शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर ‘भूखंड’वार! २०० भूखंडांची न्यायालयीन चौकशी; विखेंच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 06:09 IST

आघाडी सरकारच्या काळातील २०० भूखंडाच्या व्यवहारांची न्यायालयीन चौकशीची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील कथित भूखंड गैरव्यवहाराचे घोंगडे विरोधकांच्याच अंगावर झटकून टाकले.

नागपूर : आघाडी सरकारच्या काळातील २०० भूखंडाच्या व्यवहारांची न्यायालयीन चौकशीची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील कथित भूखंड गैरव्यवहाराचे घोंगडे विरोधकांच्याच अंगावर झटकून टाकले.पृथ्वीराज चव्हाण, संजय निरुपम व काँग्रेस प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांनी कोपरखैरणे येथील भूखंड गैरव्यवहाराबाबत फडणवीस यांना लक्ष्य केले होते. त्याचे पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. कामकाज सुरू होताच विरोधकांनी भूखंड गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर गोंधळ सुरू केला.या आरोपांचा पलटवार करताना मुख्यमंत्र्यांनी दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या, असे सुनावून खोटे आरोप केल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आणि स्वत:च्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली.मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी नेत्यांना बोलण्याची संधी नाकारून अध्यक्षांनी कामकाज रेटले. त्या गोंधळात कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले.कांच के घर मे रहनेवाले...कांच के घर मे रहनेवाले दुसरों के घर पर पत्थर नहीं फेकते, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना सुनावले. हम कांच के घर मे नहीं रहते, असेही त्यांनी बजावले. बाबा, तुम्ही सज्जन आहात. आजूबाजूच्यांचे ऐकून आरोप करत जाऊ नका, असा माझा तुम्हाला सल्ला आहे, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना काढला.विखेंचे आव्हानकोपरखैरणेतील प्रकल्पग्रस्तांची १ लाख ८४ हजार चौरस फूट जमीन २ हजार कोटी रुपये किमतीची असून, ती साडेतीन कोटी रुपयांत बिल्डरांना विकण्यात आली. त्यात सत्ताधारी, अधिकारी व बिल्डरांचे संगनमत होते. एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर आरोप होताच त्यांचा राजीनामा घेतला गेला. मुख्यमंत्री महोदय! भूखंड विक्री व्यवहारात तुमच्या अखत्यारितील नगरविकास विभागावर आरोप झालेले असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्या, व्यवहार रद्द करा, असे आव्हानही विखे यांनी दिले.- विरोधकांच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी होईलच. पण सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विकण्याच्या रायगडसह राज्यातील २०० प्रकरणांची चौकशीही केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.आघाडी सरकारच्या काळात ६०६ हेक्टर जमिनीची विक्री याप्रकारे झाल्याचे सांगत फडणवीस यांनी ‘त्या’ व्यवहारांचे सातबाराच सभागृहात दाखविले.नवी मुंबईच्या भूखंडाबाबत विरोधकांनी केलेले आरोप निराधार आहेत. प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटण्याचा अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना होता. त्या अधिकारात त्यांनी वाटप केले. प्रकल्पग्रस्तांनी ते भूखंड बिल्डर वा इतरांना विकले. याा मंत्रालयातील मंत्री वा माझी भूमिका नव्हती. आघाडी सरकारपासूनच हे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाºयांना आहेत. त्यानुसार त्यांनी निर्णय घेतले. आघाडी सरकारच्या काळातील अशा २०० प्रकरणांचीही न्यायालयीन चौकशी केली जाईल. प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपाचे नवीन धोरण लवकरच जाहीर केले जाईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस