शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

७४ वर्षांनंतर चित्ता भारतात परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

संजय रानडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर – जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी ओळख असलेला चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात ...

संजय रानडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी ओळख असलेला चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात परतणार आहे. १९५२ साली भारतीय सरकारने चित्त्याला नामशेष प्राणी घोषित केले होते. आता दक्षिण अफ्रिकेतून १४ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये आणण्यात येणार आहेत. एनटीसीएने (नॅशनल टायगर कन्सर्व्हेशन ऑथोरिटी) प्रोजेक्ट चित्ताच्या पहिल्या टप्प्यासाठी १४ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. देशाच्या वन्यजीव इतिहासातील हे एक मोठे पाऊल राहणार आहे.

मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि मध्य प्रदेशचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आलोक कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देशात चित्ते परत येत आहेत ही सकारात्मक बाब आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशात होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. एनटीसीएचे वन उपमहानिरीक्षक राजेंद्र गारवाड यांनी प्रोजेक्ट चित्ताच्या पहिल्या वर्षासाठी १४ कोटींचा निधी मंजूर केल्याचे पत्र १७ मे रोजी दिले आहे, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

पहिल्या टप्प्यात जनावरांची आंतरराष्ट्रीय वाहतूक, क्षेत्रीय देखरेख व लॉजिस्टिक, कुंपण, क्षमतावर्धन इत्यादींचा समावेश राहणार आहे. चालू आर्थिक वर्षातील वार्षिक योजना केवळ प्राधान्यक्रमातील बाबींपुरती मर्यादित असेल असेदेखील कुमार यांनी स्पष्ट केले.

दक्षिण अफ्रिकेचे तज्ज्ञ व्हिन्सेंट यांनी २६ एप्रिल २०२१ रोजी कुनो पालपूर नॅशनल पार्कला भेट दिली व संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात १४ प्रौढ जंगली चित्यांना दक्षिण अफ्रिकेतील जंगलांमधून पकडल्या जाईल व त्यांना भारतात पाठविण्यात येईल. नोव्हेंबर २०२१ मध्ये ते कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये पोहोचतील. या चित्त्यांना सुरुवातीला पाच चौरस किलोमीटरच्या भागात ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती आलोक कुमार यांनी दिली.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सुकाणू समितीच्या उपसमितीने मध्य प्रदेशसह झारखंड आणि राजस्थानमध्ये चित्ते आणता येतील का याची चाचपणी केली होती. त्यात कुनो पालपूर नॅशनल पार्क सर्वात योग्य स्थान असल्याचे आढळले. केंद्र शासनाने लुप्तप्राय वन्यजीव ट्रस्ट, मध्यप्रदेश वन विभाग, एनटीसीए आणि भारतीय वन्यजीव संस्था यांना प्रोजेक्ट चित्ताची जबाबदारी दिली आहे.

१९४७ मध्ये झाली होती चित्त्याची अखेरची शिकार

एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात एशियाटिक चित्त्यांचे प्रमाण वाढले होते. भारत व मध्यपूर्वेतील देशांत आढळणाऱ्या प्राण्यांत त्यांचा समावेश होता. मात्र त्यानंतर शिकारीमुळे चित्त्यांचे प्रमाण कमी व्हायला लागले. १९४७ साली कोरिआ येथे महाराज नामानुज प्रताप सिंह देव यांनी देशातील अखेरच्या तीन चित्त्यांची शिकार केली होती.

असा असतो चित्ता

चित्ता हा मूळतः अफ्रिका व मध्य इराणमधील मार्जारकुळातील प्राणी आहे. सर्वात वेगवान प्राणी असलेला चित्ता ८० ते १२८ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असतात. ९३ ते ९८ किलोमीटर प्रतितास या चित्त्याच्या वेगाची वेळ नोंदविण्यात आली आहे. प्रौढ चित्त्यांचे वजन २० ते ६५ किलो दरम्यान असते. चित्त्याचे डोके लहान व गोलाकार असते तर चेहऱ्यावर काळ्या अश्रूंसारखे पट्टे असतात. चित्त्याच्या चार उपप्रजाती शोधण्यात आल्या आहेत. चित्ता व मांजराच्या कुळातील इतर प्राण्यांमधील सर्वात उल्लेखनीय फरक हा असतो की त्यांच्याकडे मागे घेण्यासारखे पंजे असतात. यामुळेच चित्ता वेगाने धावत असतानादेखील जमिनीवर पकड घेऊ शकतो.