शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

नागरिकत्व दुरुस्ती; मनपात अभिनंदन प्रस्तावावर विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:40 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रस्तावाला जोरदार विरोध करून सभात्याग केला.

ठळक मुद्देसभागृहात गोंधळ : विरोधकांचा सभात्याग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला. या विरोधाला न जुमानता भाजप नगरसेवकांनी हा प्रस्ताव मांडल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रस्तावाला जोरदार विरोध करून सभात्याग केला.सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच आरोग्य सभापती वीरेंद कुकरेजा यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावर तानाजी वनवे व प्रफुल्ल गुडधे यांनी आक्षेप घेतला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत असताना या प्रस्तावावर अभिनंदन प्रस्ताव आणणे योग्य नसल्याची भूमिका मांडली. यावर माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी काँग्रेस नगरसेवकांचा आक्षेप तथ्यहीन असल्याची भूमिका घेतली. परंतु विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावरुन सभागृहात गोंधळ वाढला. भाजपचे ज्येष्ठ नगसेवक दयाशंकर तिवारी यांनी सत्तापक्षाच्या प्रस्तावाचे समर्थन करीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अनेक लोक न्यायालयात गेले आहेत. अभिनंदन प्रस्ताव हा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासंदर्भात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. काश्मीर मधील कलम ३७० हटविल्याने तेथे शांतता आहे. त्यामुळे अभिनंदन प्रस्तावाला विरोध चुकीचा असल्याची भूमिका मांडली. विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. मात्र काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे व हरीश ग्वालबंशी सभागृहात बसून होते. यामुळे सभागृहात उलटसुलट चर्चा होती.सर्वत्र विरोध अन् अभिनंदन कसले?कें द्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सध्या देशभरात तीव्र आंदोलने होत असताना या निर्णयावर अभिनंदन कसले, असा सवाल विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केला. हा प्रस्ताव सभागृहात मांडण्याची गरज नव्हती, अशी भूमिका त्यांनी मांडली.कायदा केला म्हणून अभिनंदन दुर्दैवीकें द्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सभागृहात अभिनंदन प्रस्ताव आणणे दुर्दैवी आहे. या कायद्याला देशभरात नागरिक विरोध करीत आहेत. सभागृहात यापूर्वी एखादा कायदा केला म्हणून अभिनंदन प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे चुकीची परंपरा पाडली जात आहे.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका