शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बनवाडी गावातील प्रकरण : अवैध उत्खनन करणाऱ्यांवर ठोठावला ३.७७ कोटीचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:07 IST

बनवाडी गावातील परिसरात करण्यात येत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात तहसीलदारमार्फत संबंधित शेतजमिनीच्या मालकांच्या नावावर नोटीस पाठवण्यात आली आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांनी पाठविली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनवाडी गावातील परिसरात करण्यात येत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात तहसीलदारमार्फत संबंधित शेतजमिनीच्या मालकांच्या नावावर नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकमतने सर्वप्रथम ४ जून रोजी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर जिल्हा प्रशासन व तहसील प्रशासनाने कारवाई केली.बनवाडी गावाजवळ पोकलॅण्ड आणि जेसीबी मशीनच्या मदतीने पहाड खोदून जमीन समतल करण्यात येत होती. भूमाफियांच्या इशाऱ्यावर दिवसाढवळ्या सुरू असलेले हे अवैध उत्खनन प्रशासनाच्या नजरेस पडले नाही. अखेर लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यासंबंधात वृत्त प्रकाशित होताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात जिल्हा खनिकर्म अधिकाºयांना जबाब मागितला. तसेच नागपूर ग्रामीणच्या तहसीलदारासह स्पॉट पंचनामा करण्याचे आदेश दिले. यानंतर लोकमतने याचा पाठपुरावा सुरूच ठेवला. तहसील प्रशासनाकडून अशीही माहिती मिळाली की, बनवाडी गावातील ज्या तीन-चार शेत मालकांना नोटीस जारी करण्यात आली आहे, त्यांच्याच जमिनीवर अवैध खनन करण्यात आले आहे. यातील एका शेतजमिनीचा मालक मुंंबईत राहतो. त्याच्या जमिनीवर सर्वाधिक खनन झाल्याची माहिती आहे. प्रशासनाने पाठवलेल्या या नोटीसवर या सर्व मालकांच्या उत्तराची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. त्यांचे म्हणणे आहे की, उत्तर आल्यावरच पुढील कारवाई निश्चित केली जाईल. तहसील प्रशासनानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या सीमांकनाच्या प्रक्रियेला हिरवी झेंडी दाखवली आहे ती भूमी अभिलेख कार्यालयाचे पथक आल्यानंतर सुरू केली जाईल.सर्व्हेयर पोहोचलेजिल्हाधिकाऱ्यांनी सीमांकनाची प्रक्रिया सुरूकरण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा स्तरावरील एक सर्व्हेयर पाठवण्यात आले आहे. परंतु तहसील प्रशासनाचे म्हणणे आहे की, पत्र दिल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून या प्रक्रियेसाठी अजूनपर्यंत कुणालाही काही पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे सीमांकनाची कारवाई अजूनही सुरू होऊ शकलेली नाही.दंड न भरल्यास कारवाई होणारतहसीलदारांनी लोकमतला सांगितले की, या प्रकरणात पटवारीतर्फे करण्यात आलेल्या पंचनामा रिपोर्टच्या आधारावर तीन ते चार शेतमालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना तहसील प्रशासनाने नोटीस जारी केली आहे. ३ कोटी ७७ लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. जर संबंधित लोकांनी या दंडाची रक्कम भरली नाही तर प्रशासन कठोर पाऊल उचलत त्यांची जमीन सरकारकडे जमा करू शकते.दंडाचा आदेश जारी झाला आहेबनवाडी गाव परिसरात करण्यात आलेल्या अवैध खनन प्रकरणात पटवारीने दिलेल्या रिपोर्टच्या आधारावर तीन ते चार लोकांविरुद्ध ३.७७ कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाचा आदेश जारी झालेला आहे. जर ही रक्कम भरण्यास संबंधितांनी दुर्लक्ष केले तर त्यांच्याविरुद्ध आवश्यक कारवाई केली जाईल.मोहन टिकले, तहसीलदार, नागपूर ग्रामीण

टॅग्स :Excavationउत्खननnagpurनागपूर