शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्ष; टेकडी गणेशाच्या चरणी ५० किलोंचा लाडू अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 11:33 IST

Nagpur News : विदर्भाच्या मातीतून जन्मलेले आणि गेली सलग ५० वर्षे निरंतर लोकजागरासाठी वाहून घेतलेले ‘लोकमत’ आज आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे.

ठळक मुद्देनिरंतर लोकजागराचा सुवर्णमहोत्सव

नागपूर : विदर्भाच्या मातीतून जन्मलेले आणि गेली सलग ५० वर्षे निरंतर लोकजागरासाठी वाहून घेतलेले ‘लोकमत’ आज १५ डिसेंबर रोजी आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या वर्धापन दिनानिमित्त लाखो नागपूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपतीच्या चरणी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते आज सकाळी ५० किलोंचा लाडू अर्पण करण्यात आला.

१५ डिसेंबर १९७१ रोजी स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यांनी नागपुरातून ‘लोकमत’ची मुहूर्तमेढ रोवली. यवतमाळच्या मातीतून निपजलेले हे रोपटे ५० वर्षांत वटवृक्षात रूपांतरित झाले. महाराष्ट्रभर त्याच्या पारंब्या पसरल्या. वितरणापासून तर सुबक अंक-छपाईपर्यंतचे सर्व विक्रम तोडून लोकमत ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ झाले. समाजाच्या संवेदना टिपत महाराष्ट्रव्यापी झालेला लोकमत आणि वाचकांसाठी हा आनंदाचा दिवस आहे.

विदर्भात सजणार रांगोळ्या

‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोकमत सखी मंच आणि प्रेरणा सेवा मंडळ संचालित प्रेरणा इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने १५ डिसेंबरला बुधवारी विदर्भस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. विदर्भातील महिला, युवती आणि सखी मंचच्या सदस्या यात सहभागी होत असून जणू विदर्भाचे अंगणच या स्पर्धेतून मनमोहक रांगोळ्यांनी सजणार आहे. ‘लोकमत सुवर्ण महोत्सव १९७१-२०२१’ असा उल्लेख करून आणि त्यावर एक पणती लावून विदर्भातील भगिनीही या निरंतर लोकजागराचा आज विदर्भामध्ये सुवर्णमहोत्सव ! आनंदोत्सवात सहभागी होत आहेत.

सर्वधर्म समभाव परिषद

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अंतर्गत सामाजिक सद्भावनेचा संदेश देत नागपुरात २५ ऑक्टोबरला ‘लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद’ आयोजित करण्यात आली होती. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव, नवी दिल्ली येथील अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे धर्मगुरू ब्रह्मविहारी स्वामी, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल्ड ओसवाल्ड ग्रेसियस, जीवन विद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै, लेह-लडाख येथील महाबोधी आंतराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिक्खू संघसेना या जागतिक पातळीवरील धर्मगुरूंनी ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर झालेल्या परिसंवादातून देशाला सामाजिक सद्भावनेचा संदेश दिला होता.

टॅग्स :LokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंटVijay Dardaविजय दर्डाRajendra Dardaराजेंद्र दर्डा