शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
10
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
11
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
12
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
13
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
14
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
15
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
16
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
17
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
18
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
19
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
20
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?

नक्षलग्रस्त आदिवासींची शासनाला काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2015 03:19 IST

नक्षलवाद्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या आदिवासी भागातील निष्पाप नागरिकांची सरकारला काळजी असून त्यादृष्टीने सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार देवेंद्र गावंडे यांना प्रदान नागपूर : नक्षलवाद्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या आदिवासी भागातील निष्पाप नागरिकांची सरकारला काळजी असून त्यादृष्टीने सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. सध्या अधिवेशन सुरू असल्याने जाहीर घोषणा करणे योग्य नाही. पण यासंदर्भात सरकार योग्य निर्णय घेईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले. नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दलितमित्र, स्वातंत्र्य सैनिक चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, अ‍ॅड. प्रभाकर मारपकवार प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, नक्षली अत्याचार कमी झाले असले तरी वेगवेगळ्या स्वरूपात समाजाला त्याची झळ बसते आहे. आपले पोलीस त्यांच्याशी लढतात पण यात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. याबाबत शासन नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेईल, असे ते म्हणाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, विदर्भात नक्षली कारवायांमुळे विकास खुंटला आहे. लोकशाहीत विकास होणे अपेक्षित आहे. विदर्भाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न होत असताना नक्षलवादविरोधातही काम करणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे काम महत्त्वाचे आहे. सत्काराला उत्तर देताना गावंडे म्हणाले, या पुरस्कारापोटी मला मिळालेल्या २५ हजाराच्या निधीत माझ्याजवळचे २५ हजार जमा करून एका नक्षलग्रस्त कुटुंबाला ही मदत मी देणार आहे. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव तर आभार प्रदीप मैत्र यांनी मानले. कार्यक्रमाला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)नक्षल समर्थक संघटनांचा धोकानक्षलवाद्यांच्या कारवाया आणि अत्याचाराच्या घटना कमी झाल्या असल्या नक्षलवादाचा वेगळा चेहरा आता समोर येत आहे. नक्षल समर्थक संघटनांच्या माध्यमातून लोकांचे विचार कलुषित करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होतो आहे. विचार कलुषित केल्याने व्यवस्थेविरुद्ध आणि शासनाविरुद्ध समाजमन करण्याचे प्रयत्न चालविले जात आहे. वैचारिक गोंधळ वाढविण्याचा प्रयत्न या संघटना करीत असल्याने हे एक छुपे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. व्यवस्थेच्या विरोधात जाणे चूक नाही पण त्याचा विरोधही लोकशाही मार्गाने व्हायला हवा. या विरोधाचे स्वरूप हिंसक होते त्यावेळी चिंता करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनीच आपल्या समृद्ध लोकशाहीचा सन्मान ठेवून विरोध लोकशाही मार्गाने करायला हवा. अशा संघटनांपासून सावध राहून जनतेचे विचार दिग्भ्रमित होण्यापासून वाचविण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.