शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीचे उभे पीक पेटविले

By admin | Updated: March 25, 2017 03:09 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीला कमी भाव मिळाला. शिवाय, बाजारात मिरचीला उठावही नाही.

शेतकऱ्यांचा संताप : यावर्षी कमी भाव मिळाल्याने नाराजी मांढळ : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीला कमी भाव मिळाला. शिवाय, बाजारात मिरचीला उठावही नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कुही तालुक्यातील किन्ही व पचखेडी येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील मिरचीचे उभे पीक उपटून त्याचे ढीग लावले आणि ते पेटवून दिले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कुही तालुक्यात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या अनुषंगाने कुही तालुक्यातील पचखेडी आणि किन्ही येथील बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली होती. कारण, मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी भावाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यावर्षी अनुकूल वातावरणामुळे मिरचीचे भरघोस पीक आले. त्यातच बाजारातील मिरचीची आवक वाढली आणि दुसरीकडे मागणी घटली. त्यामुळे मिरचीचे भाव कोसळल्याने अनेकांचा उपत्पादनखर्चही भरून निघाला नाही. मिरची तोडून ती बाजारात विकायला नेल्यानंतर मजुरीचा खर्चही भरून निघाला नाही, अशा व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. सध्या मिरची तोडण्याची मजुरी प्रति मजूर १५० रुपये आहे तर ओल्या मिरचीला बाजारात दोन ते पाच रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. वाळलेल्या लाल मिरचीला प्रति किलो १५ ते २० रुपये किलो भाव मिळत आहे. झाडांची मिरची प्रत्येक शेतकऱ्याला मजुरांकरवीच तोडावी लागते. तोडलेल्या मिरचीतून तोडणीचा खर्चही भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी या मिरचीच्या पिकाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पचखेडी येथील फारूख सय्यद यांनी त्यांच्या शेतातील मिरचीची झाडे मजुरांकरवी उपटून काढली तर पचखेडी येथील गुणवंता लांजेवार, भीमराव भोयर, प्रभू भोयर, किन्ही येथील कृष्णा तितरमारे यांनी त्यांच्या शेतातील मिरचीची झाडे ट्रॅक्टर व वखराच्या मदतीने उपटली. या झाडांचे शेतातच ढीग लावले आणि ते पेटविले. या प्रकाराची माहिती परिसरात पसरली. त्यामुळे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पंचायत समिती सभापती सुनीता पडोळे, सुरेश येळणे, मांढळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, गुणाकार सेलोकर यांच्यासह अन्य नेत्यांनी लगेच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. (प्रतिनिधी) अत्यल्प बाजारभाव आपण दरवर्षी मिरचीचे उत्पादन मे महिन्यापर्यंत घेत असल्याची माहिती बहुतांश शेतकऱ्यांनी दिली. मागील वर्षी ओल्या मिरचीला प्रति क्विंटल दोन हजार रुपये तर सुकलेल्या लाल मिरचीला प्रति क्विंटल १० हजार ते १२ हजार रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षी अनेकांनी मिरचीच्या लागवडीला प्रथम पसंती दिली. अनुकूल वातावरणामुळे पीकही भरघोस आले. यावर्षी मात्र ओल्या मिरचीला प्रति किलो दोन ते पाच रुपये आणि वाळलेल्या लाल मिरचीला प्रति क्विंटल २५०० रुपये ते ३२०० रुपये भाव मिळत आहे. हा दर परवडण्याजोगा नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.