शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या दबावात स्वत:चीच प्रभाग रचना बदलली; नितीन राऊत यांनी साधला नेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 19:49 IST

Nagpur News शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर भाजपच्या दबावाखाली स्वत:चाच निर्णय बदलत आहेत, अशी टीका माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.

ठळक मुद्देशिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय घेतले जात आहेत

नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला होता. आता तेच शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर भाजपच्या दबावाखाली स्वत:चाच निर्णय बदलत आहेत, अशी टीका माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग रचनेत भाजपला आपला पराभव दिसत होता. त्यामुळे शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय बदलण्यात आला, असा आरोपही राऊत यांनी केला.

राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे महत्त्वाचे मंत्री होते. मंत्रिमंडळात प्रभाग रचनेचा मुद्दा आला त्यावेळी आपण तीन व चार सदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केला होता. मात्र, त्यावेळी शिंदे यांनीच महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग रचनेला संमती दिली. आज ते स्वत:चाच निर्णय बदलवित आहेत. हे विलक्षण आहे. तीनच्या प्रभागात पराभव होईल, अशी भाजपला भीती होती. जिंकण्यासाठी ही सर्व धडपड सुरू आहे. त्यामुळे शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे निर्णय करून घेतले जात आहेत. कुठेतरी भाजपच्या दबावात ते काम करीत आहेत.

चार सदस्यीय प्रभाग लोकांना नकोच आहे. यात खऱ्या अर्थाने विकासकामे होत नाहीत. एकमेकांवर कामे ढकलली जातात. जनतेचा फुटबॉल होतो. लोक नगरसेवकांनी करावयाची कामे आमदारांकडे घेऊन जातात. त्यामुळे आमदारांवरील ताण वाढतो, असे राऊत म्हणाले. आता प्रभाग रचना नव्याने करावी लागेल. त्यामुळे निवडणुका लांबतील. २०२१ च्या लोकसंख्येनुसार प्रभागांची संख्या वाढेल. मतदारांची संख्या वाढेल. त्याचे नियोजन कसे करणार, हे सर्व मुद्दे सरकारने स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली.

...तर प्रभागाचीही चार भागांत फाळणी करा

- शिंदे सरकारला चार सदस्यीय प्रभाग करायचे असतील तर प्रत्येक प्रभागाचीही चार भागांत अंतर्गत फाळणी व्हायला हवी. त्यामुळे नगरसेवकांवर कामांची जबाबदारी निश्चित करता येईल. लोकांची गैरसोय होणार नाही, अशी मागणीही राऊत यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNitin Rautनितीन राऊत