शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

मुख्यमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुक

By admin | Updated: January 12, 2016 02:59 IST

अपहरण केलेल्या मनीषनगर येथील चैतन्य आष्टनकर याची नागपूर पोलिसांनी सुखरूप सुटका केली.

चैतन्य आष्टनकर अपहरण : पोलिसांची महत्त्वाची कामगिरीनागपूर : अपहरण केलेल्या मनीषनगर येथील चैतन्य आष्टनकर याची नागपूर पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या अपहरण नाट्यात नागपूर पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावून मोठ्या कौशल्याने हे प्रकरण हाताळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपोलीस आयुक्त राजवर्धन, पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, सहायक पोलीस आयुक्त तोरे आदींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.चैतन्य सुभाष आष्टनकर या १४ वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण झाले होते. हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे झाले होते. मुलाला काहीही होऊ नये या दिशेने पोलिसांनी व्यूहरचना आखली. मोठ्या कौशल्याने व शिताफीने गुन्हेगारांना अटक करून चैतन्यची सुखरूप सुटका केली. या अपहरणामागे खंडणीचा हेतू होता. नागपूर शहरातील नागरिकांचे या घटनेकडे लक्ष लागले होते. चैतन्यचे बरेवाईट तर होणार नाही ना, अशी भीती वाटत होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: याकडे लक्ष ठेवून होते. पण या नाट्यमय घटनेचा शेवट चांगला झाल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि पोलिसांचे जाहीर कौतुक केले.या सर्व मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, सचिन लुले, दिनेश दहातोंडे, प्रमोद सानप, श्रीनिवास मिश्रा, तसेच सोनेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, संदीप येळे व पोलीस हवालदार धर्मेंद्र सरोदे, संदीप पाटील व इतर यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)