शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सिमेंट बंधारा ठरतोय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST

कळमेश्वर : आष्टीकला व निमजी शिवारात नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यास शेतीला मारक ठरत आहे. यामुळे ...

कळमेश्वर : आष्टीकला व निमजी शिवारात नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यास शेतीला मारक ठरत आहे. यामुळे हा बंधारा तोडून तो दुसऱ्या जागी बांधावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जात आहे. परिणामी तालुक्यात सातशे ते आठशे फूट बोअरवेल करून भूगर्भातून पाण्याचा उपसा सुरू आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे ओलित विहिरीवर अवलंबून आहे अशा विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने ओलितास पाणी पुरत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पावसाचे पाणी शिवारातील जमिनीत मुरावे व भूगर्भातील पाणी पातळी वाढावी याकरिता शासनाच्या वतीने ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. असाच बंधारा आष्टीकला-निमजी शिवारातून वाहणाऱ्या नाल्यावर बांधण्यात आला. नाल्याच्या काठावर भुजंग नत्थू डाफ, देवराव नत्थू डाफ, दुर्गा विठोबा शिंगणे, नारायण श्रावण कसरे, अशोक तानबा भोयर, निंबा वरलू बांबल, यादोराव मारोती खडसे, पुरुषोत्तम शामराव डेहनकर, मो. जमीन. मो. अली अमीन, बापूराव लक्ष्मण निखाडे, शीला भगवान भोयर या शेतकऱ्यांची शेती आहे. या नाल्याला दोन वेगवेगळ्या नाल्याचे पाणी येत असल्याने तसेच हा बंधारा मातीने बुजल्याने नाल्याकाठावर असलेल्या शेतातून पाण्याचा प्रवाह वाहतो. तसेच नाल्याकाठावरील जमिनीचा भाग खचून जात असल्याने शेतीपिकांसोबतच शेतीचेसुद्धा नुकसान होते. यामुळे या बंधाऱ्याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.