शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील पाचवी, आठवी ते दहावीची मुले गणितात कच्ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 08:00 IST

Nagpur News नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ५ वी, ८ वी ते १० वीचे विद्यार्थी गणितात कमजाेर असल्याची बाब समाेर आली आहे.

ठळक मुद्देवरच्या वर्गात जाताना कामगिरी खालावतेनॅशनल अचीव्हमेंट सर्व्हेचा अहवाल

निशांत वानखेडे

नागपूर : शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित हा विषय कायमच डाेकेदुखी राहिलेला आहे आणि ही परिस्थिती अद्यापही बदललेली नाही. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ५ वी, ८ वी ते १० वीचे विद्यार्थी गणितात कमजाेर असल्याची बाब समाेर आली आहे. म्हणजे मुलांच्या मानगुटीवर बसलेली गणिताची भीती दूर करण्यात शिक्षक आणि सरकारचे शैक्षणिक धाेरण अपयशी ठरले, असेच म्हणावे लागेल.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘नॅशनल अचीव्हमेंट सर्वेक्षण २०२१’चा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. राज्य सरकारी शाळा, अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, खासगी शाळांमधील वर्ग ३, ५, ८ व १० वीच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे आकलन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हे सर्वेक्षण करण्यात आले हाेते. देशातील १,१८,२७४ शाळांमध्ये ५,२६,८२४ शिक्षकांच्या सहकार्याने ३४ लाख विद्यार्थ्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. यात दोन लाख फिल्ड इन्व्हेस्टिगेटर, १.२४ ला निरीक्षक, ७३३ जिल्हास्तरीय समन्वयक व नाेडल अधिकाऱ्यांचा समावेश हाेता. महाराष्ट्रातील ७२२६ शाळांमध्ये २,१६,११७ विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे ज्ञान भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक विज्ञान या विषयांवर काही प्रश्नांच्या आधारे तपासण्यात आले.

सर्वेक्षणानुसार राज्यातील विद्यार्थी एकूणच आकलनात हुशार असल्याचे दिसून आले आहेत. त्यातही तिसरी व पाचवीचे विद्यार्थी आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा सरस असल्याचे दिसते; तर शासकीय शाळांची मुले खासगी शाळांपेक्षा हुशार असल्याचे आढळून आले. मात्र, गणित हा विषय त्यांच्यासाठी कठीणच जात आहे. तिसरीच्या मुलांनी गणितात ५७ टक्के गुण प्राप्त केले; पण वर्ग ५, ८ व १० वीचे विद्यार्थी ५० टक्क्यांच्या खालीच राहिले.

सर्वेक्षणातील महत्त्वाचे बिंदू

- इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर गणितात ५७ टक्के, भाषा विषयात ६२ टक्के, तर पर्यावरण विज्ञान विषयात ५७ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी ३१६ गुण प्राप्त केले.

- इयत्ता पाचवीच्या मुलांनी भाषेत ५५ टक्के, पर्यावरण व विज्ञान विषयात ४८ टक्के, तर गणितात ४४ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी २८७ गुण प्राप्त केले.

- इयत्ता आठवीच्या मुलांनी भाषा विषयात ५३ टक्के, तर विज्ञान ३९ टक्के, सामाजिक विज्ञान ३९ टक्के, तर गणित विषयात ३७ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी २५० गुण मिळाले.

- इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात ३५ टक्के, सामाजिक विज्ञान ३७ टक्के, इंग्रजी ४३ टक्के, तर गणितात ३२ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी २११ गुण प्राप्त केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र