शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

सिमेंट बंधारा ठरतोय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST

कळमेश्वर : आष्टीकला व निमजी शिवारात नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यास शेतीला मारक ठरत आहे. यामुळे ...

कळमेश्वर : आष्टीकला व निमजी शिवारात नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यास शेतीला मारक ठरत आहे. यामुळे हा बंधारा तोडून तो दुसऱ्या जागी बांधावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जात आहे. परिणामी तालुक्यात सातशे ते आठशे फूट बोअरवेल करून भूगर्भातून पाण्याचा उपसा सुरू आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे ओलित विहिरीवर अवलंबून आहे अशा विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने ओलितास पाणी पुरत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पावसाचे पाणी शिवारातील जमिनीत मुरावे व भूगर्भातील पाणी पातळी वाढावी याकरिता शासनाच्या वतीने ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. असाच बंधारा आष्टीकला-निमजी शिवारातून वाहणाऱ्या नाल्यावर बांधण्यात आला. नाल्याच्या काठावर भुजंग नत्थू डाफ, देवराव नत्थू डाफ, दुर्गा विठोबा शिंगणे, नारायण श्रावण कसरे, अशोक तानबा भोयर, निंबा वरलू बांबल, यादोराव मारोती खडसे, पुरुषोत्तम शामराव डेहनकर, मो. जमीन. मो. अली अमीन, बापूराव लक्ष्मण निखाडे, शीला भगवान भोयर या शेतकऱ्यांची शेती आहे. या नाल्याला दोन वेगवेगळ्या नाल्याचे पाणी येत असल्याने तसेच हा बंधारा मातीने बुजल्याने नाल्याकाठावर असलेल्या शेतातून पाण्याचा प्रवाह वाहतो. तसेच नाल्याकाठावरील जमिनीचा भाग खचून जात असल्याने शेतीपिकांसोबतच शेतीचेसुद्धा नुकसान होते. यामुळे या बंधाऱ्याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.