शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

मेट्रोरिजनचा आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द करावा

By admin | Updated: January 24, 2016 03:04 IST

जय जवान जय किसान संघटनेतर्फे जिल्ह्यातील ७२१ पैकी ३९१ गावांमध्ये नासुप्रच्या मेट्रोरिजन आराखड्या विरोधात जनमत घेण्यात आले.

शरद निंबाळकर : जनमताने नाकारला आराखडानागपूर : जय जवान जय किसान संघटनेतर्फे जिल्ह्यातील ७२१ पैकी ३९१ गावांमध्ये नासुप्रच्या मेट्रोरिजन आराखड्या विरोधात जनमत घेण्यात आले. चाचणीत जनतेने मोठ्या संख्येने आराखड्याच्या विरोधात मतदान केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. शासकीय कर्मचारी, अधिकारी व हॅलक्रो कंपनीचे अधिकारी यांनी बंद खोलीत हा आराखडा तयार केला. जनमताचा आदर करीत शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असलेला हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करावा, अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केली.जनमत चाचणीची मतमोजणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चालली. शनिवारी सकाळी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. एकूण ५ लाख १४ हजार १६९ नागरिकांनी मतदान केले होते. यापैकी तब्बल ४ लाख ५५ हजार ५४२ नागरिकांनी हा आराखडा अन्यायकारक असल्याचे मत दिले आहे तर ५८ हजार ६२७ नागरिकांनी आराखड्याचे समर्थन केले आहे. या आकडेवारीवरून जनमत आराखड्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे म्हणाले, नागरिकांना विकासाची स्वप्ने दाखविणे सुरू आहे. नागरिकांचे अधिकार हिरावून घेण्याचे प्रकार सरकारने बंद करावे, अन्यथा जनतेचा सरकारवरील विश्वास उडेल, असा इशाराही त्यांनी दिला. जय जवान जय किसान संघटनेचे मुख्य संयोजक प्रशांत पवार म्हणाले, मेट्रोरिजन आराखड्याच्या माध्यमातून ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकार गोठवण्याचे षड्यंत्र नागरिकांच्या लक्षात आले आहे. या आराखड्यामुळे ग्रामीण भागातील २ लाख घरे व १० लाख भूखंड अनधिकृत ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी या घरांचे व भूखंडांचे व्यवहार थांबविले आहेत. शेवटी जनतेच्या आक्रोशाची दखल घेत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला खरेदी-विक्री बंदचा आदेश बेकायदेशीर होता, असा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी पवार यांनी केली. (प्रतिनिधी)