शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

काम न करणाऱ्यांना बदलणार

By admin | Updated: August 20, 2016 02:20 IST

काँग्रेसची शहर कार्यकारिणी गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाहीर केली.

काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत अनेकांची संधी हुकली : नगरसेवकांचा समावेश नाही नागपूर : काँग्रेसची शहर कार्यकारिणी गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाहीर केली. मात्र, ही कार्यकारिणी कायम स्वरुपी नसेल. दर महिन्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. जे काम करणार नाही, पक्षाच्या बैठकींना, आंदोलनांना उपस्थित राहणार नाही, अशा पदाधिकाऱ्यांना बदलले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी तसे निर्देश शहर अध्यक्षांना दिले आहेत. शहर कार्यकारिणीत विद्यमान नगरसेवकांना स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे काही नगरसेवकांनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर काही मतांनी पराभूत झालेल्या बऱ्याच उमेदवारांना पद देऊन आगामी निवडणुकीसाठी त्यांची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकारिणीत आपल्याला संधी मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, अनेकांची संधी हुकली. त्यांनी नेत्यांकडे आपली खंत व्यक्त केली. यापूर्वी कार्यकारिणीत असलेल्या काहींना डच्चूही देण्यात आला. त्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, बहुतांश जुन्या पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्यात आले असून निष्क्रिय लोकांनाच बदलण्यात आले असल्याचे शहर काँग्रेसने स्पष्ट केले आहे. याबाबत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, एकाही नगरसेवकाने आपल्याकडे नाराजी व्यक्त केलेली नाही. विद्यमान नगरसेवकांना महापालिकेची आगामी निवडणूक लढायची आहे. त्यांना तिकीट मिळणार असल्याने पक्षाचे पद दुसऱ्या कार्यकर्त्यांना देऊन पक्षाची व नगरसेवकांचीच ताकद वाढविण्यात आली आहे,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पदे मर्यादित आहेत व कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे. त्यामुले सर्वांनाच पद देणे शक्य झाले नाही. आता उरलेल्या सक्षम कार्यकर्त्यांना विविध सेल व आघाड्यांची जबाबदारी सोपविली जाईल. याशिवाय पक्षात पद देऊनही एखादा पदाधिकारी काम करण्यास इच्छुक नसेल, गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा पदाधिकाऱ्याबाबत पुनर्विचार केला जाईल, त्यांच्या जागी दुसऱ्या इच्छुक कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘त्या’ कार्यकर्त्याला का घेतले ? गटबाजी बाजूला सारून कार्यकारिणी तयार करण्यात आल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. मात्र, निवडणुकीत आपल्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकारी का बनविण्यात आले या मुद्यावर शहरातील काही ज्येष्ठ नेत्यांनी रान पेटविले आहे. इतिहास विसरून सर्वांना सोबत घेण्याची भू्मिका नेत्यांनी घेतली नाही तर नागपुरातील सहा- शून्य चा भाजपचा विक्रम भविष्यातही मोडता येणार नाही, हे विसरून चालणार नाही.