शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले : मुन्ना यादववर कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:40 IST

सत्तेत असताना नागपूरचा तुम्ही विकास केला नाही आणि आता तो होत असताना पोटात दुखत असल्याने माझ्याआड नागपूरच्या बदनामीचा डाव रचत आहात, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना ठणकावले. राज्यभरात गुन्हेगारी कमी झाल्याची आकडेवारीच त्यांनी सादर केली.

ठळक मुद्देमाझ्याआड नागपूरच्या बदनामीचा डावराज्यातील गुन्हेगारीत घट झाल्याची दिली आकडेवारी

आॅनलाईन लोकमतनागपूर - सत्तेत असताना नागपूरचा तुम्ही विकास केला नाही आणि आता तो होत असताना पोटात दुखत असल्याने माझ्याआड नागपूरच्या बदनामीचा डाव रचत आहात, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना ठणकावले. राज्यभरात गुन्हेगारी कमी झाल्याची आकडेवारीच त्यांनी सादर केली.इतकी वर्षे नागपूरवर तुम्ही अन्याय केला. आता अखिल भारतात नागपूरला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असे सांगून, ‘मला लक्ष्य करण्यासाठी माझ्या शहराला लक्ष्य करू नका, असे आवाहन त्यांनी केले. कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री उत्तर देत होते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती नियंत्रणात आहे आणि ती उत्तम राखणे सरकारसाठी सर्वोपरी असल्याचे ते म्हणाले.नागपुरातील भाजपाचा नेता आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष मुन्ना यादव याला राजाश्रय असल्याचा आरोप करीत विरोधकांनी चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. आज उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले की, मुन्ना यादवच्या बचावाचे काहीच कारण नाही. गुन्हेगार असेल तर आज ना उद्या १०० टक्के कारवाई होणारच. आतापर्यंत कारवाईत पोलिसांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. ते स्वत:चा बचाव करतील. मुळात सध्याचा गुन्हा हा त्यांच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या मारहाणीवरून दाखल झाला आहे. त्यांना विरोधक कुख्यात गुंड म्हणतात पण त्यांच्यावर आधी दाखल झालेले गुन्हे त्या स्वरुपाचे नाहीत, असे ते म्हणाले. नागपुरातील गुन्हेगारी घटल्याचे सांगताना त्यांनी तिरपुडे इन्स्टिट्यूटचा अहवालही सभागृहात ठेवला. नागपूरची बदनामी विनाकारण झाली तर येणारी गुंतवणूक अन्यत्र जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.गुन्हेगारी घटल्याची दिली आकडेवारीएनसीआरबीचा अहवाल देत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हेगारी घटल्याची आकडेवारीच दिली, खून, दरोडा, दंगल, दखलपात्र गुन्हे, अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार, महिलांचे अपहरण, बलात्काराचे प्रमाण आमच्या सरकारमध्ये तर दरवर्षी घटत आहेच पण आघाडी सरकारच्या तुलनेतही ते कमीच आहे, असे ते म्हणाले. कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या सहातदेखील नाही. क्रमांक एकवर असल्याचा विरोधकांचा दावा फोलच आहे. गुन्हासिद्धतेचे प्रमाण आघाडी सरकारमध्ये १५ टक्क्यांवर कधीही गेले नाही. ते आज ३४.८ टक्क्यांवर गेले आहे. राज्य पोलिसांनी राबवलेल्या आॅपरेशन मुस्कान अंतर्गत २०११२ बेपत्ता मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.नगरसेवक सावंतविरुद्ध लावणार मकोकामुन्ना यादववरून मुख्यमंत्र्यांना घेरणारे माजी मंत्री राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नगरसेवक सचिन सावंत यांची आठवण करून देत चिमटा काढला. खून, खुनाचे प्रयत्न, गंभीर दुखापतीचे गुन्हे सचिन सावंतविरुद्ध दाखल आहेत. तो तुमच्या जवळचा आहे असे लोक म्हणतात. ‘आम्ही त्याला मकोका लावणार आहोतच, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. लोक म्हणतात म्हणून सावंत तुमच्या जवळचा ठरत नाही तसेच मुन्ना यादव माझा मतदारसंघ सांभाळतो वगैरेवर विश्वास ठेवू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.कोथळे मृत्यूप्रकरणी कारवाई निष्पक्षचसांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशी केली जाईल. कोणत्याही पोलीस कर्मचाºयाला पाठीशी घातले जाणार नाही. पाच पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.आगेप्रकरणी अपीलअहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयात सरकार दाद मागणार आहे. त्यासाठी नामवंत वकील शासन देईल. त्याबाबत नितीनच्या वडिलांशी आपली चर्चा झाली आहे. या हत्येप्रकरणी फितूर झालेल्या १३ साक्षीदारांविरुद्ध येत्या एक महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असे ते म्हणाले.अश्विनी बिद्रेच्या जीवाचे बरेवाईट झाल्याचा संशयनवी मुंबईतील बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्याचा संशय पोलिसांना तपासामध्ये आलेला आहे, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. बिद्रे बेपत्ता झाल्यानंतरच्या तीन दिवसात त्यांच्या आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या मोबाईलचे लोकेशन एकच होते. बिद्रे यांच्या लॅपटॉपमधील मजकूर, व्हिडीओ कॉलिंगच्या तपासात कुरुंदकर आणि त्यांच्यातील संबंध निश्चितपणे प्रस्थापित होतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.सोशल मीडियाच्या गैरवापरावर सरकार कारवाई करणारचदेव गायकवाड या व्यक्तीने मध्यंतरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध काही पोस्ट टाकल्या होत्या. प्रत्यक्ष तपासात ती व्यक्ती महादेव बालगुडे असल्याचे सिद्ध झाले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या पोस्ट शेअर करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या, त्यात एक पत्रकारदेखील होता. सोशल मीडियाचा गैरवापर दंगली घडविण्याच्या, सामाजिक अशांततेसाठी केला जात असेल तर कारवाई ही केलीच जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. बालगुडे हा बारामतीचा आहे आणि तो राष्ट्रवादीच्या शिबिरात होता म्हणून तो अजित पवारांच्या जवळचा आहे, असे समजण्याचे कारण नाही, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस