शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सर्व कारंजे सुरू असल्याचा दावा : मनपाचा उघडपणे खोटारडेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:34 IST

शहराला सुंदर करण्यासाठी २०१६ पासून काही ठिकाणी कारंजे लावण्यात आले. परंतु त्यातील अनेक कारंजे बंद आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मनपाने सर्वच कारंजे सुरू असल्याचा माहितीच्या अधिकारात दावा केला आहे.

ठळक मुद्देकोटींचा निधी पाण्यात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ असे मोठमोठे दावे नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात येतात. मात्र कचरा रस्त्यांवर पडलेला असल्यामुळे स्वच्छतेच्या नावाने बोंब तर आहेच. दुसरीकडे सुंदर नागपूरसंदर्भातदेखील अनास्थाच दिसून येत आहे. शहराला सुंदर करण्यासाठी २०१६ पासून काही ठिकाणी कारंजे लावण्यात आले. परंतु त्यातील अनेक कारंजे बंद आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मनपाने सर्वच कारंजे सुरू असल्याचा माहितीच्या अधिकारात दावा केला आहे. यामुळे मनपाचे अधिकारी शहराच्या सौंदर्यीकरणाबाबत खरोखरच किती गंभीर आहेत व वास्तविक परिस्थितीची किती जाण आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून मनपाचा खोटारडेपणाच उघड झाला आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे विचारणा केली होती. शहरात २०१६-१७ पासून पाण्याची किती कारंजे तयार करण्यात आले, यापैकी किती कारंजे बंद आहेत, कारंजे ‘मेन्टेन’ करण्यासाठी कंत्राटदारांना किती रक्कम देण्यात आली, तलावांतील कारंज्याची काय स्थिती आहे. मनपातर्फे मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१६-१७ या कालावधीत नागपुरात १३ ठिकाणी कारंजे बसविण्यात आले. यात सद्गुरु नगर उद्यान, महालक्ष्मी नगर, महात्मा फुले उद्यान, जगन्नाथ स्वामी मंदिराजवळ, शारदा चौकातील हनुमान मंदिराजवळ, गांधीबाग उद्यान, गांधीसागर तलाव, दर्शन कॉलनी उद्यान, शनिवारी क्वॉर्टर्स, रामपेठ, बडकस चौक, विवेकानंद स्मारक येथील कारंज्यांचा समावेश आहे. ‘लोकमत’ने या ठिकाणांची पाहणी केली असता बऱ्याच ठिकाणी कारंजे सुरूच नसल्याची बाब समोर आली. कारंजे बसविण्यासाठी ९५ लाख ७४ हजार ७६४ रुपये खर्च करण्यात आले तर कारंजांच्या देखरेखीसाठी व दुरुस्तीसाठी २०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीत १४ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु जर कारंजे दुरुस्त झाले तर मग अनेक कारंजे बंद का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तलावांतील कारंजे बंदशहरातील फुटाळा तलाव व गांधीसागर तलाव येथे गाजावाजा करुन कारंजे लावण्यात आले होते. मात्र हे दोन्ही कारंजे बंदच असल्याचे दिसून आले. मनपाने हे दोन्ही कारंजे बंद असल्याचे माहिती अधिकारात नमूद केले आहे, मात्र याचे नेमके कारण मात्र स्पष्ट केलेले नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका