शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ११ जिल्ह्यांना सिकलसेलचा विळखा

By admin | Updated: August 10, 2016 00:45 IST

विदर्भात ‘मॉजेले’ची गरज; अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये प्रादुर्भाव जास्त.

अकोला, दि. 0९:: जीवघेण्या सिकलसेल आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृतीसह प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. तसे होत नसल्यामुळे सिकलसेल रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये दीड लाखापेक्षा अधिक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आहे. रुग्ण संख्येला आळा घालून आजाराचे अचूक निदान करण्यासाठी विदर्भात ह्यमॉजेलेह्ण( मॉलिक्युलर जेनेटीक लेबॉरेटरी)स्थापन करण्याची नितांत गरज आहे.संतान उत्पत्तीच्या माध्यमातून सिकलसेल आजाराचा फैलाव होतो. अतिदुर्गम भागात राहणार्‍या नागरिकांमध्ये या आजाराचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नंदूरबार, यवतमाळसह ११ जिल्ह्यांमध्ये सिकलसेल आजाराचे दीड लाख रुग्ण आहेत. आजाराला आळा घालण्यासाठी लग्नापूर्वी तरुण-तरुणींमध्ये जागृती-समुपदेशन करणे, रक्ताच्या चाचण्या करणे व ज्या महिलांनी सिकलसेलग्रस्त बालकांना जन्म दिला त्यांचे योग्यरीत्या लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सक्षम असणे अपेक्षित आहे. सिकलसेलचा प्रसार होऊ नये, यासाठी जनजागरण प्रभावी माध्यम आहे. संबंधित रुग्णाला वर्षातून किमान तीन ते चार वेळेस रुग्णालयात भरती व्हावे लागते. उपचारासाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो. रुग्णाच्या जन्मापासून ते त्याच्या अंतापर्यंत हा प्रवास सुरू असल्यामुळे संबंधित कुटुंबीयांना मार्गदर्शनासह शासनाच्या उपाययोजनांची गरज आहे. २00८ ते २0१४ कालावधीत तत्कालीन केंद्र सरकारने राज्य शासनाला १0९ कोटी रुपये दिले होते. या निधीची योग्यरीत्या अंमलबजावणी न झाल्यामुळे रुग्णांना अद्यापही सुविधा मिळत नसल्याची परिस्थिती आहे.विदर्भात ह्यमॉजेलेह्णची गरजराज्यात सिकलसेलचा सर्वाधिक प्रभाव विदर्भातील ११ जिल्ह्यांत आहे. देशातील २0 पैकी चार ह्यमॉजेलेह्ण सिकलसेल अस्तित्वात नसलेल्या पुणे,मुंबई शहरासाठी प्रत्येकी दोन मंजूर झाले. शिवाय सिकलसेलचे मुख्यालय मुंबईत आहे. दुर्गम भागातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. आजाराला आळा घालण्यासाठी जनजागृतीची अत्यंत आवश्यकता आहे. रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे.-संपत रामटेके, अध्यक्ष सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर.