शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागपुरात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 00:58 IST

केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम १ जुलैपासून जाहीर केला. १५ जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्जाचा (भाग-१) भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यावर्षी प्रवेशाच्या नियमात थोडा बदल केला आहे. ‘पहिले या, पहिले मिळवा’ योजनेत बदल केला आहे.

ठळक मुद्दे१५ पासून सुरू होईल ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम १ जुलैपासून जाहीर केला. १५ जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्जाचा (भाग-१) भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यावर्षी प्रवेशाच्या नियमात थोडा बदल केला आहे. ‘पहिले या, पहिले मिळवा’ योजनेत बदल केला आहे.१५ जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालयांना नोंदणी करायची आहे. नोंदणी करणाऱ्या ज्युनिअर कॉलेजला प्रवेश प्रक्रियेत सहभागी करण्यात येणार आहे. यावर्षी समिती विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नियम व कार्यप्रणालीची माहिती देणारी सूचना पुस्तिका यंदा देणार नाही. आयडी व पासवर्ड यासाठी विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन किटसुद्धा मिळणार नाही. विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया ऑनलाईन करायची आहे. समितीच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना आयडी व पासवर्ड ऑनलाईन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना फीसुद्धा ऑनलाईन भरायची आहे. (भाग-१) फॉर्म भरल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा अर्धा टप्पा पूर्ण होईल, नंतरचा टप्पा दहावीचा निकाल लागल्यानंतरचा आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज (भाग-२) भरणे सुरू होणार आहे.तीन टप्प्यात संपणार प्रक्रियासूत्रांच्या सांगण्यानुसार यावेळी प्रवेश प्रक्रिया तीन राऊंडमध्ये संपणार आहे. या तीनही राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. कोरोनामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया एक महिना उशिरा सुरू झाली आहे. जर प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू ठेवल्यास विद्यार्थ्यांचे १८० दिवसांचे सत्र पूर्ण होणार नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियात काही बदल केले आहे. गेल्या वर्षी पाच ते सहा राऊंड झाल्यानंतर जागा रिक्त राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला होता.विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी केंद्र देणे सुरूकेंद्रीय प्रवेश समितीद्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काही बदल केले आहेत. शिवाय यंदा माहिती पुस्तिकासुद्धा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळा, महाविद्यालयस्तरावर केंद्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शाळा, महाविद्यालयाला मार्गदर्शन केंद्र हवे आहे, त्यांनी शिक्षण उपसंचालक अथवा केंद्र प्रवेश समितीच्या अध्यक्षाच्या नावाने अर्ज करायचा आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय