतर राेगांमुळे धान पीक उद्ध्वस्त झाले. यात शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकडील विद्युत बिल माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

....

पुलाचे बांधकाम करा

सत्रापूरपासून पेंच प्रकल्पावर ही उपसा सिंचन याेजना सुरू करण्यात आली. साेनेघाट, मुसेवाडीपर्यंत याेजनेचा विस्तार आहे. याेजनेंतर्गत या भागात लहान कालव्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांच्या वहिवाटीबाबत काेणताही विचार झालेला नाही. शेतात ये-जा करण्यासाठी काेणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचण निर्माण हाेते. त्यामुळे या कालव्यावर किमान ३०० मीटरपर्यंत एका पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.