शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संघाची शताब्दी साजरी करणे हा आमच्यासाठी चिंतेचा विषय

By योगेश पांडे | Updated: April 18, 2024 22:57 IST

मोहन भागवत : देशात आत्मविस्मृतीमुळे आपले कोण याबाबतीत ज्ञानाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शताब्दी वर्षाची तयारी सुरू असताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मात्र वेगळेच वक्तव्य केले आहे. संघाची शताब्दी साजरी करावी लागते आहे हा आमच्या चिंतेचा विषय आजही आहे. शताब्दी साजरी वगैरे करायची नाही असे काही लोकदेखील म्हणतात .कुण्या एका संस्थेचे अहंकाराचा पोषण करण्यासाठी संघ नाही. आम्ही हे काम केले, ते काम केले सांगण्यासाठी संघ स्थापन झालेला नाही, असे विचार सरसंघचालकांनी मांडले. नागपुरात साप्ताहिक विवेकच्या संघावरील ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. आपल्या देशातील मागील काही शतकांचा इतिहास आहे की बाहेरून कुणी येतो व गुलाम बनवतो. मात्र संघर्ष करून स्वतंत्र झाल्यावर आपण काही चुका करत परत गुलामगिरीत जातो. आपले भेद परकीयांच्या यशाला खतपाणी घालतात. हा मोठा रोगच आहे. याचे निदान झाल्याशिवाय देशाचे नष्टचर्य संपणार नाही. आपल्या देशात आत्मविस्मृतीमुळे आपले कोण याबाबतीत ज्ञानाचा अभाव आहे. मानसिक गुलामगिरीमुळे आत्मविश्वास नाही .त्यामुळे स्वार्थ आणि भेदांचे थैमान आहे. ओळख आपल्या मनात स्पष्टपणे जागली पाहिजे, असेदेखील सरसंघचालक म्हणाले.

मुळात संघ कुठल्या भौतिक साधनांवर नव्हे तर लोकांच्या जीवनावर चालतो. संघाचा प्रवासाचे चित्रण लहान ग्रंथात होणे कठीण आहे. संघाबाबत लिहीणे वाढत राहणार. अगदी देशविदेशातील जाणकार लोकांना संघ महत्त्वाचा घटक वाटतो व तो समजायला हवा असे ते मानतात. संघ केवळ बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट नाही. १९२५ साली कुठल्याही साधनाशिवाय संघाची सुरुवात झाली. सुरुवातीला अनेकांना त्रास अडचणी सहन कराव्या लागल्या. आज अनुकूलता आहे. संघाचा प्रवास खडतर संघर्षातून झाला आहे. स्थितीचा उतारचढाव काहीही असला तरी त्याला तोंड देत समोर जाणारी संघटना कायम असते. संघाच्या स्वयंसेवकांनी काय केले यापेक्षा ते कसे असावेत यावर संघ भर देतो, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. अश्विनी मयेकर यांनी संचालन केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ