शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील पाचवी, आठवी ते दहावीची मुले गणितात कच्ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 08:00 IST

Nagpur News नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ५ वी, ८ वी ते १० वीचे विद्यार्थी गणितात कमजाेर असल्याची बाब समाेर आली आहे.

ठळक मुद्देवरच्या वर्गात जाताना कामगिरी खालावतेनॅशनल अचीव्हमेंट सर्व्हेचा अहवाल

निशांत वानखेडे

नागपूर : शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित हा विषय कायमच डाेकेदुखी राहिलेला आहे आणि ही परिस्थिती अद्यापही बदललेली नाही. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ५ वी, ८ वी ते १० वीचे विद्यार्थी गणितात कमजाेर असल्याची बाब समाेर आली आहे. म्हणजे मुलांच्या मानगुटीवर बसलेली गणिताची भीती दूर करण्यात शिक्षक आणि सरकारचे शैक्षणिक धाेरण अपयशी ठरले, असेच म्हणावे लागेल.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘नॅशनल अचीव्हमेंट सर्वेक्षण २०२१’चा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. राज्य सरकारी शाळा, अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, खासगी शाळांमधील वर्ग ३, ५, ८ व १० वीच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे आकलन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हे सर्वेक्षण करण्यात आले हाेते. देशातील १,१८,२७४ शाळांमध्ये ५,२६,८२४ शिक्षकांच्या सहकार्याने ३४ लाख विद्यार्थ्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. यात दोन लाख फिल्ड इन्व्हेस्टिगेटर, १.२४ ला निरीक्षक, ७३३ जिल्हास्तरीय समन्वयक व नाेडल अधिकाऱ्यांचा समावेश हाेता. महाराष्ट्रातील ७२२६ शाळांमध्ये २,१६,११७ विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे ज्ञान भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक विज्ञान या विषयांवर काही प्रश्नांच्या आधारे तपासण्यात आले.

सर्वेक्षणानुसार राज्यातील विद्यार्थी एकूणच आकलनात हुशार असल्याचे दिसून आले आहेत. त्यातही तिसरी व पाचवीचे विद्यार्थी आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा सरस असल्याचे दिसते; तर शासकीय शाळांची मुले खासगी शाळांपेक्षा हुशार असल्याचे आढळून आले. मात्र, गणित हा विषय त्यांच्यासाठी कठीणच जात आहे. तिसरीच्या मुलांनी गणितात ५७ टक्के गुण प्राप्त केले; पण वर्ग ५, ८ व १० वीचे विद्यार्थी ५० टक्क्यांच्या खालीच राहिले.

सर्वेक्षणातील महत्त्वाचे बिंदू

- इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर गणितात ५७ टक्के, भाषा विषयात ६२ टक्के, तर पर्यावरण विज्ञान विषयात ५७ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी ३१६ गुण प्राप्त केले.

- इयत्ता पाचवीच्या मुलांनी भाषेत ५५ टक्के, पर्यावरण व विज्ञान विषयात ४८ टक्के, तर गणितात ४४ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी २८७ गुण प्राप्त केले.

- इयत्ता आठवीच्या मुलांनी भाषा विषयात ५३ टक्के, तर विज्ञान ३९ टक्के, सामाजिक विज्ञान ३९ टक्के, तर गणित विषयात ३७ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी २५० गुण मिळाले.

- इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात ३५ टक्के, सामाजिक विज्ञान ३७ टक्के, इंग्रजी ४३ टक्के, तर गणितात ३२ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी २११ गुण प्राप्त केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र