शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 12:02 IST

महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले.

ठळक मुद्देसरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दाबवा टाकणे सुरू

नागपूर : रेशनवरील धान्य वितरणातील घोळाची अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे भुजबळ यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

रेशन धान्य वितरणातील घोटाळा अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची शिफारस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले. दिल्लीतून कुणाला पाठवले आणि कारवाई केली असे आमच्या सरकारमध्ये होत नाही. येथे लोकशाही आहे, असा टोलाही त्यांनी केंद्रातील भाजपला लगावला.

शिवसेना ओबीसींसाठी सोडली

गडचिरोलीत आयोजित राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या मेळाव्याला रवाना होताना ते म्हणाले, मी शिवसेनाच ओबीसीच्या कारणांमुळे सोडली. तेव्हा नागपुरात कुठे कुठे गेलो होतो ते सर्वांना माहीत आहे. जीवाशी खेळून त्यावेळी मी पक्षांतर केले. तेव्हापासून आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहे. ओबीसींना आरक्षण लागू झाले तेव्हापासून ओबीसी विरोधक न्यायालयात जात आहेत. महाविकास आघाडी सरकार ओबीसींसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दबाव टाकणे, धाडी टाकणे सुरू आहे. आमच्यावेळेससुद्धा जेलमध्ये गेल्यावरही धाडी टाकण्यात आल्या. छोट्या छोट्या घरात आयटीचे अधिकारी बसतात. शत्रुत्वाच्या भावनेतून हे करणे सुरू आहे. गेल्या ७५ वर्षात पहिल्यांदाच देशात अशा प्रकारचे वातावरण तयार झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरामुळे भाजपची प्रतिमा लोकांमध्ये डागाळेल, असा दावा करीत याचा विचार फडणवीस यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे. सरकार पडण्याची भीती नाही, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळ