शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जात वैधता समितीला खडसावले

By admin | Updated: February 18, 2015 02:49 IST

एखाद्याला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातील दुसऱ्या व्यक्तीचा समान जात वैधतेचा दावा नाकारला जाऊ शकत नाही.

नागपूर : एखाद्याला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातील दुसऱ्या व्यक्तीचा समान जात वैधतेचा दावा नाकारला जाऊ शकत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही जात वैधता पडताळणी समितीचे अधिकारी बिनडोकपणे वागून एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना वेगवेगळे निकष लावत आहेत. अकोला विभागीय जात वैधता पडताळणी समितीला याचा जोरदार फटका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीचे अध्यक्ष व सदस्यांना व्यक्तिश: बोलावून कडक शब्दांत खडसावले. समिती अध्यक्ष एच.पी. तुमोड व सदस्य भीमराव खंडाते न्यायालयात उपस्थित झाले होते. दुसऱ्या सदस्य प्राजक्ता इंगळे रुग्णालयात भरती असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत. एखाद्याने बनावट दस्तावेजाच्या आधारे मिळविलेले वैधता प्रमाणपत्र नाकारले जाऊ शकते, पण वैध प्रमाणपत्राचा उचित सन्मान झाला पाहिजे. परंतु, समिती विवेकबुद्धीला वेशीबाहेर सोडून मुलाला वैधता प्रमाणपत्र देताना वडिलाच्या वैधता प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष करीत आहे. हा सामान्य व्यक्तींचा मानसिक छळ करण्याचा प्रकार आहे. अधिकार व कर्तव्य हातात हात टाकून चालायला हवे हे कोणीच विसरू नये, असे मत न्यायालयाने समितीला फटकारताना नोंदविले. समिती पदाधिकाऱ्यांनी न्यायालयासमक्ष प्रतिज्ञापत्र सादर करून बिनशर्त क्षमा मागितली. तसेच, यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली. यामुळे न्यायालयाने अधिकाऱ्यांना क्षमा करून सरकारी वकिलाला या आदेशाची प्रत सर्व जात वैधता पडताळणी समितींकडे पाठविण्याची सूचना केली. अकोला समितीने राजपूत भामटा (विमुक्त जाती) जातीचा दावा फेटाळल्यामुळे बुलडाणा येथील आशिष सोळंकी, सिद्धेश्वर मोरे व प्राजक्ता गायकवाड यांनी उच्च न्यायालयात वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या होत्या. मोरे यांच्या चुलत भावाला, गायकवाड यांच्या वडिलाला, तर सोळंकी यांच्या सख्ख्या बहिणीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. परंतु, या तिघांना वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आले होते. यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांत वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देतानाच समितीला समन्स बजावला होता. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. एन. बी. काळवाघे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)