शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मध्य रेल्वेचा अभियंता सीबीआयच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 20:54 IST

Nagpur News पावणेदोन लाखांची लाच मिळावी म्हणून रेल्वेच्या कंत्राटदाराला वेठीस धरणाऱ्या मध्य रेल्वेच्या एका अभियंत्याला सीबीआयने जेरबंद केले.

ठळक मुद्देपावणेदोन लाखांची मागितली लाच सीबीआयने बांधल्या मुसक्या

नागपूर : पावणेदोन लाखांची लाच मिळावी म्हणून रेल्वेच्या कंत्राटदाराला वेठीस धरणाऱ्या मध्य रेल्वेच्या एका अभियंत्याला सीबीआयने जेरबंद केले. गुरुवारी दुपारी झालेल्या या कारवाईमुळे रेल्वेत एकच खळबळ उडाली. ए. बी. चतुर्वेदी असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते मध्य रेल्वेत सहायक विभागीय अभियंता (दक्षिण) म्हणून कार्यरत होते.

वर्धा जिल्ह्यातील सुभाष फत्तेचंद सुराणा आणि रितेश सुभाष सुराणा हे मध्य रेल्वेच्या काही भागाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राटदार आहे. त्यांनी केलेल्या कामाचे ८९ लाख, ५५ हजारांचे बिल रेल्वेकडून घेणे होते. ते मंजूर करण्याचा अधिकार चतुर्वेदी यांना होता. त्यामुळे सुराणा त्यांच्याकडे सारखे येरझारा घालत होते. तर, या एकूण बिलाच्या २ टक्के रक्कम अर्थात एक लाख ८० हजार रुपये लाच मिळावी म्हणून चतुर्वेदी सुराणा यांना त्रास देत होते. बिल मिळावे म्हणून चतुर्वेदी यांच्याकडे सहा महिन्यांपासून सारखे हेलपाटे मारूनही ते बिल काढून देत नसल्याने अखेर बुधवारी सुराणा यांनी सीबीआयचे अधीक्षक सलीम खान यांच्याकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीची शहानिशा करून घेतल्यानंतर अधीक्षक सलीम खान यांनी गुरुवारी सापळा लावला. त्यानुसार, १.८० लाखांची लाच स्वीकारताना चतुर्वेदी सीबीआयच्या जाळ्यात अडकले. त्यांना जेरबंद केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी झडती सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर ही झडती सुरूच असल्याने त्यांच्याकडून आणखी काय मिळाले, ते स्पष्ट झाले नाही. चतुर्वेदी यांना शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाईल, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

२० वर्षांपासून नोकरी

चतुर्वेदी गेल्या २० वर्षांपासून रेल्वेत सेवारत असून, नागपुरात ते गेल्या साडेतीन वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी अशा गैरप्रकारातून कोट्यवधींची मालमत्ता जप्त केल्याची रेल्वेच्या वर्तुळात चर्चा आहे.

सीबीआय फार्मात

मार्चअखेरपर्यंत बॅकलॉग पूर्ण करण्यावर सर्वच सरकारी विभागाचा भर असतो. सीबीआयच्या स्थानिक युनिटमधून कारवाई होत नसल्याचे गेल्या वर्षभरातील चित्र होते. मात्र, येथे अधीक्षक म्हणून नुकताच पदभार स्वीकारणारे सलीम खान यांनी जोरदार धमाका लावला आहे. गेल्या महिन्याभरातच त्यांनी तीन मोठ्या कारवाया करून भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध ‘स्वच्छ भारत अभियान’ गतिमान केले आहे.

----

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागBribe Caseलाच प्रकरण