शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

बनवाडी गावातील प्रकरण : अवैध उत्खनन करणाऱ्यांवर ठोठावला ३.७७ कोटीचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:07 IST

बनवाडी गावातील परिसरात करण्यात येत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात तहसीलदारमार्फत संबंधित शेतजमिनीच्या मालकांच्या नावावर नोटीस पाठवण्यात आली आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांनी पाठविली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनवाडी गावातील परिसरात करण्यात येत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात तहसीलदारमार्फत संबंधित शेतजमिनीच्या मालकांच्या नावावर नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकमतने सर्वप्रथम ४ जून रोजी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर जिल्हा प्रशासन व तहसील प्रशासनाने कारवाई केली.बनवाडी गावाजवळ पोकलॅण्ड आणि जेसीबी मशीनच्या मदतीने पहाड खोदून जमीन समतल करण्यात येत होती. भूमाफियांच्या इशाऱ्यावर दिवसाढवळ्या सुरू असलेले हे अवैध उत्खनन प्रशासनाच्या नजरेस पडले नाही. अखेर लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यासंबंधात वृत्त प्रकाशित होताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात जिल्हा खनिकर्म अधिकाºयांना जबाब मागितला. तसेच नागपूर ग्रामीणच्या तहसीलदारासह स्पॉट पंचनामा करण्याचे आदेश दिले. यानंतर लोकमतने याचा पाठपुरावा सुरूच ठेवला. तहसील प्रशासनाकडून अशीही माहिती मिळाली की, बनवाडी गावातील ज्या तीन-चार शेत मालकांना नोटीस जारी करण्यात आली आहे, त्यांच्याच जमिनीवर अवैध खनन करण्यात आले आहे. यातील एका शेतजमिनीचा मालक मुंंबईत राहतो. त्याच्या जमिनीवर सर्वाधिक खनन झाल्याची माहिती आहे. प्रशासनाने पाठवलेल्या या नोटीसवर या सर्व मालकांच्या उत्तराची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. त्यांचे म्हणणे आहे की, उत्तर आल्यावरच पुढील कारवाई निश्चित केली जाईल. तहसील प्रशासनानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या सीमांकनाच्या प्रक्रियेला हिरवी झेंडी दाखवली आहे ती भूमी अभिलेख कार्यालयाचे पथक आल्यानंतर सुरू केली जाईल.सर्व्हेयर पोहोचलेजिल्हाधिकाऱ्यांनी सीमांकनाची प्रक्रिया सुरूकरण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा स्तरावरील एक सर्व्हेयर पाठवण्यात आले आहे. परंतु तहसील प्रशासनाचे म्हणणे आहे की, पत्र दिल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून या प्रक्रियेसाठी अजूनपर्यंत कुणालाही काही पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे सीमांकनाची कारवाई अजूनही सुरू होऊ शकलेली नाही.दंड न भरल्यास कारवाई होणारतहसीलदारांनी लोकमतला सांगितले की, या प्रकरणात पटवारीतर्फे करण्यात आलेल्या पंचनामा रिपोर्टच्या आधारावर तीन ते चार शेतमालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना तहसील प्रशासनाने नोटीस जारी केली आहे. ३ कोटी ७७ लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. जर संबंधित लोकांनी या दंडाची रक्कम भरली नाही तर प्रशासन कठोर पाऊल उचलत त्यांची जमीन सरकारकडे जमा करू शकते.दंडाचा आदेश जारी झाला आहेबनवाडी गाव परिसरात करण्यात आलेल्या अवैध खनन प्रकरणात पटवारीने दिलेल्या रिपोर्टच्या आधारावर तीन ते चार लोकांविरुद्ध ३.७७ कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाचा आदेश जारी झालेला आहे. जर ही रक्कम भरण्यास संबंधितांनी दुर्लक्ष केले तर त्यांच्याविरुद्ध आवश्यक कारवाई केली जाईल.मोहन टिकले, तहसीलदार, नागपूर ग्रामीण

टॅग्स :Excavationउत्खननnagpurनागपूर