शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोग अंत नाही, इच्छाशक्तीने करा मात

By admin | Updated: April 27, 2017 01:54 IST

एरवी चित्रपट कलाकार इमरान हाश्मी याचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ती बिनधास्त, बोल्ड आणि पडद्यावरील

इमरान हाश्मी : मुलाच्या लढ्याने दिली नवी दिशा नागपूर : एरवी चित्रपट कलाकार इमरान हाश्मी याचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ती बिनधास्त, बोल्ड आणि पडद्यावरील ‘किसिंग किंग’ची प्रतिमा. मात्र या बेधडक कलाकारामागे एक हळवा, अभ्यासू, सामाजिक जाणीव असलेला व कर्करोगासारख्या रोगावर मात करणारा लढवय्या मुलाचा कणखर बाप लपला आहे, याची बहुतांश लोकांना जाणीवदेखील नाही. ‘लोकमत’ व ‘कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक जीवन, स्वस्थ जीवन’ या उपक्रमांतर्गत आयोजित परिसंवादादरम्यान इमरानच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू समोर आले. इमरान हाश्मीचा मुलगा अयान याला वयाच्या चौथ्या वर्षी कर्करोग झाला होता. इतक्या लहान वयात पोटच्या मुलाला झालेला हा आजार पाहून हाश्मी दाम्पत्य हादरून गेले होते. मात्र त्यांनी स्वत:ला सावरले व मुलाला या जीवघेण्या आजाराच्या जबड्यातून बाहेर काढले. या प्रवासातून एक गोष्ट निश्चित कळली. कर्करोग हा अंत नाही तर इच्छाशक्तीने त्यावर मात करता येऊ शकते, अशा भावना यावेळी झालेल्या मुलाखतीत इमरानने व्यक्त केल्या. श्वेता शेलगावकर यांनी त्याची मुलाखत घेतली. समुपदेशन अत्यावश्यक अयानला कर्करोग झाल्याचे जगाला का सांगतो, असे माझ्या कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र जागृती निर्माण करणे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटले. रुग्णांवर वैद्यकीय उपचार जितके आवश्यक आहे, तितकेच किंवा त्याहून जास्त समुपदेशन अत्यावश्यक आहे. कुटुंबीयांनी दिलेला आधारदेखील महत्त्वपूर्ण ठरतो. अयानवर उपचार करण्याच्या वेळी कधी ‘आयर्न मॅन’ बनवत असल्याचे सांगितले तर कधी शरीरातील राक्षस बाहेर काढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले होते. रुग्णांशी संवाद साधणे गरजेचे असते. कर्करोगाबाबत अनेक जण बाहेर वाच्यता करण्याचे टाळतात. ही मानसिकता बदलल्या गेली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन इमरान हाश्मीने केले. ‘लोकमत’च्या पुढाकाराचे कौतुक कर्करोगासंदर्भातील जनजागृतीसंदर्भात ‘लोकमत’ने आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कर्करोगाबाबतची माहिती, कारणे, उपचार यांची माहिती जनतेपर्यंत गेले पाहिजे. अशाप्रकारच्या उपक्रमांची समाजाला आवश्यकता आहे, असे कौतुकोद्गार यावेळी इमरानने काढले.