शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बियाणे मिळण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांत बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खरीप हंगामात कमी कालावधीचे वाण लावण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यात जाणीव जागृती करण्याची गरज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खरीप हंगामात कमी कालावधीचे वाण लावण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यात जाणीव जागृती करण्याची गरज आहे. जिल्ह्यात खरिपासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचे नियोजन करण्यासोबतच शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध होण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमामध्ये आवश्यक तो बदल करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी दिले. खरीप हंगाम तयारी नियोजन व आढाव्यासंदर्भातील ऑनलाइन बैठकीदरम्यान ते बोलत होते.

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला हजर होते. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, कृषी सभापती तपेश्वर वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर हेदेखील उपस्थित होते. पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी, अडचणी असतात. त्या सोडविण्यासाठी विमा कंपनीने जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश नितीन राऊत यांनी दिले. सोयाबीन बियाण्यासाठी महाबीज व खासगी कंपन्यांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना बियाणे सुलभतेने उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे, खते मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांची तपासणी करण्याची सूचना त्यांनी कृषी विभागाला केली. विद्युत जोडणीकरिता पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी देण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले.

भरारी पथकांमार्फत लक्ष ठेवा

गैरप्रकार व शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके यांची उपलब्धता, पुरवठा याबाबत योग्य देखरेख ठेवणे आवश्यक आहे. भरारी पथकाच्या मार्फत संनियत्रण करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. खरीप हंगामात जुलै, ऑगस्ट दरम्यान युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे जिल्ह्याला जास्तीत जास्त युरिया बफर स्टॉक मिळण्याकरीता पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी कोरोनानंतरच्या कालावधीत जास्तीत जास्त कर्ज मेळावे आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली.