शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

खासगी रुग्णालयात कोरोना उपचाराचा आदेश रद्द करा; राज्य सरकार व मनपाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 20:36 IST

शहरातील १२ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा, उपकरणे, औषधे व मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. तो आदेश रद्द करण्यात यावा, अशा विनंतीसह धंतोली नागरिक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील १२ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा, उपकरणे, औषधे व मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. यासंदर्भात २३ एप्रिल रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. तो आदेश रद्द करण्यात यावा, अशा विनंतीसह धंतोली नागरिक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.त्या अर्जावर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकार व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून अर्जावर ५ मेपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. संबंधित १२ खासगी रुग्णालयांमध्ये धंतोलीतील अवंती इन्स्टिट्यूट आॅफ कार्डिओलॉजीचा समावेश आहे. त्यामुळे अर्जदारांनी वादग्रस्त आदेशावर आक्षेप घेतला आहे. धंतोली घनदाट लोकवस्तीचा परिसर आहे. या ठिकाणी अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. अशा लोकवस्त्यांमधील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केल्यास परिसरात कोरोनाचे संक्रमण होईल. आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या वस्त्यांमध्ये हा धोकादायक आजार पसरेल, असे अर्जदारांचे म्हणणे आहे.याशिवाय अर्जदारांनी वादग्रस्त आदेशाच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य सरकारने १४ मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत सक्षम अधिकारी कोरोना प्रतिबंध व नियंत्रणाकरिता कार्य करतील, असे म्हटले आहे. मनपा आयुक्तांचा वादग्रस्त आदेश अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. या आदेशाद्वारे कोरोना रुग्णांच्या उपचाराचा मुद्दा हाताळण्यात आला आहे. त्याचा कोरोना प्रतिबंध व संक्रमण रोखण्याशी संबंध नाही, असे अर्जदारांनी नमूद केले आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेची रुग्णालयेही सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी केली. त्यामुळे न्यायालयाने मनपाला यावरदेखील उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी व अ‍ॅड. अश्विन देशपांडे, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. दीपक ठाकरे तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.केरळ मॉडेलचा अवलंब करणार का?कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार केरळ मॉडेलचा अवलंब करणार का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. तसेच, यावर ५ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात व्यावसायिक सुभाष झंवर यांनी अर्ज दाखल केला आहे. आधी केरळमधील कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त होती. त्यानंतर केरळने प्रभावी उपाययोजना केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. आता महाराष्ट्रात केरळपेक्षा खूप जास्त कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे केरळ मॉडेलची माहिती न्यायालयात सादर करण्यात यावी व महाराष्ट्र सरकारने या मॉडेलचा अवलंब करावा, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदारातर्फे अ‍ॅड. राम हेडा यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :Courtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस