शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
3
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
4
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
5
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
6
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
7
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
8
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
9
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
10
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
12
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
13
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
14
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
15
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
16
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
17
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
18
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
19
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
20
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

भारताची राज्यघटना बदलणे म्हणजे देशद्रोह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 02:14 IST

भारताची राज्यघटना कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.

नागपूर : भारताची राज्यघटना कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. ६१व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूरच्यावतीने ६१व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खºया अर्थाने राष्ट्रनिर्माते होते त्यांच्या योगदानाला कुणीही विसरू शकत नाही. भारताला आज जगात बलशाली म्हणून पाहिले जात असेल तर ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच. राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.राज्यघटनेत बदल करण्याचा कोणी विचार करीत असेल किंवा कोणी आरक्षण हटविण्याची भाषा करीत असेल तर त्यांच्या विरोधात मी झेंडा घेऊन उभा असेन, असे रामदास आठवले म्हणाले.आरक्षणाला धक्का लागणार नाही - गडकरीआरक्षण हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भविष्यात कोणाला यासाठी झेंडा घेऊन उभे होण्याची गरजही पडणार नाही, हा विश्वास ठेवा. कारण, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती कटीबद्ध आहोत. समता, बंधुत्त्व आणि न्याय याच अधारे देशाचे निर्माण व्हावे यासाठी पंतप्रधानांसह आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, असे नितीन कडकरी म्हणाले.धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी जात असताना खासगी बस-जीप अपघातात चार ठारवर्धा : देवळी मार्गावरील देलसुरा गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बसने जीपला दिलेल्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू तर अन्य सात जण जखमी झाले. हे सर्व जण नांदेडहून नागपूरच्या दीक्षाभूमीवर जात होते.अरविंद खंदारे (३३), दिलीप खंदारे (३५), शिवाजी ढगे (३८) आणि विठ्ठलराव खडसे (४२) अशी मृतांची नावे आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या चौघांसह नांदेडहून ११ जण जीपने नागपूरकडे जात होते. वर्धा जिल्ह्यातील देलसुरा गावानजीक ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या भरधाव बसने त्यांच्या जीपला धडक दिली. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस