शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नागरिकत्व दुरुस्ती; मनपात अभिनंदन प्रस्तावावर विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:40 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रस्तावाला जोरदार विरोध करून सभात्याग केला.

ठळक मुद्देसभागृहात गोंधळ : विरोधकांचा सभात्याग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला. या विरोधाला न जुमानता भाजप नगरसेवकांनी हा प्रस्ताव मांडल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रस्तावाला जोरदार विरोध करून सभात्याग केला.सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच आरोग्य सभापती वीरेंद कुकरेजा यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावर तानाजी वनवे व प्रफुल्ल गुडधे यांनी आक्षेप घेतला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत असताना या प्रस्तावावर अभिनंदन प्रस्ताव आणणे योग्य नसल्याची भूमिका मांडली. यावर माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी काँग्रेस नगरसेवकांचा आक्षेप तथ्यहीन असल्याची भूमिका घेतली. परंतु विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावरुन सभागृहात गोंधळ वाढला. भाजपचे ज्येष्ठ नगसेवक दयाशंकर तिवारी यांनी सत्तापक्षाच्या प्रस्तावाचे समर्थन करीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अनेक लोक न्यायालयात गेले आहेत. अभिनंदन प्रस्ताव हा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासंदर्भात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. काश्मीर मधील कलम ३७० हटविल्याने तेथे शांतता आहे. त्यामुळे अभिनंदन प्रस्तावाला विरोध चुकीचा असल्याची भूमिका मांडली. विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. मात्र काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे व हरीश ग्वालबंशी सभागृहात बसून होते. यामुळे सभागृहात उलटसुलट चर्चा होती.सर्वत्र विरोध अन् अभिनंदन कसले?कें द्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सध्या देशभरात तीव्र आंदोलने होत असताना या निर्णयावर अभिनंदन कसले, असा सवाल विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केला. हा प्रस्ताव सभागृहात मांडण्याची गरज नव्हती, अशी भूमिका त्यांनी मांडली.कायदा केला म्हणून अभिनंदन दुर्दैवीकें द्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सभागृहात अभिनंदन प्रस्ताव आणणे दुर्दैवी आहे. या कायद्याला देशभरात नागरिक विरोध करीत आहेत. सभागृहात यापूर्वी एखादा कायदा केला म्हणून अभिनंदन प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे चुकीची परंपरा पाडली जात आहे.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका