शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

'रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 12:02 IST

महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले.

ठळक मुद्देसरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दाबवा टाकणे सुरू

नागपूर : रेशनवरील धान्य वितरणातील घोळाची अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे भुजबळ यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

रेशन धान्य वितरणातील घोटाळा अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची शिफारस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले. दिल्लीतून कुणाला पाठवले आणि कारवाई केली असे आमच्या सरकारमध्ये होत नाही. येथे लोकशाही आहे, असा टोलाही त्यांनी केंद्रातील भाजपला लगावला.

शिवसेना ओबीसींसाठी सोडली

गडचिरोलीत आयोजित राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या मेळाव्याला रवाना होताना ते म्हणाले, मी शिवसेनाच ओबीसीच्या कारणांमुळे सोडली. तेव्हा नागपुरात कुठे कुठे गेलो होतो ते सर्वांना माहीत आहे. जीवाशी खेळून त्यावेळी मी पक्षांतर केले. तेव्हापासून आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहे. ओबीसींना आरक्षण लागू झाले तेव्हापासून ओबीसी विरोधक न्यायालयात जात आहेत. महाविकास आघाडी सरकार ओबीसींसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दबाव टाकणे, धाडी टाकणे सुरू आहे. आमच्यावेळेससुद्धा जेलमध्ये गेल्यावरही धाडी टाकण्यात आल्या. छोट्या छोट्या घरात आयटीचे अधिकारी बसतात. शत्रुत्वाच्या भावनेतून हे करणे सुरू आहे. गेल्या ७५ वर्षात पहिल्यांदाच देशात अशा प्रकारचे वातावरण तयार झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरामुळे भाजपची प्रतिमा लोकांमध्ये डागाळेल, असा दावा करीत याचा विचार फडणवीस यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे. सरकार पडण्याची भीती नाही, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळ