शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
2
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
3
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
4
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
5
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
6
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
8
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
9
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
10
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
11
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
12
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
13
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
14
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
15
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
16
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
17
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
18
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
19
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
20
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील निसर्ग पर्यटन स्थळांचे सर्किट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:02 IST

Nagpur News वनविभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. विदर्भातील निसर्ग पर्यटनाचे सर्किट तयार करण्याची घोषणाही झाली. मात्र सध्यातरी हे सर्व कागदावरच आहे.

ठळक मुद्देनियोजनाचा पत्ता नाही, कसा होणार विकास?

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भावर निसर्गाचा वरदहस्त आहे. घनदाट जंगले, प्राणी आणि त्यात असलेल्या वृक्षांच्या विविध प्रजाती हे येथील वैशिष्ट्य आहे. यातून विदर्भातील पर्यटन वाढविण्यासाठी योजना आखल्या गेल्या. वनविभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. विदर्भातील निसर्ग पर्यटनाचे सर्किट तयार करण्याची घोषणाही झाली. मात्र सध्यातरी हे सर्व कागदावरच आहे.

८ डिसेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. विदर्भातील निसर्ग आणि वन पर्यटनाला महाराष्ट्रात असलेला वाव लक्षात घेता याचे मुख्यालयही नागपुरातच ठेवण्यात आले. विदर्भात असलेल्या सामाजिक वनीकरणाच्या १८ प्रकल्पांसह एकूण ८८ प्रकल्पांच्या विकासाचा प्रस्ताव चार वर्षापूर्वी तयार करण्यात आला. त्यासाठी काही प्रमाणात निधीही मिळाला असून काम सुरू आहे.

निसर्ग पर्यटनाला वाव मिळावा यासाठी मागील वर्षी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने विदर्भातील निसर्ग पर्यटन स्थळांचे सर्किट तयार करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या क्षेत्रांसह मेळघाट, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प, कऱ्हांडला, टिपेश्वर अभयारण्य आदींचा समावेश करण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात केवळ घोषणेपलीकडे यात काहीच झाले नाही. या संदर्भात अधिक महिती घेतली असता, एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ)च्या सहकार्याने विदर्भातील निसर्ग पर्यटनाचे सर्किट आखले जाणार होते. मात्र अद्याप यासाठी मुहूर्तच निघालेला नाही.

कसा होणार पर्यटनाचा विकास?

विदर्भात पर्यटक आल्यावर त्याच्या डोळ्यापुढे फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पच असतो. दोन दिवसात पर्यटक विदर्भातून माघारी निघतो. मात्र येथील साधनसंपत्तीचा योग्य उपयोग आणि नियोजन केले तर निसर्ग आणि वन पर्यटनाला बराच वाव आहे. पर्यटक आल्यावर किमान आठवडाभर तरी तो विदर्भातच स्थिरावेल असे सर्किट तयार होण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ वनविभागावरच अवलंबून न राहता पर्यटन विकास मंडळ, वस्तुसंग्रहालये, पुरातत्त्व विभाग यांची संयुक्त आखणी होण्याची गरज आहे. सध्यातरी विदर्भातील पर्यटन केवळ वाघांभोवतीच फिरत असल्याने हा विषय एका अंगाने चालला आहे.

...

टॅग्स :tourismपर्यटन