शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोरिजनचा आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द करावा

By admin | Updated: January 24, 2016 03:04 IST

जय जवान जय किसान संघटनेतर्फे जिल्ह्यातील ७२१ पैकी ३९१ गावांमध्ये नासुप्रच्या मेट्रोरिजन आराखड्या विरोधात जनमत घेण्यात आले.

शरद निंबाळकर : जनमताने नाकारला आराखडानागपूर : जय जवान जय किसान संघटनेतर्फे जिल्ह्यातील ७२१ पैकी ३९१ गावांमध्ये नासुप्रच्या मेट्रोरिजन आराखड्या विरोधात जनमत घेण्यात आले. चाचणीत जनतेने मोठ्या संख्येने आराखड्याच्या विरोधात मतदान केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. शासकीय कर्मचारी, अधिकारी व हॅलक्रो कंपनीचे अधिकारी यांनी बंद खोलीत हा आराखडा तयार केला. जनमताचा आदर करीत शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असलेला हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करावा, अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केली.जनमत चाचणीची मतमोजणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चालली. शनिवारी सकाळी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. एकूण ५ लाख १४ हजार १६९ नागरिकांनी मतदान केले होते. यापैकी तब्बल ४ लाख ५५ हजार ५४२ नागरिकांनी हा आराखडा अन्यायकारक असल्याचे मत दिले आहे तर ५८ हजार ६२७ नागरिकांनी आराखड्याचे समर्थन केले आहे. या आकडेवारीवरून जनमत आराखड्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे म्हणाले, नागरिकांना विकासाची स्वप्ने दाखविणे सुरू आहे. नागरिकांचे अधिकार हिरावून घेण्याचे प्रकार सरकारने बंद करावे, अन्यथा जनतेचा सरकारवरील विश्वास उडेल, असा इशाराही त्यांनी दिला. जय जवान जय किसान संघटनेचे मुख्य संयोजक प्रशांत पवार म्हणाले, मेट्रोरिजन आराखड्याच्या माध्यमातून ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकार गोठवण्याचे षड्यंत्र नागरिकांच्या लक्षात आले आहे. या आराखड्यामुळे ग्रामीण भागातील २ लाख घरे व १० लाख भूखंड अनधिकृत ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी या घरांचे व भूखंडांचे व्यवहार थांबविले आहेत. शेवटी जनतेच्या आक्रोशाची दखल घेत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला खरेदी-विक्री बंदचा आदेश बेकायदेशीर होता, असा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी पवार यांनी केली. (प्रतिनिधी)