शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

विदर्भातील निसर्ग पर्यटन स्थळांचे सर्किट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:02 IST

Nagpur News वनविभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. विदर्भातील निसर्ग पर्यटनाचे सर्किट तयार करण्याची घोषणाही झाली. मात्र सध्यातरी हे सर्व कागदावरच आहे.

ठळक मुद्देनियोजनाचा पत्ता नाही, कसा होणार विकास?

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भावर निसर्गाचा वरदहस्त आहे. घनदाट जंगले, प्राणी आणि त्यात असलेल्या वृक्षांच्या विविध प्रजाती हे येथील वैशिष्ट्य आहे. यातून विदर्भातील पर्यटन वाढविण्यासाठी योजना आखल्या गेल्या. वनविभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. विदर्भातील निसर्ग पर्यटनाचे सर्किट तयार करण्याची घोषणाही झाली. मात्र सध्यातरी हे सर्व कागदावरच आहे.

८ डिसेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. विदर्भातील निसर्ग आणि वन पर्यटनाला महाराष्ट्रात असलेला वाव लक्षात घेता याचे मुख्यालयही नागपुरातच ठेवण्यात आले. विदर्भात असलेल्या सामाजिक वनीकरणाच्या १८ प्रकल्पांसह एकूण ८८ प्रकल्पांच्या विकासाचा प्रस्ताव चार वर्षापूर्वी तयार करण्यात आला. त्यासाठी काही प्रमाणात निधीही मिळाला असून काम सुरू आहे.

निसर्ग पर्यटनाला वाव मिळावा यासाठी मागील वर्षी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने विदर्भातील निसर्ग पर्यटन स्थळांचे सर्किट तयार करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या क्षेत्रांसह मेळघाट, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प, कऱ्हांडला, टिपेश्वर अभयारण्य आदींचा समावेश करण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात केवळ घोषणेपलीकडे यात काहीच झाले नाही. या संदर्भात अधिक महिती घेतली असता, एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ)च्या सहकार्याने विदर्भातील निसर्ग पर्यटनाचे सर्किट आखले जाणार होते. मात्र अद्याप यासाठी मुहूर्तच निघालेला नाही.

कसा होणार पर्यटनाचा विकास?

विदर्भात पर्यटक आल्यावर त्याच्या डोळ्यापुढे फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पच असतो. दोन दिवसात पर्यटक विदर्भातून माघारी निघतो. मात्र येथील साधनसंपत्तीचा योग्य उपयोग आणि नियोजन केले तर निसर्ग आणि वन पर्यटनाला बराच वाव आहे. पर्यटक आल्यावर किमान आठवडाभर तरी तो विदर्भातच स्थिरावेल असे सर्किट तयार होण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ वनविभागावरच अवलंबून न राहता पर्यटन विकास मंडळ, वस्तुसंग्रहालये, पुरातत्त्व विभाग यांची संयुक्त आखणी होण्याची गरज आहे. सध्यातरी विदर्भातील पर्यटन केवळ वाघांभोवतीच फिरत असल्याने हा विषय एका अंगाने चालला आहे.

...

टॅग्स :tourismपर्यटन