शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

संघाची शताब्दी साजरी करणे हा आमच्यासाठी चिंतेचा विषय

By योगेश पांडे | Updated: April 18, 2024 22:57 IST

मोहन भागवत : देशात आत्मविस्मृतीमुळे आपले कोण याबाबतीत ज्ञानाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शताब्दी वर्षाची तयारी सुरू असताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मात्र वेगळेच वक्तव्य केले आहे. संघाची शताब्दी साजरी करावी लागते आहे हा आमच्या चिंतेचा विषय आजही आहे. शताब्दी साजरी वगैरे करायची नाही असे काही लोकदेखील म्हणतात .कुण्या एका संस्थेचे अहंकाराचा पोषण करण्यासाठी संघ नाही. आम्ही हे काम केले, ते काम केले सांगण्यासाठी संघ स्थापन झालेला नाही, असे विचार सरसंघचालकांनी मांडले. नागपुरात साप्ताहिक विवेकच्या संघावरील ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. आपल्या देशातील मागील काही शतकांचा इतिहास आहे की बाहेरून कुणी येतो व गुलाम बनवतो. मात्र संघर्ष करून स्वतंत्र झाल्यावर आपण काही चुका करत परत गुलामगिरीत जातो. आपले भेद परकीयांच्या यशाला खतपाणी घालतात. हा मोठा रोगच आहे. याचे निदान झाल्याशिवाय देशाचे नष्टचर्य संपणार नाही. आपल्या देशात आत्मविस्मृतीमुळे आपले कोण याबाबतीत ज्ञानाचा अभाव आहे. मानसिक गुलामगिरीमुळे आत्मविश्वास नाही .त्यामुळे स्वार्थ आणि भेदांचे थैमान आहे. ओळख आपल्या मनात स्पष्टपणे जागली पाहिजे, असेदेखील सरसंघचालक म्हणाले.

मुळात संघ कुठल्या भौतिक साधनांवर नव्हे तर लोकांच्या जीवनावर चालतो. संघाचा प्रवासाचे चित्रण लहान ग्रंथात होणे कठीण आहे. संघाबाबत लिहीणे वाढत राहणार. अगदी देशविदेशातील जाणकार लोकांना संघ महत्त्वाचा घटक वाटतो व तो समजायला हवा असे ते मानतात. संघ केवळ बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट नाही. १९२५ साली कुठल्याही साधनाशिवाय संघाची सुरुवात झाली. सुरुवातीला अनेकांना त्रास अडचणी सहन कराव्या लागल्या. आज अनुकूलता आहे. संघाचा प्रवास खडतर संघर्षातून झाला आहे. स्थितीचा उतारचढाव काहीही असला तरी त्याला तोंड देत समोर जाणारी संघटना कायम असते. संघाच्या स्वयंसेवकांनी काय केले यापेक्षा ते कसे असावेत यावर संघ भर देतो, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. अश्विनी मयेकर यांनी संचालन केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ