शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

५ फेब्रुवारी हा आतंकवाद विराेधी दिवस म्हणून साजरा करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST

नागपूर : पाकिस्तानद्वारे ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर एकात्मता दिवस म्हणून पाळत असते. पाकिस्तानला चाेख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही हा ...

नागपूर : पाकिस्तानद्वारे ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर एकात्मता दिवस म्हणून पाळत असते. पाकिस्तानला चाेख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही हा दिवस आतंकवाद विराेधी दिवस म्हणून साजरा करावा, अशी मागणी माजी वायुसैनिक कल्याण संघटनेतर्फे (इवान) करण्यात आली. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली.

१४ फेब्रुवारी २०१९ राेजी स्फाेटके भरलेली कार सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये घुसली आणि जवानांच्या बसला धडक दिली. या भीषण हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांचा हकनाक बळी गेला. या घटनेचा निषेध व हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी इवान संघटनेच्या वतीने वर्धा राेड अजनीस्थित अमर जवान स्मारकावर कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. यावेळी निवृत्त वायुसैनिकांसह नागरिकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संघटनेचे सचिव महेश आंबाेकर म्हणाले, भारतीय जवान दहशतवाद्यांना चाेख प्रत्युत्तर देत आहेत. मात्र भारतीय म्हणून नागरिकांनी जवानांचे मनाेबल वाढविण्याची गरज आहे. अल्पवयात सैन्यात भरती हाेणारा जवान देशाच्या सीमांवर दिवस-रात्र पहारा देत असताे. त्यामुळे देशातील जनता सुरक्षित आहे व उत्सव सुरक्षित पार पाडत असते. सरकारने ५ फेब्रुवारी आतंकवादी विराेधी दिवस म्हणून निर्धारित करून दहशतवाद्यांचे खच्चीकरण करावे, अशी भावना आंबाेकर यांनी व्यक्त केली.

ब्रिगेडियर सुनील गावपांडे यांनी, पुलवामा घटनेत जवानांच्या मृत्यूचे नुकसान भरून येणारे नाही. पुढे भारतीय जवानांनी चाेख प्रत्युत्तर देऊन घटनेचा वचपा काढला. मात्र अशाप्रकारच्या घटना भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगल्या नाहीत. त्यासाठी लाेकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत हाेणे आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. इवान संघटनेचे अध्यक्ष मनाेहर भातकुलकर यांनीही भावना व्यक्त केल्या. यावेळी श्रीकांत गंगाथडे, चंद्रशेखर कुळकर्णी, प्रमाेद भुसारी, ओमप्रकाश शिरपूरकर, विवेक समर्थ, सुधाकर सार्वे, विलास दवणे, नीलेश व्यास, गाेपाल वानखडे, मधुकर भांडारकर, विनाेद कडू, केळापुरे, गलगलीकर, किशाेर हजारे, पंजाबराव भाेयर, किरपाने, पेरकर, अजय उदार, अजय गाढवे, प्रदीप देव, पुंडलिक सावंत, रामभाऊ काेरके, रमेश गायकवाड, लक्ष्मणराव साळुंखे, मनाेज कुळकर्णी, मनीष भातकुलकर, नारायण लालखेडे आदी उपस्थित हाेते.