शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आईची जात लागू करा, मुलाची कोर्टात याचिका; उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 5, 2022 18:14 IST

यापूर्वी उच्च न्यायालयाने विविध प्रकरणांमध्ये पीडित अपत्यांना आईची जात लागू करण्याचा आदेश दिला आहे.

नागपूर : आईच्या कागदपत्रांवरून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळावे, याकरिता वरोरा तालुक्यातील एका मुलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर येत्या १५ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जाेशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या मुलाच्या आई-वडिलाचा घटस्फोट झाला आहे. आई-वडील विभक्त झाले त्यावेळी मुलगा लहान होता. तेव्हापासून आईनेच त्याचे संगोपन व शिक्षण केले. त्याचा वडिलासोबत काहीच संपर्क नाही. परिणामी, त्याच्याकडे वडिलाच्या जातीची कागदपत्रेही उपलब्ध नाही. त्यामुळे त्याने आईच्या कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उप-विभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता. त्या अर्जासोबत आईचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र व या जातीशी संबंधित इतर कागदपत्रे जोडले होते.

परंतु, कायद्यानुसार मुलाला जात प्रमाणपत्र जारी करताना वडिलाच्या जातीचे पुरावे विचारात घेतल्या जात असल्याने आणि या मुलाकडे वडिलाच्या जातीची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने उप-विभागीय अधिकाऱ्यांनी हा अर्ज नामंजूर केला. त्या निर्णयाविरुद्ध मुलाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलाच्या वतीने ॲड. अनिल ढवस यांनी बाजू मांडली.

यापूर्वी उच्च न्यायालयाने विविध प्रकरणांमध्ये पीडित अपत्यांना आईची जात लागू करण्याचा आदेश दिला आहे. संबंधित अपत्यांचाही त्यांच्या वडिलांशी काहीच संपर्क नव्हता. करिता, उप-विभागीय अधिकाऱ्यांचा वादग्रस्त आदेश रद्द करून या मुलाला आईच्या कागदपत्रांवरून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जारी करणे आवश्यक आहे, असे ॲड. ढवस यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय