शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

दाखले आता निश्चित दिवसातच मिळणार

By admin | Updated: July 12, 2015 03:11 IST

जात प्रमाणपत्रासह विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी आता शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाही.

लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी काढले अध्यादेश नागपूर : जात प्रमाणपत्रासह विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी आता शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाही. कारण ठरलेल्या दिवसांमध्ये हे दाखले नागरिकांना उपलब्ध करून देणे आता बंधनकारक राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबाजवणी येत्या सोमवारपासून सुरू होत असून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी त्यासंबंधीचे अध्यादेश जारी केले आहेत. जातप्रमाणपत्र असो किंवा उत्पन्नाचा दाखला असो, ते मिळविणे सहज शक्य होत नाही. त्यासाठी एक तर दलालांची मदत घेऊन पैसे खर्च करावे लागतात किंवा वारंवार चकरा तरी माराव्या लागतात. नागरिकांचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच सर्वात पहिला निर्णय लोकसेवा हक्क कायद्यासंदर्भात घेतला होता. त्याचे चांगले परिणाम आता दिसून आले आहे. लोकांची कामे तातडीने आणि वेळेत पूर्ण व्हावी, याच उद्देशाने नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे पदभार स्वीकारल्यापासून काम करीत आहेत. आता त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने त्यांनी अध्यादेश जारी केले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अधिकारी अधिसूचित केले आहेत. या अधिसूचनेनुसार वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र १५ दिवसात, जातीचे प्रमाणपत्र - २१ , उत्पन्न प्रमाणपत्र- १५, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र-२१, तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र -७, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र-७, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना- ७, अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत-७, अल्पभूधारक दाखला-१५, अल्प भू-धारक दाखला- १५ , भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला -१५, शेतकरी असल्याचा दाखला १५, डोंगर, दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचा दाखला-७ प्रतिज्ञापत्र साक्षांकित करण-१ आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र व पात्र वारसांना प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यासाठी ३० दिवस निश्चित करण्यात आले आहे. या ठराविक कालमर्यादेत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र तयार करून न दिल्यास त्यांच्याविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडे अपील करावे, त्याची माहिती सुद्धा अधिसूचनेद्वारा देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)