शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सिमेंट बंधारा ठरतोय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST

कळमेश्वर : आष्टीकला व निमजी शिवारात नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यास शेतीला मारक ठरत आहे. यामुळे ...

कळमेश्वर : आष्टीकला व निमजी शिवारात नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यास शेतीला मारक ठरत आहे. यामुळे हा बंधारा तोडून तो दुसऱ्या जागी बांधावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जात आहे. परिणामी तालुक्यात सातशे ते आठशे फूट बोअरवेल करून भूगर्भातून पाण्याचा उपसा सुरू आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे ओलित विहिरीवर अवलंबून आहे अशा विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने ओलितास पाणी पुरत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पावसाचे पाणी शिवारातील जमिनीत मुरावे व भूगर्भातील पाणी पातळी वाढावी याकरिता शासनाच्या वतीने ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. असाच बंधारा आष्टीकला-निमजी शिवारातून वाहणाऱ्या नाल्यावर बांधण्यात आला. नाल्याच्या काठावर भुजंग नत्थू डाफ, देवराव नत्थू डाफ, दुर्गा विठोबा शिंगणे, नारायण श्रावण कसरे, अशोक तानबा भोयर, निंबा वरलू बांबल, यादोराव मारोती खडसे, पुरुषोत्तम शामराव डेहनकर, मो. जमीन. मो. अली अमीन, बापूराव लक्ष्मण निखाडे, शीला भगवान भोयर या शेतकऱ्यांची शेती आहे. या नाल्याला दोन वेगवेगळ्या नाल्याचे पाणी येत असल्याने तसेच हा बंधारा मातीने बुजल्याने नाल्याकाठावर असलेल्या शेतातून पाण्याचा प्रवाह वाहतो. तसेच नाल्याकाठावरील जमिनीचा भाग खचून जात असल्याने शेतीपिकांसोबतच शेतीचेसुद्धा नुकसान होते. यामुळे या बंधाऱ्याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.