शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; सर्व नागरिकांनी संविधानाचे अध्ययन करावे - सरसंघचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 15:49 IST

आजच्या स्थितीत संविधानाचे सर्वांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. असे झाले तरच समता व स्वतंत्रता या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेला बंधुभाव वाढेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.

नागपूर : संविधानात दिलेल्या तत्वांवर आधारित आचरण व व्यवहार हा जास्त महत्त्वाचा असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. आजच्या स्थितीत संविधानाचे सर्वांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. असे झाले तरच समता व स्वतंत्रता या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेला बंधुभाव वाढेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी तिरंगा फडकवत ध्वजवंदन केले. त्यावेळी ते बोलत होते.

४० वर्षांअगोदर जर कुणी भारत प्रगतीपथावर चालेल असे म्हटले तर लोक आपली खिल्ली उडवायचे. मात्र आज देश सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची ही आशा आहे ही देश विश्वगुरू झाला पाहिजे. ती आपल्या देशाची क्षमतादेखील आहे. आपल्या देशात २२ जानेवारी व आज एक नव्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. मात्र देशाप्रति असलेली ही भावना केवळ एका दिवसासाठी नको. संविधानातील मुख्य तत्वांचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

यावेळी विविध प्रचारक, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुरक्षादलाच्या जवानांनीदेखील तिरंग्याला सलामी दिली.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ