शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

ट्रक मालकांच्या संपाकडे केंद्राचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 01:33 IST

वाहतूकदार आणि ट्रक मालकांच्या अनिश्चितकालीन संपाचा गुरुवारी सातवा दिवस होता. संपापूर्वी आणि बुधवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेल्या आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही.

ठळक मुद्देसातवा दिवस, नागपुरात २०० कोटींचे नुकसान : डिझेलची विक्री व टोलची आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूकदार आणि ट्रक मालकांच्या अनिश्चितकालीन संपाचा गुरुवारी सातवा दिवस होता. संपापूर्वी आणि बुधवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेल्या आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. गोयल यांनी मागण्यांवर तीन महिन्यांनंतर चर्चा करण्याचे सांगितल्यानंतर पदाधिकायांनी बैठकीतून काढता पाय घेतला.कोट्यवधींचे नुकसानसंपामुळे ट्रक मालकांचे देशात कोट्यवधींचे तर नागपुरात तब्बल २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या संपात सहभागी नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारने देशभरातील ट्रक मालकांच्या मागण्यांवर विचार आणि चर्चा करावी. पण चर्चेसाठी कुणीही पुढे येत नाही. सरकारच्या धोरणामुळे ट्रक मालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. बँकांचे हप्ते, कराचा भरणा आणि चालकाचा पगार सुरू आहे. या संपात या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. दुधाचे भाव वाढवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जसा पुढाकार घेतला तसा या संपातही घ्यावा, अशी असोसिएशनची मागणी आहे.मालाची आवक-जावक बंदसंपामुळे दैनंदिन आणि जीवनाश्यक वस्तूंची आवक-जावक तसेच व्यापाºयांच्या मालाची बुकिंग बंद आहे. वाहतूकदारांचे गोडावूनही बंद आहेत. संपापूर्वी आलेला माल गोडावूनमध्ये पडून आहे. वाहतूकदार देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असताना कुणीही मंत्री चर्चेसाठी पुढे का येत नाही, असा गंभीर सवाल आहे. केंद्र सरकार प्रत्येक ट्रकवर वार्षिक ७.५० लाख रुपये आयकर आकारत आहे. ही रक्कम ३० लाख रुपये करण्याच्या तयारीत आहेत. असोसिएशनने याला विरोध केला आहे.भाजीपाला महाग, लोकांनी सहकार्य करावेएका राज्यातून दुसºया राज्यात भाज्यांची वाहतूक बंद आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात भाज्यांच्या किमती महागल्या आहेत. याशिवाय औषधांचा पुरवठा बंद आहे. पुढे सर्वच वस्तूंचा पुरवठा बंद झाल्यास महागाई वाढणार आहे. याकरिता केंद्र सरकार जबाबदार राहणार आहे. संपाला ग्राहक संघटना आणि लोकांनीही सहकार्य करावे, अशी मागणी मारवाह यांनी केली.डिझेल विक्री व टोलची आवक नगण्यसंपामुळे ट्रक रस्त्यावर उभे असल्यामुळे पंपावर डिझेलची ८० टक्के विक्री कमी झाली आहे. याशिवाय टोल नाक्यावर आवक घटली आहे. संपामुळे ट्रक मालकांसोबत शासनाचा महसूल बुडत आहे. सरकारच्या धोरणामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.

 

टॅग्स :Strikeसंपnagpurनागपूर