शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
3
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
4
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
5
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
6
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
7
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
8
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
9
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
10
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
11
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
12
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
13
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
14
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
15
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
16
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
17
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
18
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
19
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
20
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या खासगीकरणाचे केंद्र सरकारचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : थकबाकीदारांची वीज कापण्याच्या मोहिमेविरुद्ध आंदोलन करीत असलेल्या भाजपवर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : थकबाकीदारांची वीज कापण्याच्या मोहिमेविरुद्ध आंदोलन करीत असलेल्या भाजपवर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी निशाणा साधला आहे. विजेची थकबाकी ही मागच्या भाजप सरकारचे पाप आहे. केंद्र सरकार प्रस्तावित इलेक्ट्रीसिटी ॲक्टच्या माध्यमातून महावितरणचे खासगीकरण करण्याचे षडयंत्र रचत असून राज्यातील भाजप आंदोलनाच्या मध्यमातून या षडयंत्रास मदत करीत आहे, असा आरोप नितीन राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

ऊर्जा मंत्री राऊत म्हणाले, महावितरण ही सरकारी कंपनी आहे. ती शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. परंतु ही कंपनी उद्योगपतीच्या हाती जावी, असे भाजपचे प्रयत्न आहे. एसएनडीएलच्या रुपात खासगीकरणाचे तोटे नागपूरकरांनी अनुभवले आहेत. महावितरणलाच अखेर वितरण व्यवस्था सांभाळावी लागली. आता भाजप पूर्ण महावितरणचेच खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपच्या काळात महावितरणची थकबाकी २०,७३४ कोटी रुपयावरून वाढून ५९,८२४ कोटीवर पोहोचली आहे. डिसेंबर २० मध्ये ही थकबाकी ७१,५०६ कोटी इतकी झाली. भाजपनेच आपल्या काळात नागरिकांना थकबाकीदार बनवले. ते असेही म्हणाले, पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज वाढत आहे, परंतु भाजप यावर काहीही बोलत नाही. आपले अपयश लपवण्यासाठी व नागरिकांची सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपा वीज बिलावरून आंदोलन करीत आहेत.

राऊत यांनी वीज कापण्याच्या मोहिमेचे समर्थन करीत सांगितले की, महावितरणलाही कोळसा कंपनी, इंधन, बँक व वीज खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. कोरोना संक्रमणाच्या काळात महावितरणने नागरिकांना अखंडित वीज सेवा दिली. कुठल्याही थकबाकीदार ग्राहकाची वीज कापली नाही. आता कंपनीची आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली आहे की, थकबाकी वसूल केल्याशिवाय पर्याय नाही. नागरिकांना नोटीस पाठवून त्यांचे कनेक्शन कापले जात आहे.

राऊत यांनी यावेळी असेही सांगितले की, सुरू बिल भरणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्याची वीज कापली जाणार नाही. आकडेवारी सादर करीत त्यांनी कृषी धोरणाला क्रांतिकारी योजना असल्याचे सांगत या योजनेत सहभागी होऊन शेतकरी आपली थकबाकीपैकी ६६ टक्के रक्कम माफ करू शकतात. एकट्या नागपूर जिल्ह्यातच शेतकरी २२९ कोटी रुपये भरून ३९६ कोटी रुपयाचे बिल माफ करू शकतात. राज्यातील शेतकरी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

बॉक्स

ऊर्जा मंत्र्यांचा यू-टर्न

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्य सरकार लॉकडाऊन काळातील वीज बिलात दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा केला होता. परंतु त्यांनी

आज आपल्या वक्तव्याबाबत यू-टर्न घेतला. ते म्हणाले, त्यांनी केवळ १०० युनिटपर्यंतचे बिल माफ करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. या संदर्भात समिती सुद्धा बनवण्यात आली. परंतु कोरोनामुळे त्याची बैठक होऊ शकली नाही. समितीच्या रिपोर्टवर सरकार निर्णय घेईल.

बॉक्स

नागपुरात वीज लाईन अंडरग्राऊंड होणार, ४९० कोटी मंजूर

नितीन राऊत यांनी यावेळी नागपूर जिल्ह्यातील वीज लाईन अंडरग्राऊंड करण्यात येणार असल्याची घोषणा केली. राज्य सरकारने यासाठी ४९० कोटी रुपये मंजूर केले आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील लाईन अंडरग्राऊंड केली जाईल.