शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

परदेशी पाहुण्यांसाठी गालिचे, राज्यातील साहित्यिक फक्त श्रोते; विश्व मराठी संमेलनावरून नाराजी 

By निशांत वानखेडे | Updated: January 13, 2024 18:29 IST

मराठी भाषा विभागाच्यावतीने येत्या २७ ते २९ जानेवारीदरम्यान सिडको नवी मुंबई येथे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन केले आहे.

नागपूर: मराठी भाषा विभागाच्यावतीने येत्या २७ ते २९ जानेवारीदरम्यान सिडको नवी मुंबई येथे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाच्या निमंत्रणावरून महाराष्ट्रातील साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विभागातर्फे परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण खर्च दिला असताना राज्यातील साहित्यिकांना कार्यक्रमांची व व्यवस्थेची माहिती न देता केवळ निमंत्रण पाठविल्याने स्व:खर्चाने केवळ श्रोते म्हणून टाळ्या वाजवायला उपस्थित राहावे काय, असा सवाल करण्यात येत आहे.

महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक व अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मिळालेल्या निमंत्रणावर तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र राज्याचे मराठी भाषा मंत्री व मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. मराठी भाषा विभागातर्फे त्यांना पवई येथे हाणाऱ्या विश्व मराठी संमेलनास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणाचा मेल पाठविला आहे. मात्र कोणत्या कार्यक्रमात यायचे, कशासाठी यायचे, याबाबत काहीही माहिती या मेलमध्ये नाही. महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखकांना अशा रीतीने निमंत्रणे देणे हा त्यांचा अवमान आणि अधिक्षेप असल्याचा आरोप डॉ. जोशी यांनी केला. अशाप्रकारचे पत्र इतर काही साहित्यिकांना आल्याचे त्यांनी सांगितले.

याउलट परदेशातून येणाऱ्या लोकांना संमेलनात उपस्थित राहण्यासाठी आधीच ७५ हजार रुपये खर्च देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे परेदशातील किमान ५०० पाहुणे संमेलनात आणण्याचा प्रयत्न असल्याने यासाठी ३ कोटी ७५ लक्ष रुपये खर्च केले जाणार आहेत. म्हणजे परदेशातील लोकांना भारत फिरण्यासाठी कोटींची उधळण करून महाराष्ट्रातील साहित्यिकांशी भेदभाव करून अवमानकारक अशा वातावरणात हे संमेलन घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या वर्षी देखील असाच प्रकार झाला होता व यावर्षी देखील या अपमानकारक स्थितीची पुनरावृत्ती केली जात असल्याचा आरोप डॉ. जोशी यांनी केला.

संमेलनात उपस्थित राहण्यासाठी प्रवास, निवास, भोजन आदीसाठी किमान ४० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, तो आम्ही स्वतःच करायचा आहे काय? तसे असल्यास ते देखील स्पष्टपणे कळवायला हवे. मिळालेल्या मेलवर कुठलीच गोष्ट स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे कशासाठी नेमके यायचे आहे, कोणत्या कार्यकर्मात सहभाग नियोजित आहे, की केवळ टाळ्या वाजवायला आम्ही उपस्थित राहायचे? केवळ श्रोते म्हणून उपस्थिती नोंदवायला आम्ही यायचे असा याचा अर्थ होतो. - डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी

टॅग्स :nagpurनागपूर