शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

‘चॅटजीपीटी’ धोकादायक, ‘सी-२०’च्या मंचावर मंथन, देश-विदेशातील तज्ज्ञांनी मांडले दुष्परिणाम

By योगेश पांडे | Updated: March 22, 2023 11:33 IST

‘लाँग टर्म’ परिणामांचा विचार करण्याचा सूर

नागपूर : ‘सबकुछ ऑनलाइन’च्या जमान्यात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चे महत्त्व वाढत असून, येणारा काळ हा ‘चॅटजीपीटी’सारख्या ‘एआय बेस्ड’ तंत्रज्ञानाचा राहणार आहे. जगभरातून अनेकांकडून ‘चॅटजीपीटी’च्या दुष्परिणामांविरोधात आवाज उठविण्यात येत असताना नागपुरात ‘सी-२० समिट’च्या मंचावरदेखील याच्या एकांगीपणाबाबत सखोल मंथन झाले. पुढील पिढ्यांना नैतिकतेचे संस्कार द्यायचे असतील तर अशा तंत्रज्ञानाच्या ‘लाँग टर्म’ परिणामांचा विचार करण्यात यावा व एकांगी तंत्रज्ञानात आवश्यक ते बदल करण्यात यावे, असा तज्ज्ञांचा सूर होता.

‘सी-२०’च्या मंचावर मंगळवारी झालेल्या सत्रांदरम्यान देशविदेशातील प्रतिनिधींनी ‘चॅटजीपीटी’चा मुद्दा उपस्थित केला. ‘चॅटजीपीटी’चे तंत्रज्ञान विकसित करण्यात काही विशिष्ट देशांनी आघाडी घेतली आहे व त्यांनी या माध्यमातून त्यांची विचारसरणी थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच अनेक प्रश्नांना एकांगी उत्तरे देण्यात येतात. यातून अनेकांच्या धार्मिक भावनादेखील दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. तेथील तंत्रज्ञांनी ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये जे ‘फीड’ केले आहे त्यानुसारच नवीन पिढीसमोर माहिती जात आहे. अगदी मुलांच्या ‘सेक्स चेंज ऑपरेशन’सारख्या प्रश्नांवर त्याचे धोके न सांगता अशा शस्त्रक्रिया करण्याची मुलांची ‘चॉईस’ आहे असे सांगण्यात येते. २१ वर्षांपर्यंतच्या नियमांचा दाखलादेखील यात देण्यात येत नाही. कमर्शिअलायझेशनवर आधारित अनेक उत्तरे येतात. या तंत्रज्ञानात नैतिकतेला कुठेही स्थान देण्यात आलेले नाही व भविष्यात ही गोष्ट धोकादायक ठरू शकते, अशी भूमिका तज्ज्ञांनी मांडली.

संवेदनशील विषयांसाठी ‘चॅटजीपीटी’ नकोच

या मंथनात जगभरातील विविध धार्मिक, सामाजिक संवेदनशील विषयांवरील माहितीसाठी ‘चॅटजीपीटी’चा उपयोग फार धोकादायक ठरू शकतो. अनेकांच्या भावना दुखावणारी माहिती यातून समोर येते व हीच खरी असल्याच दावा केला जातो. यातून नवीन पिढ्यांपर्यंत चुकीची माहिती जात असल्याचे मत काही तज्ज्ञांनी मांडले.

वेळ जायच्या आत तंत्रज्ञानात बदल आवश्यक

हे संगणकाचे युग असून, तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. मात्र सर्वच तंत्रज्ञान दोषरहित आहे असे म्हणता येणार नाही. ‘चॅटजीपीटी’ हे भविष्य मानले जाते. याचा उपयोग वाढेल हे निश्चित. मात्र, यातून नवीन पिढ्यांपर्यंत अयोग्य माहिती जाणे चुकीचे ठरेल. त्यामुळे वेळ जायच्या आत ‘चॅटजीपीटी’च्या तंत्रज्ञानात आवश्यक बदल करायला हवेत. समाजाची एकात्मता व शांती लक्षात घेऊन धोरण ठरवायला हवे, हाच ‘सी-२० समिट’मधील सूर होता, अशी माहिती विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :nagpurनागपूरtechnologyतंत्रज्ञान