शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

मिरचीने आणले डोळ्यात पाणी! चुरड्यामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 15:36 IST

प्रतिकूल वातावरणामुळे मिरचीच्या पिकावर चुरडा व फुलकिडीचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही या दाेन्ही किडी नियंत्रणात येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक उपटून रब्बीच्या दुसऱ्या पिकाचे नियाेजन करायला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देफुलकिडींचाही प्रादुर्भावसततच्या ढगाळ वातावरणाचा परिणाम

नागपूर : ‘राईस बेल्ट’ म्हणून ओळख असलेल्या रामटेक तालुक्यात मिरचीचे लागवड क्षेत्र हळूहळू वाढत आहे; मात्र मागील १५ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने मिरचीच्या पिकाची चुरड्यासाेबतच फुलकिडींचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. वारंवार फवारणी करूनही या दाेन्ही किडी नियंत्रणात येत नसल्याने रामटेक तालुक्यातील मिरचीचे पीक धाेक्यात व मिरची उत्पादक संकटात सापडले आहेत.

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरचीला मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने यावर्षी रामटेक तालुक्यात मिरचीचे लागवड क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. यावर्षी तालुक्यातील मानापूर येथील आनंदराव हिंगे व विनायक हिंगे यांनी प्रत्येकी दोन एकरात मिरचीची लागवड केली असून, रामनाथ मोटघरे यांनी सात, सारंग हिंगे व भाऊराव हिंगे यांनी प्रत्येकी चार, श्रीचंद सातपुते यांनी एक, जगनाथ घोल्लर यांनी तीन एकरात मिरचीची लागवड केली आहे. एकट्या मानापूर शिवारात ४० एकरात मिरचीची लागवड केली आहे.

प्रतिकूल वातावरणामुळे मानापूर, मसला, बोरी, काचूरवाही, वडेगाव यासह अन्य शिवारातील मिरचीच्या पिकावर चुरडा व फुलकिडीचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही या दाेन्ही किडी नियंत्रणात येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक उपटून रब्बीच्या दुसऱ्या पिकाचे नियाेजन करायला सुरुवात केली आहे. पीकेव्हीचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. नंदकिशोर लव्हे यांनी या नुकसानग्रस्त मिरचीच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालाखे, तालुका कृषी अधिकारी दिनेश भोये, मंडळ कृषी अधिकारी चंद्रमणी हाटे, कृषी सहायक नारायण तोडमल उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.

मिरचीचे दर काेसळले

रामटेक तालुक्यातील बहुतांश मिरची उत्पादकांनी मिरचीच्या पिकावर प्रतिएकर ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला आहे. बहुतेकांनी बेड तयार करून तसेच मल्चिंग पेपरचा वापर करीत मिरचीची लागवड केली आहे. तालुक्यातील शेतकरी हिरव्या मिरचीची विक्री करतात. १५ दिवसांपूर्वी हिरव्या मिरचीला प्रतिकिलाे २२ ते ३० रुपये भाव मिळायचा. हे दर आठ ते नऊ रुपये प्रतिकिलाेवर आले असून, मिरची ताेडण्याचा खर्च पाच ते सहा रुपये प्रतिकिलाे येत असल्याची माहिती मिरची उत्पादकांनी दिली.

या उपाययाेजना करा

चुरड्याच्या पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात निळ्या रंगाचे चिकट सापळे लावावे. निंबोळी अर्काची फवारणी करावी. सुती कापडाला एरंडी तेलात बुडवून ताे कापड झाडावरून फिरवावा यासह अन्य उपाययाेजना कीटकशास्त्रज्ञ डाॅ. डाॅ. नंदकिशोर लव्हे यांनी सुचविल्या आहेत. त्यांनी फवारणी दरम्यान हाेत असलेल्या चुकाही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी