शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

नागपुरातील एक लाख लोकांमध्ये ९१ पुरुषांना कर्करोग; राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचा अभ्यास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 08:45 IST

Nagpur News नागपुरातील एक लाख लोकांमध्ये ९१ पुरुष आणि ९० महिला कर्करोगाने ग्रस्त आहेत. तर, पुण्यात एक लाखामागे ८३, औरंगाबादमध्ये ७० आणि उस्मानाबादमध्ये ४० रुग्णांमध्ये कर्करोग आढळून आल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या अभ्यासातून पुढे आले.

नागपूर : नागपुरातील एक लाख लोकांमध्ये ९१ पुरुष आणि ९० महिला कर्करोगाने ग्रस्त आहेत. तर, पुण्यात एक लाखामागे ८३, औरंगाबादमध्ये ७० आणि उस्मानाबादमध्ये ४० रुग्णांमध्ये कर्करोग आढळून आल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या अभ्यासातून पुढे आले.

३१ मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर आयोजित सोमवारी पत्रपरिषदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. करतार सिंग, डॉ. बी. के. शर्मा व सचिव अनिल मालवीय यांनी ही माहिती दिली. डॉ. सिंग म्हणाले, २०२१मध्ये हा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आलेल्या ८०६ म्हणजेच ३५.७ टक्के रुग्णांमध्ये तोंडाचा कर्करोग आढळून आला. ३५५ म्हणजे, १७.७ टक्के महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. ३.६ टक्के रुग्णांमध्ये अन्ननलिकेचा, ३.३ टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा, १.२ टक्के रुग्णांमध्ये पोटाचा, ०.८ टक्के रुग्णांमध्ये अस्थिमज्जाचा आणि ०.७ टक्के रुग्णांमध्ये यकृताच्या कर्करोगाचे निदान झाले. केरळ, मिझोराम, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब आणि आसाम या राज्यांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. येथे प्रति लाख लोकसंख्येमध्ये १३० पेक्षा जास्त कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात.

-महाराष्ट्रात २ कोटी २८ लाख लोकांना तंबाखूचे व्यसन

महाराष्ट्रात जवळपास ३१.४ टक्के लोकसंख्या म्हणजे २ कोटी २८ लाख ९९ हजार २७३ लोक तंबाखूचे सेवन करतात. त्यापैकी ३.४ टक्के म्हणजे २८ लाख ४ हजार ३८० लोक सिगारेटचे सेवन करतात. याशिवाय २.७ टक्के म्हणजे २२ लाख २७ हजार ८ लोक विडी, तर २७.६ टक्के म्हणजे २ कोटी २७ लाख ६४ हजार ९९६ लोक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात.

-कॅन्सरचे रुग्ण दीड ते तीन पटीने वाढले

हॉस्पिटलचे सल्लागार व कॅन्सरतज्ज्ञ डॉ. बी. के. शर्मा यांनी सांगितले, २०२२ मध्ये भारतात सुमारे १९ ते २० लाख कॅन्सरचे रुग्ण आढळून आले. सुमारे दीड ते तीन पटीने रुग्ण वाढल्याचा अंदाज आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी तंबाखू व त्यापासून बनवलेल्या उत्पादनावर पूर्णत: बंदी आवश्यक आहे. ३१ मे रोजी सकाळी ८:३० वाजता जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त हॉस्पिटलतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग