शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

रामनगरचे नागरिक तलाव, गडरलाईनच्या दुर्गंधीने त्रस्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:07 IST

नागपूर : मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरातील रामनगर येथील नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. नाईक तलाव, लेंडी तलावाची दुर्गंधी, ...

नागपूर : मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरातील रामनगर येथील नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. नाईक तलाव, लेंडी तलावाची दुर्गंधी, गडरलाईनच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने या परिसरात सोयीसुविधा उपलब्ध करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

नाईक तलावाची दुर्गंधी

नाईक तलावाची अवस्था अतिशय खराब झाली आहे. तलावात गडरलाईनचे पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तलावाची सफाई करण्यात येत नाही. तलावाला लावलेली लोखंडाची ग्रील असामाजिक तत्त्वांनी चोरून नेली आहे. तलावाच्या परिसरात असामाजिक तत्त्व जुगार खेळणे, दारू पिणे असे गैरप्रकार करतात. गार्डनच्या परिसरात लाईट नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होते. परिसरातील नागरिक तलावात कचरा टाकतात. त्यामुळे या तलावाची सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

गडरलाईनच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त

रामनगरमधील गडरलाईन नेहमीच चोक होते. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहते. या भागात नेहमीच दुर्गंधी राहते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात गडरलाईनचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे त्यांना मनस्ताप होतो. महापालिकेने या भागातील गडरलाईनची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

लेंडी तलावात झाले अतिक्रमण

रामनगरला लागूनच लेंडी तलाव आहे. हा तलाव पूर्णपणे बुजला आहे. या तलावाच्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. पावसाळ्यात या तलावाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. याशिवाय अनेक नाल्यांचे घाण पाणी लेंडी तलावात सोडण्यात येत असल्यामुळे, या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लेंडी तलावावर नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटवून या तलावाची सफाई करण्याची तसेच तलावात सोडण्यात येणारे नाल्याचे पाणी बंद करण्याची गरज आहे.

नाईक तलावाची सफाई करावी

नाईक तलावाचे पाणी घाण झाल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाईक तलावाची सफाई करण्याची गरज आहे.

-किशोरीलाल भवर

असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा

असामाजिक तत्त्व नाईक तलावाच्या परिसरात जुगार खेळणे, दारू पिणे असे गैरप्रकार करतात. त्यामुळे पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची नागरिकांची मागणी आहे.

-सुनिता डोंगरे

गडरलाईन दुरुस्त करावी

रामनगरात गडरलाईन नेहमीच चोक होते. घाण पाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने गडरलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.

-प्रभा सोनकुसरे

गार्डनमध्ये लाईट, ग्रीलची व्यवस्था करावी

नाईक तलावाशेजारील गार्डनमध्ये लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार राहतो. त्यामुळे लहान मुलांची गैरसोय होते. तलावाला लावलेली लोखंडाची ग्रील चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्यामुळे गार्डनमध्ये लाईट, तलावाला लोखंडी ग्रीलची व्यवस्था करावी.

-चेतना पितंबरा, नागरिक

लेंडी तलाव स्वच्छ करावा

लेंडी तलावात नाल्याचे घाण पाणी सोडण्यात येते. पावसाळ्यात तलावाला पूर येऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरते. त्यामुळे लेंडी तलाव स्वच्छ करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

-पिंकी ठवकर, नागरिक

नाईक तलावात कचरा टाकू नये

नाईक तलावातील पाणी घाण झाले आहे. अनेक नागरिक या तलावात कचरा आणून टाकत असल्यामुळे तलावाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून तलावाची सफाई करण्याची गरज आहे.

-श्रावण पारधी