शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

भारताची राज्यघटना बदलणे म्हणजे देशद्रोह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 02:14 IST

भारताची राज्यघटना कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.

नागपूर : भारताची राज्यघटना कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. ६१व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूरच्यावतीने ६१व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खºया अर्थाने राष्ट्रनिर्माते होते त्यांच्या योगदानाला कुणीही विसरू शकत नाही. भारताला आज जगात बलशाली म्हणून पाहिले जात असेल तर ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच. राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.राज्यघटनेत बदल करण्याचा कोणी विचार करीत असेल किंवा कोणी आरक्षण हटविण्याची भाषा करीत असेल तर त्यांच्या विरोधात मी झेंडा घेऊन उभा असेन, असे रामदास आठवले म्हणाले.आरक्षणाला धक्का लागणार नाही - गडकरीआरक्षण हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भविष्यात कोणाला यासाठी झेंडा घेऊन उभे होण्याची गरजही पडणार नाही, हा विश्वास ठेवा. कारण, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती कटीबद्ध आहोत. समता, बंधुत्त्व आणि न्याय याच अधारे देशाचे निर्माण व्हावे यासाठी पंतप्रधानांसह आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, असे नितीन कडकरी म्हणाले.धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी जात असताना खासगी बस-जीप अपघातात चार ठारवर्धा : देवळी मार्गावरील देलसुरा गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बसने जीपला दिलेल्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू तर अन्य सात जण जखमी झाले. हे सर्व जण नांदेडहून नागपूरच्या दीक्षाभूमीवर जात होते.अरविंद खंदारे (३३), दिलीप खंदारे (३५), शिवाजी ढगे (३८) आणि विठ्ठलराव खडसे (४२) अशी मृतांची नावे आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या चौघांसह नांदेडहून ११ जण जीपने नागपूरकडे जात होते. वर्धा जिल्ह्यातील देलसुरा गावानजीक ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या भरधाव बसने त्यांच्या जीपला धडक दिली. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस