शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 12:02 IST

महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले.

ठळक मुद्देसरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दाबवा टाकणे सुरू

नागपूर : रेशनवरील धान्य वितरणातील घोळाची अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे भुजबळ यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

रेशन धान्य वितरणातील घोटाळा अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची शिफारस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले. दिल्लीतून कुणाला पाठवले आणि कारवाई केली असे आमच्या सरकारमध्ये होत नाही. येथे लोकशाही आहे, असा टोलाही त्यांनी केंद्रातील भाजपला लगावला.

शिवसेना ओबीसींसाठी सोडली

गडचिरोलीत आयोजित राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या मेळाव्याला रवाना होताना ते म्हणाले, मी शिवसेनाच ओबीसीच्या कारणांमुळे सोडली. तेव्हा नागपुरात कुठे कुठे गेलो होतो ते सर्वांना माहीत आहे. जीवाशी खेळून त्यावेळी मी पक्षांतर केले. तेव्हापासून आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहे. ओबीसींना आरक्षण लागू झाले तेव्हापासून ओबीसी विरोधक न्यायालयात जात आहेत. महाविकास आघाडी सरकार ओबीसींसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दबाव टाकणे, धाडी टाकणे सुरू आहे. आमच्यावेळेससुद्धा जेलमध्ये गेल्यावरही धाडी टाकण्यात आल्या. छोट्या छोट्या घरात आयटीचे अधिकारी बसतात. शत्रुत्वाच्या भावनेतून हे करणे सुरू आहे. गेल्या ७५ वर्षात पहिल्यांदाच देशात अशा प्रकारचे वातावरण तयार झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरामुळे भाजपची प्रतिमा लोकांमध्ये डागाळेल, असा दावा करीत याचा विचार फडणवीस यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे. सरकार पडण्याची भीती नाही, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळ