शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

नागपुरात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 00:58 IST

केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम १ जुलैपासून जाहीर केला. १५ जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्जाचा (भाग-१) भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यावर्षी प्रवेशाच्या नियमात थोडा बदल केला आहे. ‘पहिले या, पहिले मिळवा’ योजनेत बदल केला आहे.

ठळक मुद्दे१५ पासून सुरू होईल ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम १ जुलैपासून जाहीर केला. १५ जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्जाचा (भाग-१) भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यावर्षी प्रवेशाच्या नियमात थोडा बदल केला आहे. ‘पहिले या, पहिले मिळवा’ योजनेत बदल केला आहे.१५ जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालयांना नोंदणी करायची आहे. नोंदणी करणाऱ्या ज्युनिअर कॉलेजला प्रवेश प्रक्रियेत सहभागी करण्यात येणार आहे. यावर्षी समिती विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नियम व कार्यप्रणालीची माहिती देणारी सूचना पुस्तिका यंदा देणार नाही. आयडी व पासवर्ड यासाठी विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन किटसुद्धा मिळणार नाही. विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया ऑनलाईन करायची आहे. समितीच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना आयडी व पासवर्ड ऑनलाईन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना फीसुद्धा ऑनलाईन भरायची आहे. (भाग-१) फॉर्म भरल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा अर्धा टप्पा पूर्ण होईल, नंतरचा टप्पा दहावीचा निकाल लागल्यानंतरचा आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज (भाग-२) भरणे सुरू होणार आहे.तीन टप्प्यात संपणार प्रक्रियासूत्रांच्या सांगण्यानुसार यावेळी प्रवेश प्रक्रिया तीन राऊंडमध्ये संपणार आहे. या तीनही राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. कोरोनामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया एक महिना उशिरा सुरू झाली आहे. जर प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू ठेवल्यास विद्यार्थ्यांचे १८० दिवसांचे सत्र पूर्ण होणार नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियात काही बदल केले आहे. गेल्या वर्षी पाच ते सहा राऊंड झाल्यानंतर जागा रिक्त राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला होता.विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी केंद्र देणे सुरूकेंद्रीय प्रवेश समितीद्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काही बदल केले आहेत. शिवाय यंदा माहिती पुस्तिकासुद्धा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळा, महाविद्यालयस्तरावर केंद्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शाळा, महाविद्यालयाला मार्गदर्शन केंद्र हवे आहे, त्यांनी शिक्षण उपसंचालक अथवा केंद्र प्रवेश समितीच्या अध्यक्षाच्या नावाने अर्ज करायचा आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय