शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

वागणूक बदलवा, अन्यथा कर्फ्यू अटळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 21:18 IST

शहरात साडेतीन महिन्यात ४५० कोरोनाबाधित होते, तर ११ जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोन हजार बाधित झाले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. सामान्य जीवन जगण्याची मुभा दिली, परंतु कोविड-१९ च्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वागणूक व सवयी बदलाव्या लागतील, नवीन जीवनपद्धती स्वीकारावी लागेल. अन्यथा कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू करावा लागेल. यात जीवनावश्यक वस्तूही मिळणार नाही, असे इशारावजा आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात साडेतीन महिन्यात ४५० कोरोनाबाधित होते, तर ११ जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोन हजार बाधित झाले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. सामान्य जीवन जगण्याची मुभा दिली, परंतु कोविड-१९ च्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वागणूक व सवयी बदलाव्या लागतील, नवीन जीवनपद्धती स्वीकारावी लागेल. अन्यथा कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू करावा लागेल. यात जीवनावश्यक वस्तूही मिळणार नाही, असे इशारावजा आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.अनेक जण म्हणतात लॉकडाऊन लागू करू नये, पण ते स्वत: नियम पाळत नाही. मास्क वापरले तर ९० टक्के संसर्ग रोखता येईल. परंतु अजूनही २० ते ४० टक्के लोक मास्क वापरत नाहीत, फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. दुकानात पाचहून अधिक लोकांना मनाई आहे. परंतु २० ते २५ लोक दिसतात. नियम पाळावेत म्हणून दुकानदारांना १० हजारापर्यंत दंड केला. यात सुधारणा झाली नाही तर ५० हजार ते १ लाखापर्यंत दंड केला जाईल. दुकाने बंद केली जातील. परवानाही रद्द होईल. नियमांचे पालन केले तर ही वेळ येणार नाही, कर्फ्यू, लॉकडाऊन लावावा लागणार नाही. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.जेलमध्ये पाठविण्याची वेळ आणू नकामास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, फिजिकल डिस्टन्स पाळा, साबणाने वारंवार हात धुवा, असे आवाहन करतानाच व्यापाऱ्यांनी समूह व विषम नियमाचे व फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास जेलमध्ये जावे लागेल, परंतु अशी वेळ आणू नका, असेही मुंढे म्हणाले.प्रश्न सर्वांचेच पण नाईलाजहातावर पोट भरणारे लोक आहेत. चहाटपरी, हातठेले, हॉकर्स व्यवसायासाठी परवानगी मागतात. प्रश्न सर्वांचेच आहेत, परंतु केंद्र व राज्य सरकारचे दिशानिर्देश पाळणे आवश्यक आहे. रेस्टॉरंटला पार्सलची परवानगी दिली. परंतु गर्दी होत आहे. संचारबंदी लागू केली तर गरिबांचे कंबरडे मोडणार आहे. शंभर टक्के नागरिकांनी नियम पाळले तर ही वेळ येणार नाही,असेही तुकाराम मुंढे म्हणाले.सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नकाऑगस्ट महिना सण-उत्सवांचा आहे. ईद, गणेशोत्सव, रक्षाबंधन असे सण येत आहेत. संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक साजरा करू नका, वैयक्तिक स्तरावर साजरा करा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.खासगी हॉस्पिटल सज्ज ठेवाकोरोनाची लक्षणे दिसत असतील तर लपवून ठेवू नका. वेळीच नियंत्रण कक्षाला कळवा, शासकीय रुग्णालयात उपचार घ्या. स्वत:चा व कुटुंबाचा जीव वाचवा. खासगी रुग्णालयांनीसुद्धा कोविड रुग्णांची माहिती देणे आवश्यक आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, खासगी रुग्णालयांनी आपली रुग्णालये कोविड सेंटरसाठी सज्ज ठेवावीत, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.

कर्फ्यू लावण्यापूर्वी शंभरवेळा विचार करा - संदीप जोशीमध्यमवर्गीय दुकानदारांची परिस्थिती बिकट आहे. याचा विचार करता नागपूर शहरात कर्फ्यू ,लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी मनपा आयुक्तांनी शंभरवेळा विचार करावा, अशी विनंती महापौर संदीप जोशी यांनी केली आहे. नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु यात ३० टक्के ग्रामीण भागातील आहेत. तीनदा लॉकडाऊननंतरही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कर्फ्यूमुळे संख्या कमी होईल हे सत्य नाही. बाधितांची संख्या कमी करायची असेल तर सर्वांनी एकत्र काम करावे लागेल. नियमाचे काटेकोर पालन करावे लागेल, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या