शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’बाबतचा निर्णय तातडीने रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:56 IST

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय हा अनुसूचित जाती व जमातीसाठी अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाच्यावतीने करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरुद्ध गुरुवारी समता सैनिक दलाने समता जागर मार्च काढून या निर्णयाचा जाहीर निषेध केला.

ठळक मुद्देसमता जागर मार्च : समता सैनिक दलातर्फे राष्ट्रपती व मुख्य न्यायाधीशांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय हा अनुसूचित जाती व जमातीसाठी अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाच्यावतीने करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरुद्ध गुरुवारी समता सैनिक दलाने समता जागर मार्च काढून या निर्णयाचा जाहीर निषेध केला.समता सैनिक दलाच्या पुढाकाराने गुरुवारी दुपारी संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून समता जागर मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये ५० च्या वर एस.सी., एसटी. व आंबेडकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स कॉलेजच्या चौकात हा मार्च अडवण्यात आला. येथे मार्चचे सभेत रुपांतर जाले. अनेकांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अन्यायाकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यानंतर एक शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना आणि उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निवेदन सादर करण्यात आले.या मार्चमध्ये भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, घनश्याम फुसे, ई.झेड. खोब्रागडे, शिवदास वासे, राजरतन कुंभारे, विश्वास पाटील, सुनील जवादे, वंदना जीवने, संजय जीवने, उषाताई बौद्ध, संजय पाटील, रोशन बेहरे, राजेश लांजेवार, प्रफुल्ल मेश्राम, आनंद तेलंग, प्रदीप गणवीर, विनोद बन्सोड, दादाराव तागडे, अजय बोरकर, आनंद पिल्लेवान, अनिल इंगळे, रितेश देशभ्रतार, तुफान कांबळे आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाagitationआंदोलन