चक्रपाणी नगरात वीज, पाण्याविना नागरिक त्रस्त ()
नागपूर : पिपळा राेडवरील चक्रपाणीनगर भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अभावी मनस्ताप सहन करावा लागताे आहे. जलवाहिनीचा प्रस्ताव असतानाही या भागात ती पाेहोचली नाही. दरवर्षी उन्हाळा लागला की नागरिकांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागतात. यावर्षीही तीच अवस्था हाेत आहे. पाण्याचे टँकर दहा ते पंधरा दिवसांतून एकदा येतात; पण पाणी याेग्य प्रमाणात भेटत नाही. दुसरीकडे वस्तीत पाेल तर लावण्यात आले; पण पथदिवे लावण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. २३ पैकी एकाही पाेलला विद्युत दिवे लागले नसल्याने रात्रीबेरात्री वस्तीत जाताना भतीचा सामना करावा लागताे. या मूलभूत समस्या साेडविण्यात याव्या यासाठी वृंदावन काॅलनी वेलफेअर साेसायटीच्यावतीने हनुमाननगर झाेनच्या सहायक आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे विश्वेश्वर अहिरकर, सुशांत मोहनराव लोखंडे, छोटूभाऊ उगले, वृंदावन कॉलनी सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ बारहाते, उपाध्यक्ष दिनेश जामठे, सचिव राहुल मेश्राम, सहसचिव अनिल तिवारी, कोषाध्यक्ष देवराव डोंगरवार, प्रकाश शेवतकर प्रमुख्याने उपस्थित होते.