शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये वाढतेय मुलांचे वजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:08 IST

नागपूर : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या वाढत्या परिणामामुळे अनेक पालकांनी मुलांना अंगणाच्या मर्यादेतच ठेवले आहे. शाळाही बंद आहेत. मुले घरबसल्या ...

नागपूर : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या वाढत्या परिणामामुळे अनेक पालकांनी मुलांना अंगणाच्या मर्यादेतच ठेवले आहे. शाळाही बंद आहेत. मुले घरबसल्या ऑनलाईन क्लास मोबाईलवर जाॅईन करतात. मात्र, क्लास संपल्यावरही मोबाईल त्यांच्याच हाती असतो. ते मोबाईल गेम खेळण्यात व्यस्त होतात. व्यायामाला आणि खेळण्याला वाव नसल्याने मुलांचे वजन आणि मोबाईलचे व्यसनही वाढत आहे. यामुळे पालकवर्गामध्ये चिंता व्यक्त होत आहे.

५ वर्षांपासून तर १६ वर्षापर्यंतच्या सर्वच वयोगटातील मुलांची ही समस्या आहे. ही मुले फक्त एकट्यातच मोबाईल खेळत नाहीत तर आपल्या मित्रांसोबत ग्रुपचे गेम खेळतात. यामुळे मुलांमध्ये मोबाईलचे व्ससन वाढत आहे. शाळा बंद असणे आणि मैदानी खेळांची सवय तुटल्याने मुलांचे वजन आणि मोबाईलचे वेड वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. १३ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे व्यसन तर एवढे वाढले आहे की ते मोबाईलसाठी काहीही जोखीम घ्यायला तयार असतात. यामुळे घराघरातील पालक काळजीत आहेत.

...

विशेषज्ज्ञ म्हणतात...

प्रतिस्पर्धा आणि रचनात्मकता संपली

ऑनलाईन शाळेमुळे मुलांना मोबाईल द्यावाच लागतो. मात्र क्लास संपल्यावरही मुले गेम खेळतात किंवा अन्य साईट व व्हिडिओ पाहण्यात गुंततात. हे अधिक नुकसानकारक आहे. जंक फूडचे सेवन वाढल्याने व कॅलरीज जळत नसल्याने लठ्ठपणा वाढत आहे. मैदानी खेळ नसल्याने प्रतिस्पर्धेची भावना संपत आहे. रचनात्मकताही थांबली आहे.

- डॉ. प्रवीण खापेकर, बालरोग विशेषज्ज्ञ

...

वर्तणुकीतील अनियंत्रितपणा वाढतोय

काहींचे वजन वाढत असले तरी काही मुलांचे वजन घटत आहे. वर्क फ्रॉम होममुळे वेळेवर जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. कुटुंबात एकत्रित जेवण करण्याचा अभाव याला कारणीभूत आहे. मोबाईलपासून अधिकाधिक दूर राहून मैदानात, अंगणात खेळणे हेच हिताचे आहे.

- डॉ. रिजवान खान, बालरोग विशेषज्ज्ञ

...

जिद्दीपणा चांगला नव्हे

मोबाईलसाठी मुले लहानपणी हट्ट करतात, मात्र किशोरावस्थेत आल्यावर स्वत:ला समजदार समजायला लागतात. हा बॉर्डर लाइन पिरेड असतो. मुलांच्या संगोपनाकडे गंभीरपणे लक्ष देण्याचे हेच वय असते. मोबाईलच्या सततच्या वापरामुळे ओबेसिटी वाढते, चिडचिडपणा वाढतो, डोळ्यात आग होते. वर्तणुकीतही बदल घडतो. वेळीच आवर घातला नाही तर गुन्हेवृत्ती किंवा आत्मघातकी वृत्ती वाढण्याचे कारण ठरू शकते.

- डॉ. आशीष कुथे, मनोरोग विशेषज्ज्ञ