शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताची राज्यघटना बदलणे म्हणजे देशद्रोह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 02:14 IST

भारताची राज्यघटना कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.

नागपूर : भारताची राज्यघटना कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. ६१व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूरच्यावतीने ६१व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खºया अर्थाने राष्ट्रनिर्माते होते त्यांच्या योगदानाला कुणीही विसरू शकत नाही. भारताला आज जगात बलशाली म्हणून पाहिले जात असेल तर ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच. राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.राज्यघटनेत बदल करण्याचा कोणी विचार करीत असेल किंवा कोणी आरक्षण हटविण्याची भाषा करीत असेल तर त्यांच्या विरोधात मी झेंडा घेऊन उभा असेन, असे रामदास आठवले म्हणाले.आरक्षणाला धक्का लागणार नाही - गडकरीआरक्षण हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भविष्यात कोणाला यासाठी झेंडा घेऊन उभे होण्याची गरजही पडणार नाही, हा विश्वास ठेवा. कारण, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती कटीबद्ध आहोत. समता, बंधुत्त्व आणि न्याय याच अधारे देशाचे निर्माण व्हावे यासाठी पंतप्रधानांसह आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, असे नितीन कडकरी म्हणाले.धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी जात असताना खासगी बस-जीप अपघातात चार ठारवर्धा : देवळी मार्गावरील देलसुरा गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बसने जीपला दिलेल्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू तर अन्य सात जण जखमी झाले. हे सर्व जण नांदेडहून नागपूरच्या दीक्षाभूमीवर जात होते.अरविंद खंदारे (३३), दिलीप खंदारे (३५), शिवाजी ढगे (३८) आणि विठ्ठलराव खडसे (४२) अशी मृतांची नावे आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या चौघांसह नांदेडहून ११ जण जीपने नागपूरकडे जात होते. वर्धा जिल्ह्यातील देलसुरा गावानजीक ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या भरधाव बसने त्यांच्या जीपला धडक दिली. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस