शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, बाबासाहेब आयुष्यभर जनकल्याणाकरिता झटले : न्या. सुनील शुक्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:57 IST

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनकल्याणाकरिता आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजाकरिता संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान कधीच विसरल्या जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनकल्याणाकरिता आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजाकरिता संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान कधीच विसरल्या जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी व्यक्त केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे कर्मचारी, सरकारी वकील कार्यालय, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी या तिन्ही महापुरुषांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. न्यायमूर्ती विनय देशपांडे, असिस्टंट सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर, मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, हायकोर्ट वेलफेयर कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. शैलेश नारनवरे व हायकोर्ट मिनिस्टेरियल ऑफिसर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष व्ही. बी. फरकाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तिन्ही महापुरुषांची दूरदृष्टी आश्चर्यकारक होती. त्यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घेतले. त्यांनी निर्माण केलेला आदर्श येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. आपणही या महापुरुषांचे विचार अंगिकारून त्यानुसार वाटचाल केली पाहिजे, असे न्या. शुक्रे यांनी पुढे बोलताना सांगितले.तिन्ही महापुरुषांमध्ये दोन गोष्टी समान होत्या. त्यांनी गुलामगिरीची बंधने झुगारली व स्त्रियांचा आदर करणे शिकविले, असे मत न्या. देशपांडे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे मोकळी करून दिली तर, बाबासाहेबांनी या देशाला बळकट लोकशाही दिली, असे अ‍ॅड. किलोर यांनी सांगितले.तिन्ही महापुरुषांनी जीवनभर समाजातील कमजोर वर्गाला न्याय देण्याचे कार्य केले. हे कार्य करीत असताना त्यांनी परिणामांची तमा बाळगली नाही, अशा भावना अ‍ॅड. देवपुजारी यांनी व्यक्त केल्या. हे तिन्ही महापुरुष महाराष्ट्राचे सुपुत्र असून, आज त्यांचे नाव संपूर्ण जगात घेतले जाते. त्यांनी देशाचे राजकारण व समाजकारणाला दिशा दिली, असे अ‍ॅड. औरंगाबादकर यांनी सांगितले. फरकाडे यांनी स्वागतपर मार्गदर्शन, अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी प्रास्ताविक, हर्षा पाटील यांनी संचालन तर, दीप्ती दावडा यांनी आभार व्यक्त केले.अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांची जनसेवातिन्ही महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून जनसेवा करण्याचा संकल्प अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी यावर्षीही पाळला. त्यांनी वडील रामाजी व आई जिजाबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उच्च न्यायालयातील पक्षकारांसाठी १२ स्टील बेंचेस आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ३० स्टील खुर्च्या भेट दिल्या. यापूर्वी त्यांनी उच्च न्यायालयातील पोलीस चौकीला वॉटर कूलर भेट दिले होते. याशिवायही ते विविध प्रकारचे सामाजिक कार्य करीत राहतात.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती