शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

काम न करणाऱ्यांना बदलणार

By admin | Updated: August 20, 2016 02:20 IST

काँग्रेसची शहर कार्यकारिणी गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाहीर केली.

काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत अनेकांची संधी हुकली : नगरसेवकांचा समावेश नाही नागपूर : काँग्रेसची शहर कार्यकारिणी गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाहीर केली. मात्र, ही कार्यकारिणी कायम स्वरुपी नसेल. दर महिन्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. जे काम करणार नाही, पक्षाच्या बैठकींना, आंदोलनांना उपस्थित राहणार नाही, अशा पदाधिकाऱ्यांना बदलले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी तसे निर्देश शहर अध्यक्षांना दिले आहेत. शहर कार्यकारिणीत विद्यमान नगरसेवकांना स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे काही नगरसेवकांनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर काही मतांनी पराभूत झालेल्या बऱ्याच उमेदवारांना पद देऊन आगामी निवडणुकीसाठी त्यांची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकारिणीत आपल्याला संधी मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, अनेकांची संधी हुकली. त्यांनी नेत्यांकडे आपली खंत व्यक्त केली. यापूर्वी कार्यकारिणीत असलेल्या काहींना डच्चूही देण्यात आला. त्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, बहुतांश जुन्या पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्यात आले असून निष्क्रिय लोकांनाच बदलण्यात आले असल्याचे शहर काँग्रेसने स्पष्ट केले आहे. याबाबत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, एकाही नगरसेवकाने आपल्याकडे नाराजी व्यक्त केलेली नाही. विद्यमान नगरसेवकांना महापालिकेची आगामी निवडणूक लढायची आहे. त्यांना तिकीट मिळणार असल्याने पक्षाचे पद दुसऱ्या कार्यकर्त्यांना देऊन पक्षाची व नगरसेवकांचीच ताकद वाढविण्यात आली आहे,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पदे मर्यादित आहेत व कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे. त्यामुले सर्वांनाच पद देणे शक्य झाले नाही. आता उरलेल्या सक्षम कार्यकर्त्यांना विविध सेल व आघाड्यांची जबाबदारी सोपविली जाईल. याशिवाय पक्षात पद देऊनही एखादा पदाधिकारी काम करण्यास इच्छुक नसेल, गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा पदाधिकाऱ्याबाबत पुनर्विचार केला जाईल, त्यांच्या जागी दुसऱ्या इच्छुक कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘त्या’ कार्यकर्त्याला का घेतले ? गटबाजी बाजूला सारून कार्यकारिणी तयार करण्यात आल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. मात्र, निवडणुकीत आपल्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकारी का बनविण्यात आले या मुद्यावर शहरातील काही ज्येष्ठ नेत्यांनी रान पेटविले आहे. इतिहास विसरून सर्वांना सोबत घेण्याची भू्मिका नेत्यांनी घेतली नाही तर नागपुरातील सहा- शून्य चा भाजपचा विक्रम भविष्यातही मोडता येणार नाही, हे विसरून चालणार नाही.