शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

मिरचीचे उभे पीक पेटविले

By admin | Updated: March 25, 2017 03:09 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीला कमी भाव मिळाला. शिवाय, बाजारात मिरचीला उठावही नाही.

शेतकऱ्यांचा संताप : यावर्षी कमी भाव मिळाल्याने नाराजी मांढळ : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीला कमी भाव मिळाला. शिवाय, बाजारात मिरचीला उठावही नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कुही तालुक्यातील किन्ही व पचखेडी येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील मिरचीचे उभे पीक उपटून त्याचे ढीग लावले आणि ते पेटवून दिले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कुही तालुक्यात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या अनुषंगाने कुही तालुक्यातील पचखेडी आणि किन्ही येथील बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली होती. कारण, मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी भावाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यावर्षी अनुकूल वातावरणामुळे मिरचीचे भरघोस पीक आले. त्यातच बाजारातील मिरचीची आवक वाढली आणि दुसरीकडे मागणी घटली. त्यामुळे मिरचीचे भाव कोसळल्याने अनेकांचा उपत्पादनखर्चही भरून निघाला नाही. मिरची तोडून ती बाजारात विकायला नेल्यानंतर मजुरीचा खर्चही भरून निघाला नाही, अशा व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. सध्या मिरची तोडण्याची मजुरी प्रति मजूर १५० रुपये आहे तर ओल्या मिरचीला बाजारात दोन ते पाच रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. वाळलेल्या लाल मिरचीला प्रति किलो १५ ते २० रुपये किलो भाव मिळत आहे. झाडांची मिरची प्रत्येक शेतकऱ्याला मजुरांकरवीच तोडावी लागते. तोडलेल्या मिरचीतून तोडणीचा खर्चही भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी या मिरचीच्या पिकाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पचखेडी येथील फारूख सय्यद यांनी त्यांच्या शेतातील मिरचीची झाडे मजुरांकरवी उपटून काढली तर पचखेडी येथील गुणवंता लांजेवार, भीमराव भोयर, प्रभू भोयर, किन्ही येथील कृष्णा तितरमारे यांनी त्यांच्या शेतातील मिरचीची झाडे ट्रॅक्टर व वखराच्या मदतीने उपटली. या झाडांचे शेतातच ढीग लावले आणि ते पेटविले. या प्रकाराची माहिती परिसरात पसरली. त्यामुळे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पंचायत समिती सभापती सुनीता पडोळे, सुरेश येळणे, मांढळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, गुणाकार सेलोकर यांच्यासह अन्य नेत्यांनी लगेच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. (प्रतिनिधी) अत्यल्प बाजारभाव आपण दरवर्षी मिरचीचे उत्पादन मे महिन्यापर्यंत घेत असल्याची माहिती बहुतांश शेतकऱ्यांनी दिली. मागील वर्षी ओल्या मिरचीला प्रति क्विंटल दोन हजार रुपये तर सुकलेल्या लाल मिरचीला प्रति क्विंटल १० हजार ते १२ हजार रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षी अनेकांनी मिरचीच्या लागवडीला प्रथम पसंती दिली. अनुकूल वातावरणामुळे पीकही भरघोस आले. यावर्षी मात्र ओल्या मिरचीला प्रति किलो दोन ते पाच रुपये आणि वाळलेल्या लाल मिरचीला प्रति क्विंटल २५०० रुपये ते ३२०० रुपये भाव मिळत आहे. हा दर परवडण्याजोगा नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.