शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ट्रक मालकांच्या संपाकडे केंद्राचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 01:33 IST

वाहतूकदार आणि ट्रक मालकांच्या अनिश्चितकालीन संपाचा गुरुवारी सातवा दिवस होता. संपापूर्वी आणि बुधवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेल्या आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही.

ठळक मुद्देसातवा दिवस, नागपुरात २०० कोटींचे नुकसान : डिझेलची विक्री व टोलची आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूकदार आणि ट्रक मालकांच्या अनिश्चितकालीन संपाचा गुरुवारी सातवा दिवस होता. संपापूर्वी आणि बुधवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेल्या आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. गोयल यांनी मागण्यांवर तीन महिन्यांनंतर चर्चा करण्याचे सांगितल्यानंतर पदाधिकायांनी बैठकीतून काढता पाय घेतला.कोट्यवधींचे नुकसानसंपामुळे ट्रक मालकांचे देशात कोट्यवधींचे तर नागपुरात तब्बल २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या संपात सहभागी नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारने देशभरातील ट्रक मालकांच्या मागण्यांवर विचार आणि चर्चा करावी. पण चर्चेसाठी कुणीही पुढे येत नाही. सरकारच्या धोरणामुळे ट्रक मालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. बँकांचे हप्ते, कराचा भरणा आणि चालकाचा पगार सुरू आहे. या संपात या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. दुधाचे भाव वाढवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जसा पुढाकार घेतला तसा या संपातही घ्यावा, अशी असोसिएशनची मागणी आहे.मालाची आवक-जावक बंदसंपामुळे दैनंदिन आणि जीवनाश्यक वस्तूंची आवक-जावक तसेच व्यापाºयांच्या मालाची बुकिंग बंद आहे. वाहतूकदारांचे गोडावूनही बंद आहेत. संपापूर्वी आलेला माल गोडावूनमध्ये पडून आहे. वाहतूकदार देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असताना कुणीही मंत्री चर्चेसाठी पुढे का येत नाही, असा गंभीर सवाल आहे. केंद्र सरकार प्रत्येक ट्रकवर वार्षिक ७.५० लाख रुपये आयकर आकारत आहे. ही रक्कम ३० लाख रुपये करण्याच्या तयारीत आहेत. असोसिएशनने याला विरोध केला आहे.भाजीपाला महाग, लोकांनी सहकार्य करावेएका राज्यातून दुसºया राज्यात भाज्यांची वाहतूक बंद आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात भाज्यांच्या किमती महागल्या आहेत. याशिवाय औषधांचा पुरवठा बंद आहे. पुढे सर्वच वस्तूंचा पुरवठा बंद झाल्यास महागाई वाढणार आहे. याकरिता केंद्र सरकार जबाबदार राहणार आहे. संपाला ग्राहक संघटना आणि लोकांनीही सहकार्य करावे, अशी मागणी मारवाह यांनी केली.डिझेल विक्री व टोलची आवक नगण्यसंपामुळे ट्रक रस्त्यावर उभे असल्यामुळे पंपावर डिझेलची ८० टक्के विक्री कमी झाली आहे. याशिवाय टोल नाक्यावर आवक घटली आहे. संपामुळे ट्रक मालकांसोबत शासनाचा महसूल बुडत आहे. सरकारच्या धोरणामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.

 

टॅग्स :Strikeसंपnagpurनागपूर