शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

'रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 12:02 IST

महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले.

ठळक मुद्देसरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दाबवा टाकणे सुरू

नागपूर : रेशनवरील धान्य वितरणातील घोळाची अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे भुजबळ यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

रेशन धान्य वितरणातील घोटाळा अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची शिफारस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले. दिल्लीतून कुणाला पाठवले आणि कारवाई केली असे आमच्या सरकारमध्ये होत नाही. येथे लोकशाही आहे, असा टोलाही त्यांनी केंद्रातील भाजपला लगावला.

शिवसेना ओबीसींसाठी सोडली

गडचिरोलीत आयोजित राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या मेळाव्याला रवाना होताना ते म्हणाले, मी शिवसेनाच ओबीसीच्या कारणांमुळे सोडली. तेव्हा नागपुरात कुठे कुठे गेलो होतो ते सर्वांना माहीत आहे. जीवाशी खेळून त्यावेळी मी पक्षांतर केले. तेव्हापासून आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहे. ओबीसींना आरक्षण लागू झाले तेव्हापासून ओबीसी विरोधक न्यायालयात जात आहेत. महाविकास आघाडी सरकार ओबीसींसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दबाव टाकणे, धाडी टाकणे सुरू आहे. आमच्यावेळेससुद्धा जेलमध्ये गेल्यावरही धाडी टाकण्यात आल्या. छोट्या छोट्या घरात आयटीचे अधिकारी बसतात. शत्रुत्वाच्या भावनेतून हे करणे सुरू आहे. गेल्या ७५ वर्षात पहिल्यांदाच देशात अशा प्रकारचे वातावरण तयार झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरामुळे भाजपची प्रतिमा लोकांमध्ये डागाळेल, असा दावा करीत याचा विचार फडणवीस यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे. सरकार पडण्याची भीती नाही, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळ