शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
3
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
4
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
5
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
6
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
7
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
8
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
9
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
10
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
11
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
12
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
13
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
15
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
16
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
17
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
18
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
19
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
20
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...

७४ वर्षांनंतर चित्ता भारतात परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

संजय रानडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर – जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी ओळख असलेला चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात ...

संजय रानडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी ओळख असलेला चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात परतणार आहे. १९५२ साली भारतीय सरकारने चित्त्याला नामशेष प्राणी घोषित केले होते. आता दक्षिण अफ्रिकेतून १४ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये आणण्यात येणार आहेत. एनटीसीएने (नॅशनल टायगर कन्सर्व्हेशन ऑथोरिटी) प्रोजेक्ट चित्ताच्या पहिल्या टप्प्यासाठी १४ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. देशाच्या वन्यजीव इतिहासातील हे एक मोठे पाऊल राहणार आहे.

मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि मध्य प्रदेशचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आलोक कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देशात चित्ते परत येत आहेत ही सकारात्मक बाब आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशात होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. एनटीसीएचे वन उपमहानिरीक्षक राजेंद्र गारवाड यांनी प्रोजेक्ट चित्ताच्या पहिल्या वर्षासाठी १४ कोटींचा निधी मंजूर केल्याचे पत्र १७ मे रोजी दिले आहे, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

पहिल्या टप्प्यात जनावरांची आंतरराष्ट्रीय वाहतूक, क्षेत्रीय देखरेख व लॉजिस्टिक, कुंपण, क्षमतावर्धन इत्यादींचा समावेश राहणार आहे. चालू आर्थिक वर्षातील वार्षिक योजना केवळ प्राधान्यक्रमातील बाबींपुरती मर्यादित असेल असेदेखील कुमार यांनी स्पष्ट केले.

दक्षिण अफ्रिकेचे तज्ज्ञ व्हिन्सेंट यांनी २६ एप्रिल २०२१ रोजी कुनो पालपूर नॅशनल पार्कला भेट दिली व संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात १४ प्रौढ जंगली चित्यांना दक्षिण अफ्रिकेतील जंगलांमधून पकडल्या जाईल व त्यांना भारतात पाठविण्यात येईल. नोव्हेंबर २०२१ मध्ये ते कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये पोहोचतील. या चित्त्यांना सुरुवातीला पाच चौरस किलोमीटरच्या भागात ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती आलोक कुमार यांनी दिली.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सुकाणू समितीच्या उपसमितीने मध्य प्रदेशसह झारखंड आणि राजस्थानमध्ये चित्ते आणता येतील का याची चाचपणी केली होती. त्यात कुनो पालपूर नॅशनल पार्क सर्वात योग्य स्थान असल्याचे आढळले. केंद्र शासनाने लुप्तप्राय वन्यजीव ट्रस्ट, मध्यप्रदेश वन विभाग, एनटीसीए आणि भारतीय वन्यजीव संस्था यांना प्रोजेक्ट चित्ताची जबाबदारी दिली आहे.

१९४७ मध्ये झाली होती चित्त्याची अखेरची शिकार

एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात एशियाटिक चित्त्यांचे प्रमाण वाढले होते. भारत व मध्यपूर्वेतील देशांत आढळणाऱ्या प्राण्यांत त्यांचा समावेश होता. मात्र त्यानंतर शिकारीमुळे चित्त्यांचे प्रमाण कमी व्हायला लागले. १९४७ साली कोरिआ येथे महाराज नामानुज प्रताप सिंह देव यांनी देशातील अखेरच्या तीन चित्त्यांची शिकार केली होती.

असा असतो चित्ता

चित्ता हा मूळतः अफ्रिका व मध्य इराणमधील मार्जारकुळातील प्राणी आहे. सर्वात वेगवान प्राणी असलेला चित्ता ८० ते १२८ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असतात. ९३ ते ९८ किलोमीटर प्रतितास या चित्त्याच्या वेगाची वेळ नोंदविण्यात आली आहे. प्रौढ चित्त्यांचे वजन २० ते ६५ किलो दरम्यान असते. चित्त्याचे डोके लहान व गोलाकार असते तर चेहऱ्यावर काळ्या अश्रूंसारखे पट्टे असतात. चित्त्याच्या चार उपप्रजाती शोधण्यात आल्या आहेत. चित्ता व मांजराच्या कुळातील इतर प्राण्यांमधील सर्वात उल्लेखनीय फरक हा असतो की त्यांच्याकडे मागे घेण्यासारखे पंजे असतात. यामुळेच चित्ता वेगाने धावत असतानादेखील जमिनीवर पकड घेऊ शकतो.