शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले : मुन्ना यादववर कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:40 IST

सत्तेत असताना नागपूरचा तुम्ही विकास केला नाही आणि आता तो होत असताना पोटात दुखत असल्याने माझ्याआड नागपूरच्या बदनामीचा डाव रचत आहात, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना ठणकावले. राज्यभरात गुन्हेगारी कमी झाल्याची आकडेवारीच त्यांनी सादर केली.

ठळक मुद्देमाझ्याआड नागपूरच्या बदनामीचा डावराज्यातील गुन्हेगारीत घट झाल्याची दिली आकडेवारी

आॅनलाईन लोकमतनागपूर - सत्तेत असताना नागपूरचा तुम्ही विकास केला नाही आणि आता तो होत असताना पोटात दुखत असल्याने माझ्याआड नागपूरच्या बदनामीचा डाव रचत आहात, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना ठणकावले. राज्यभरात गुन्हेगारी कमी झाल्याची आकडेवारीच त्यांनी सादर केली.इतकी वर्षे नागपूरवर तुम्ही अन्याय केला. आता अखिल भारतात नागपूरला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असे सांगून, ‘मला लक्ष्य करण्यासाठी माझ्या शहराला लक्ष्य करू नका, असे आवाहन त्यांनी केले. कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री उत्तर देत होते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती नियंत्रणात आहे आणि ती उत्तम राखणे सरकारसाठी सर्वोपरी असल्याचे ते म्हणाले.नागपुरातील भाजपाचा नेता आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष मुन्ना यादव याला राजाश्रय असल्याचा आरोप करीत विरोधकांनी चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. आज उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले की, मुन्ना यादवच्या बचावाचे काहीच कारण नाही. गुन्हेगार असेल तर आज ना उद्या १०० टक्के कारवाई होणारच. आतापर्यंत कारवाईत पोलिसांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. ते स्वत:चा बचाव करतील. मुळात सध्याचा गुन्हा हा त्यांच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या मारहाणीवरून दाखल झाला आहे. त्यांना विरोधक कुख्यात गुंड म्हणतात पण त्यांच्यावर आधी दाखल झालेले गुन्हे त्या स्वरुपाचे नाहीत, असे ते म्हणाले. नागपुरातील गुन्हेगारी घटल्याचे सांगताना त्यांनी तिरपुडे इन्स्टिट्यूटचा अहवालही सभागृहात ठेवला. नागपूरची बदनामी विनाकारण झाली तर येणारी गुंतवणूक अन्यत्र जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.गुन्हेगारी घटल्याची दिली आकडेवारीएनसीआरबीचा अहवाल देत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हेगारी घटल्याची आकडेवारीच दिली, खून, दरोडा, दंगल, दखलपात्र गुन्हे, अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार, महिलांचे अपहरण, बलात्काराचे प्रमाण आमच्या सरकारमध्ये तर दरवर्षी घटत आहेच पण आघाडी सरकारच्या तुलनेतही ते कमीच आहे, असे ते म्हणाले. कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या सहातदेखील नाही. क्रमांक एकवर असल्याचा विरोधकांचा दावा फोलच आहे. गुन्हासिद्धतेचे प्रमाण आघाडी सरकारमध्ये १५ टक्क्यांवर कधीही गेले नाही. ते आज ३४.८ टक्क्यांवर गेले आहे. राज्य पोलिसांनी राबवलेल्या आॅपरेशन मुस्कान अंतर्गत २०११२ बेपत्ता मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.नगरसेवक सावंतविरुद्ध लावणार मकोकामुन्ना यादववरून मुख्यमंत्र्यांना घेरणारे माजी मंत्री राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नगरसेवक सचिन सावंत यांची आठवण करून देत चिमटा काढला. खून, खुनाचे प्रयत्न, गंभीर दुखापतीचे गुन्हे सचिन सावंतविरुद्ध दाखल आहेत. तो तुमच्या जवळचा आहे असे लोक म्हणतात. ‘आम्ही त्याला मकोका लावणार आहोतच, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. लोक म्हणतात म्हणून सावंत तुमच्या जवळचा ठरत नाही तसेच मुन्ना यादव माझा मतदारसंघ सांभाळतो वगैरेवर विश्वास ठेवू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.कोथळे मृत्यूप्रकरणी कारवाई निष्पक्षचसांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशी केली जाईल. कोणत्याही पोलीस कर्मचाºयाला पाठीशी घातले जाणार नाही. पाच पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.आगेप्रकरणी अपीलअहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयात सरकार दाद मागणार आहे. त्यासाठी नामवंत वकील शासन देईल. त्याबाबत नितीनच्या वडिलांशी आपली चर्चा झाली आहे. या हत्येप्रकरणी फितूर झालेल्या १३ साक्षीदारांविरुद्ध येत्या एक महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असे ते म्हणाले.अश्विनी बिद्रेच्या जीवाचे बरेवाईट झाल्याचा संशयनवी मुंबईतील बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्याचा संशय पोलिसांना तपासामध्ये आलेला आहे, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. बिद्रे बेपत्ता झाल्यानंतरच्या तीन दिवसात त्यांच्या आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या मोबाईलचे लोकेशन एकच होते. बिद्रे यांच्या लॅपटॉपमधील मजकूर, व्हिडीओ कॉलिंगच्या तपासात कुरुंदकर आणि त्यांच्यातील संबंध निश्चितपणे प्रस्थापित होतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.सोशल मीडियाच्या गैरवापरावर सरकार कारवाई करणारचदेव गायकवाड या व्यक्तीने मध्यंतरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध काही पोस्ट टाकल्या होत्या. प्रत्यक्ष तपासात ती व्यक्ती महादेव बालगुडे असल्याचे सिद्ध झाले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या पोस्ट शेअर करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या, त्यात एक पत्रकारदेखील होता. सोशल मीडियाचा गैरवापर दंगली घडविण्याच्या, सामाजिक अशांततेसाठी केला जात असेल तर कारवाई ही केलीच जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. बालगुडे हा बारामतीचा आहे आणि तो राष्ट्रवादीच्या शिबिरात होता म्हणून तो अजित पवारांच्या जवळचा आहे, असे समजण्याचे कारण नाही, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस