शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, बाबासाहेब आयुष्यभर जनकल्याणाकरिता झटले : न्या. सुनील शुक्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:57 IST

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनकल्याणाकरिता आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजाकरिता संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान कधीच विसरल्या जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनकल्याणाकरिता आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजाकरिता संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान कधीच विसरल्या जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी व्यक्त केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे कर्मचारी, सरकारी वकील कार्यालय, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी या तिन्ही महापुरुषांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. न्यायमूर्ती विनय देशपांडे, असिस्टंट सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर, मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, हायकोर्ट वेलफेयर कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. शैलेश नारनवरे व हायकोर्ट मिनिस्टेरियल ऑफिसर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष व्ही. बी. फरकाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तिन्ही महापुरुषांची दूरदृष्टी आश्चर्यकारक होती. त्यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घेतले. त्यांनी निर्माण केलेला आदर्श येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. आपणही या महापुरुषांचे विचार अंगिकारून त्यानुसार वाटचाल केली पाहिजे, असे न्या. शुक्रे यांनी पुढे बोलताना सांगितले.तिन्ही महापुरुषांमध्ये दोन गोष्टी समान होत्या. त्यांनी गुलामगिरीची बंधने झुगारली व स्त्रियांचा आदर करणे शिकविले, असे मत न्या. देशपांडे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे मोकळी करून दिली तर, बाबासाहेबांनी या देशाला बळकट लोकशाही दिली, असे अ‍ॅड. किलोर यांनी सांगितले.तिन्ही महापुरुषांनी जीवनभर समाजातील कमजोर वर्गाला न्याय देण्याचे कार्य केले. हे कार्य करीत असताना त्यांनी परिणामांची तमा बाळगली नाही, अशा भावना अ‍ॅड. देवपुजारी यांनी व्यक्त केल्या. हे तिन्ही महापुरुष महाराष्ट्राचे सुपुत्र असून, आज त्यांचे नाव संपूर्ण जगात घेतले जाते. त्यांनी देशाचे राजकारण व समाजकारणाला दिशा दिली, असे अ‍ॅड. औरंगाबादकर यांनी सांगितले. फरकाडे यांनी स्वागतपर मार्गदर्शन, अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी प्रास्ताविक, हर्षा पाटील यांनी संचालन तर, दीप्ती दावडा यांनी आभार व्यक्त केले.अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांची जनसेवातिन्ही महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून जनसेवा करण्याचा संकल्प अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी यावर्षीही पाळला. त्यांनी वडील रामाजी व आई जिजाबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उच्च न्यायालयातील पक्षकारांसाठी १२ स्टील बेंचेस आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ३० स्टील खुर्च्या भेट दिल्या. यापूर्वी त्यांनी उच्च न्यायालयातील पोलीस चौकीला वॉटर कूलर भेट दिले होते. याशिवायही ते विविध प्रकारचे सामाजिक कार्य करीत राहतात.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती