शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

रामनगरचे नागरिक तलाव, गडरलाईनच्या दुर्गंधीने त्रस्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:07 IST

नागपूर : मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरातील रामनगर येथील नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. नाईक तलाव, लेंडी तलावाची दुर्गंधी, ...

नागपूर : मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरातील रामनगर येथील नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. नाईक तलाव, लेंडी तलावाची दुर्गंधी, गडरलाईनच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने या परिसरात सोयीसुविधा उपलब्ध करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

नाईक तलावाची दुर्गंधी

नाईक तलावाची अवस्था अतिशय खराब झाली आहे. तलावात गडरलाईनचे पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तलावाची सफाई करण्यात येत नाही. तलावाला लावलेली लोखंडाची ग्रील असामाजिक तत्त्वांनी चोरून नेली आहे. तलावाच्या परिसरात असामाजिक तत्त्व जुगार खेळणे, दारू पिणे असे गैरप्रकार करतात. गार्डनच्या परिसरात लाईट नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होते. परिसरातील नागरिक तलावात कचरा टाकतात. त्यामुळे या तलावाची सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

गडरलाईनच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त

रामनगरमधील गडरलाईन नेहमीच चोक होते. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहते. या भागात नेहमीच दुर्गंधी राहते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात गडरलाईनचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे त्यांना मनस्ताप होतो. महापालिकेने या भागातील गडरलाईनची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

लेंडी तलावात झाले अतिक्रमण

रामनगरला लागूनच लेंडी तलाव आहे. हा तलाव पूर्णपणे बुजला आहे. या तलावाच्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. पावसाळ्यात या तलावाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. याशिवाय अनेक नाल्यांचे घाण पाणी लेंडी तलावात सोडण्यात येत असल्यामुळे, या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लेंडी तलावावर नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटवून या तलावाची सफाई करण्याची तसेच तलावात सोडण्यात येणारे नाल्याचे पाणी बंद करण्याची गरज आहे.

नाईक तलावाची सफाई करावी

नाईक तलावाचे पाणी घाण झाल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाईक तलावाची सफाई करण्याची गरज आहे.

-किशोरीलाल भवर

असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा

असामाजिक तत्त्व नाईक तलावाच्या परिसरात जुगार खेळणे, दारू पिणे असे गैरप्रकार करतात. त्यामुळे पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची नागरिकांची मागणी आहे.

-सुनिता डोंगरे

गडरलाईन दुरुस्त करावी

रामनगरात गडरलाईन नेहमीच चोक होते. घाण पाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने गडरलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.

-प्रभा सोनकुसरे

गार्डनमध्ये लाईट, ग्रीलची व्यवस्था करावी

नाईक तलावाशेजारील गार्डनमध्ये लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार राहतो. त्यामुळे लहान मुलांची गैरसोय होते. तलावाला लावलेली लोखंडाची ग्रील चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्यामुळे गार्डनमध्ये लाईट, तलावाला लोखंडी ग्रीलची व्यवस्था करावी.

-चेतना पितंबरा, नागरिक

लेंडी तलाव स्वच्छ करावा

लेंडी तलावात नाल्याचे घाण पाणी सोडण्यात येते. पावसाळ्यात तलावाला पूर येऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरते. त्यामुळे लेंडी तलाव स्वच्छ करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

-पिंकी ठवकर, नागरिक

नाईक तलावात कचरा टाकू नये

नाईक तलावातील पाणी घाण झाले आहे. अनेक नागरिक या तलावात कचरा आणून टाकत असल्यामुळे तलावाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून तलावाची सफाई करण्याची गरज आहे.

-श्रावण पारधी