शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

अधिकाऱ्यांच्या भांडणात ‘जात पडताळणी’ बंद

By admin | Updated: March 9, 2015 02:01 IST

समाजकल्याण आणि महसूल या दोन विभागातील अधिकाऱ्यांच्या भांडणामुळे सध्या जात

गरीब विद्यार्थ्यांना फटका : २ लाख ४० हजार अर्ज प्रलंबित नागपूर : समाजकल्याण आणि महसूल या दोन विभागातील अधिकाऱ्यांच्या भांडणामुळे सध्या जात पडताळणीचे काम बंद पडले आहे. परिणामी २ लाख ४० हजार अर्ज प्रलंबित आहेत. यामध्ये ७२ हजार अर्ज मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे तर १ लाख ६७ हजार अर्ज विद्यार्थ्यांचे आहेत. जात पडताळणीचे काम बंद असल्याने मागासवर्गीयांची पदोन्नती आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. तेव्हा जात पडताळणीचे काम तातडीने सुरू करून जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केली आहे. यासंबंधात इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचेही निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९३२ मध्ये इंग्रज सरकारने अस्पृश्यांसाठी ‘बॅकवर्ड क्लास’ विभाग सुरू केला. १९४२-४३ ला पोस्ट एसएससी शिष्यवृत्ती सुरू केली. १९४८ ला समाजकल्याण खाते सुरू करण्यात आले. १९७४ साली जात पडताळणी विभाग सुरू करण्यात आला. पुढे महसूल खात्यातील अपर जिल्हाधिकारी यांना समितीचे अध्यक्ष केले. समाज कल्याण विभाग आणि महसूल विभाग यांच्या भांडणामुळे जात पडताळणी बंद झाली. तेव्हा ही जातपडताळणी तातडीने सुरू करण्यात यावी. तसेच गडचिरोली येथील स्कॉलरशीप घोटाळ्यामुळे शिष्यवृत्ती मंजूर करण्याचे कामच थांबवण्यात आले आहे. त्यामुळे १० लाख विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. आता आॅनलाईन अर्ज भरण्यात येत असल्याने काहीही कळायला मार्ग नाही. त्यामुळे त्यांना प्राचार्याच्या शिफारशीवरच अवलंबून राहावे लागते. कोणता नवीन अभ्यासक्रम सुरू झाला याची माहिती विद्यापीठ देत नाही. तेव्हा याकडेही शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी इंगळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)