शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हिवाळ्यात मध्य रेल्वे चालविणार ३० विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 20:08 IST

Nagpur News हिवाळ्यात थर्टी फर्स्ट आणि ख्रिसमसच्या निमित्ताने प्रवाशांची रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विंटर स्पेशल म्हणून ३० गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे ख्रिसमस स्पेशलचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हिवाळ्यात थर्टी फर्स्ट आणि ख्रिसमसच्या निमित्ताने प्रवाशांची रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विंटर स्पेशल म्हणून ३० गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ६ डिसेंबरपासून या रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत.

पुणे-अजनी साप्ताहिक स्पेशल 

०१४४३ ही स्पेशल गाडी पुण्याहून प्रत्येक मंगळवारी ६ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत चालविली जाईल. दुपारी ३.१५ वाजता ती पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता नागपुरात पोहोचेल.

ट्रेन नंबर ०१४४४ ही स्पेशल गाडी ७ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ पर्यंत प्रत्येक बुधवारी अजनी स्थानकावरून रात्री ७.५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ११.३५ वाजता पुण्यात पोहोचेल. या दोन्ही गाड्या मार्गातील दौंड कॉर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबतील. १३ एसी ३ टायर आणि २ जनरेटर व्हॅन या गाड्यांना राहील.

मुंबई - नागपूर साप्ताहिक स्पेशल

०१४४९ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी रात्री ८.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता नागपुरात पोहोचेल. ८ डिसेंबर २०२२ ते ६ जानेवारी २०२३ पर्यंत ही सेवा राहील. तर, ०१४५० ही रेल्वेगाडी ९ डिसेंबरपासून नागपूरहून दर शुक्रवारी दुपारी १.३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई स्थानकावर पोहोचेल. ७ जानेवारीपर्यंत ही साप्ताहिक सेवा राहील. या गाड्यांचे थांबे कल्याण, ईगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे राहणार आहेत.

पुणे-नागपूर साप्ताहिक स्पेशल

७ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ पर्यंत दर बुधवारी दुपारी १.३० वाजता ०१४५१ ही विशेष रेल्वेगाडी नागपूर स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे ०१४५२ ही विशेष रेल्वेगाडी ८ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ या कालावधीत दर गुरुवारी १०.४५ वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल.

मार्गातील दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा रेल्वेस्थानकावर ही गाडी थांबेल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे