शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

समलैंगिकांसमोर एड्सचा सामना करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:42 IST

देशात एचआयव्ही-एड्सचे प्रमाण कमी होत असताना समलैंगिक व एलजीबीटीक्यू कम्युनिटीमध्ये मात्र हे प्रमाण वाढत आहे. विशेषत: १५ ते २४ या वयोगटातील आकडेवारी चिंतित करणारी आहे. त्यामुळे समलैंगिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असला तरी भविष्याचा विचार होणे आवश्यक आहे. समाजाची मान्यता व एड्सशी सामना हे समलैंगिकांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मिलिंद भृशुंडी यांनी व्यक्त केले. नागपूर प्रेस क्लबतर्फे बुधवारी, समलैंगिकता, बदलता दृष्टिकोन, सर्वोच्च न्यायालय व समाज, या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्दे समलैंगिकता व बदलत्या दृष्टिकोनावर चर्चासत्राचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात एचआयव्ही-एड्सचे प्रमाण कमी होत असताना समलैंगिक व एलजीबीटीक्यू कम्युनिटीमध्ये मात्र हे प्रमाण वाढत आहे. विशेषत: १५ ते २४ या वयोगटातील आकडेवारी चिंतित करणारी आहे. त्यामुळे समलैंगिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असला तरी भविष्याचा विचार होणे आवश्यक आहे. समाजाची मान्यता व एड्सशी सामना हे समलैंगिकांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मिलिंद भृशुंडी यांनी व्यक्त केले. नागपूर प्रेस क्लबतर्फे बुधवारी, समलैंगिकता, बदलता दृष्टिकोन, सर्वोच्च न्यायालय व समाज, या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.प्रेस क्लब सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी होते. त्याचप्रमाणे आमदार. डॉ. मिलिंद माने, सारथी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निकुंज जोशी, किन्नर समाजाच्या विद्या कांबळे, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र हे देखील उपस्थित होते. अनेक समलैंगिक अद्यापही जाहीरपणे समोर आलेले नाहीत. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आकडेवारीनुसार देशात २५ लाख ‘गे’ लोक आहेत. यातील ७ टक्के लोकांना एड्स आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण आणखी जास्त असू शकते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील १३ टक्के ‘गे’ लोकांमध्ये एड्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे या मुद्याकडे गंभीरतेने लक्ष दिले गेले पाहिजे, असे डॉ. भृशुंडी म्हणाले. समलैंगिकांकडे नेहमीच वाईट दृष्टीने पाहिले गेले आहे. मात्र आता यासंदर्भात जागृती करण्याची गरज आहे. समलैंगिकांनी देखील स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे, असे डॉ.मिलिंद माने म्हणाले.एलजीबीटीक्यू समुदायाने स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असा सल्ला गिरीश गांधी यांनी दिला. तृतीयपंथीयांसाठी स्वखर्चाने प्रसाधनगृह बांधून देण्याची तयारी देखील त्यांनी दाखविली.समलैंगिकाच्या मुद्याला समाजाने समजून घेतले पाहिजे. यासाठी शिक्षण प्रणालीत योग्य धडे दिले गेले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लैंगिक शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन निकुंज जोशी यांनी केले. प्रदीप मैत्र यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा बासू यांनी केले.

टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडरnagpurनागपूर