शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

विदर्भातील ११ जिल्ह्यांना सिकलसेलचा विळखा

By admin | Updated: August 10, 2016 00:45 IST

विदर्भात ‘मॉजेले’ची गरज; अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये प्रादुर्भाव जास्त.

अकोला, दि. 0९:: जीवघेण्या सिकलसेल आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृतीसह प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. तसे होत नसल्यामुळे सिकलसेल रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये दीड लाखापेक्षा अधिक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आहे. रुग्ण संख्येला आळा घालून आजाराचे अचूक निदान करण्यासाठी विदर्भात ह्यमॉजेलेह्ण( मॉलिक्युलर जेनेटीक लेबॉरेटरी)स्थापन करण्याची नितांत गरज आहे.संतान उत्पत्तीच्या माध्यमातून सिकलसेल आजाराचा फैलाव होतो. अतिदुर्गम भागात राहणार्‍या नागरिकांमध्ये या आजाराचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नंदूरबार, यवतमाळसह ११ जिल्ह्यांमध्ये सिकलसेल आजाराचे दीड लाख रुग्ण आहेत. आजाराला आळा घालण्यासाठी लग्नापूर्वी तरुण-तरुणींमध्ये जागृती-समुपदेशन करणे, रक्ताच्या चाचण्या करणे व ज्या महिलांनी सिकलसेलग्रस्त बालकांना जन्म दिला त्यांचे योग्यरीत्या लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सक्षम असणे अपेक्षित आहे. सिकलसेलचा प्रसार होऊ नये, यासाठी जनजागरण प्रभावी माध्यम आहे. संबंधित रुग्णाला वर्षातून किमान तीन ते चार वेळेस रुग्णालयात भरती व्हावे लागते. उपचारासाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो. रुग्णाच्या जन्मापासून ते त्याच्या अंतापर्यंत हा प्रवास सुरू असल्यामुळे संबंधित कुटुंबीयांना मार्गदर्शनासह शासनाच्या उपाययोजनांची गरज आहे. २00८ ते २0१४ कालावधीत तत्कालीन केंद्र सरकारने राज्य शासनाला १0९ कोटी रुपये दिले होते. या निधीची योग्यरीत्या अंमलबजावणी न झाल्यामुळे रुग्णांना अद्यापही सुविधा मिळत नसल्याची परिस्थिती आहे.विदर्भात ह्यमॉजेलेह्णची गरजराज्यात सिकलसेलचा सर्वाधिक प्रभाव विदर्भातील ११ जिल्ह्यांत आहे. देशातील २0 पैकी चार ह्यमॉजेलेह्ण सिकलसेल अस्तित्वात नसलेल्या पुणे,मुंबई शहरासाठी प्रत्येकी दोन मंजूर झाले. शिवाय सिकलसेलचे मुख्यालय मुंबईत आहे. दुर्गम भागातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. आजाराला आळा घालण्यासाठी जनजागृतीची अत्यंत आवश्यकता आहे. रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे.-संपत रामटेके, अध्यक्ष सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर.