शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व दुरुस्ती; मनपात अभिनंदन प्रस्तावावर विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:40 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रस्तावाला जोरदार विरोध करून सभात्याग केला.

ठळक मुद्देसभागृहात गोंधळ : विरोधकांचा सभात्याग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला. या विरोधाला न जुमानता भाजप नगरसेवकांनी हा प्रस्ताव मांडल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रस्तावाला जोरदार विरोध करून सभात्याग केला.सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच आरोग्य सभापती वीरेंद कुकरेजा यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावर तानाजी वनवे व प्रफुल्ल गुडधे यांनी आक्षेप घेतला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत असताना या प्रस्तावावर अभिनंदन प्रस्ताव आणणे योग्य नसल्याची भूमिका मांडली. यावर माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी काँग्रेस नगरसेवकांचा आक्षेप तथ्यहीन असल्याची भूमिका घेतली. परंतु विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावरुन सभागृहात गोंधळ वाढला. भाजपचे ज्येष्ठ नगसेवक दयाशंकर तिवारी यांनी सत्तापक्षाच्या प्रस्तावाचे समर्थन करीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अनेक लोक न्यायालयात गेले आहेत. अभिनंदन प्रस्ताव हा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासंदर्भात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. काश्मीर मधील कलम ३७० हटविल्याने तेथे शांतता आहे. त्यामुळे अभिनंदन प्रस्तावाला विरोध चुकीचा असल्याची भूमिका मांडली. विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. मात्र काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे व हरीश ग्वालबंशी सभागृहात बसून होते. यामुळे सभागृहात उलटसुलट चर्चा होती.सर्वत्र विरोध अन् अभिनंदन कसले?कें द्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सध्या देशभरात तीव्र आंदोलने होत असताना या निर्णयावर अभिनंदन कसले, असा सवाल विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केला. हा प्रस्ताव सभागृहात मांडण्याची गरज नव्हती, अशी भूमिका त्यांनी मांडली.कायदा केला म्हणून अभिनंदन दुर्दैवीकें द्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सभागृहात अभिनंदन प्रस्ताव आणणे दुर्दैवी आहे. या कायद्याला देशभरात नागरिक विरोध करीत आहेत. सभागृहात यापूर्वी एखादा कायदा केला म्हणून अभिनंदन प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे चुकीची परंपरा पाडली जात आहे.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका