शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वागणूक बदलवा, अन्यथा कर्फ्यू अटळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 21:18 IST

शहरात साडेतीन महिन्यात ४५० कोरोनाबाधित होते, तर ११ जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोन हजार बाधित झाले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. सामान्य जीवन जगण्याची मुभा दिली, परंतु कोविड-१९ च्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वागणूक व सवयी बदलाव्या लागतील, नवीन जीवनपद्धती स्वीकारावी लागेल. अन्यथा कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू करावा लागेल. यात जीवनावश्यक वस्तूही मिळणार नाही, असे इशारावजा आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात साडेतीन महिन्यात ४५० कोरोनाबाधित होते, तर ११ जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोन हजार बाधित झाले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. सामान्य जीवन जगण्याची मुभा दिली, परंतु कोविड-१९ च्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वागणूक व सवयी बदलाव्या लागतील, नवीन जीवनपद्धती स्वीकारावी लागेल. अन्यथा कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू करावा लागेल. यात जीवनावश्यक वस्तूही मिळणार नाही, असे इशारावजा आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.अनेक जण म्हणतात लॉकडाऊन लागू करू नये, पण ते स्वत: नियम पाळत नाही. मास्क वापरले तर ९० टक्के संसर्ग रोखता येईल. परंतु अजूनही २० ते ४० टक्के लोक मास्क वापरत नाहीत, फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. दुकानात पाचहून अधिक लोकांना मनाई आहे. परंतु २० ते २५ लोक दिसतात. नियम पाळावेत म्हणून दुकानदारांना १० हजारापर्यंत दंड केला. यात सुधारणा झाली नाही तर ५० हजार ते १ लाखापर्यंत दंड केला जाईल. दुकाने बंद केली जातील. परवानाही रद्द होईल. नियमांचे पालन केले तर ही वेळ येणार नाही, कर्फ्यू, लॉकडाऊन लावावा लागणार नाही. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.जेलमध्ये पाठविण्याची वेळ आणू नकामास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, फिजिकल डिस्टन्स पाळा, साबणाने वारंवार हात धुवा, असे आवाहन करतानाच व्यापाऱ्यांनी समूह व विषम नियमाचे व फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास जेलमध्ये जावे लागेल, परंतु अशी वेळ आणू नका, असेही मुंढे म्हणाले.प्रश्न सर्वांचेच पण नाईलाजहातावर पोट भरणारे लोक आहेत. चहाटपरी, हातठेले, हॉकर्स व्यवसायासाठी परवानगी मागतात. प्रश्न सर्वांचेच आहेत, परंतु केंद्र व राज्य सरकारचे दिशानिर्देश पाळणे आवश्यक आहे. रेस्टॉरंटला पार्सलची परवानगी दिली. परंतु गर्दी होत आहे. संचारबंदी लागू केली तर गरिबांचे कंबरडे मोडणार आहे. शंभर टक्के नागरिकांनी नियम पाळले तर ही वेळ येणार नाही,असेही तुकाराम मुंढे म्हणाले.सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नकाऑगस्ट महिना सण-उत्सवांचा आहे. ईद, गणेशोत्सव, रक्षाबंधन असे सण येत आहेत. संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक साजरा करू नका, वैयक्तिक स्तरावर साजरा करा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.खासगी हॉस्पिटल सज्ज ठेवाकोरोनाची लक्षणे दिसत असतील तर लपवून ठेवू नका. वेळीच नियंत्रण कक्षाला कळवा, शासकीय रुग्णालयात उपचार घ्या. स्वत:चा व कुटुंबाचा जीव वाचवा. खासगी रुग्णालयांनीसुद्धा कोविड रुग्णांची माहिती देणे आवश्यक आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, खासगी रुग्णालयांनी आपली रुग्णालये कोविड सेंटरसाठी सज्ज ठेवावीत, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.

कर्फ्यू लावण्यापूर्वी शंभरवेळा विचार करा - संदीप जोशीमध्यमवर्गीय दुकानदारांची परिस्थिती बिकट आहे. याचा विचार करता नागपूर शहरात कर्फ्यू ,लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी मनपा आयुक्तांनी शंभरवेळा विचार करावा, अशी विनंती महापौर संदीप जोशी यांनी केली आहे. नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु यात ३० टक्के ग्रामीण भागातील आहेत. तीनदा लॉकडाऊननंतरही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कर्फ्यूमुळे संख्या कमी होईल हे सत्य नाही. बाधितांची संख्या कमी करायची असेल तर सर्वांनी एकत्र काम करावे लागेल. नियमाचे काटेकोर पालन करावे लागेल, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या