शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

आज कुणाला सापडेल का महाकवि कालिदास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

- आषाढस्य प्रथम दिवसे : महाकवी कालिदासाच्या स्मरण-विस्मरणाचा काळ प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रज्ञावंतांच्या चिंतन, ...

- आषाढस्य प्रथम दिवसे : महाकवी कालिदासाच्या स्मरण-विस्मरणाचा काळ

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रज्ञावंतांच्या चिंतन, मननातून भारतीय साहित्य संपदा समृद्ध झाली आहे. अगदी अस्तित्त्वात असलेल्या प्राचिन-पौराणिक ग्रंथसंपदेतून हे स्पष्ट होते आणि त्याचे प्रमाण जगाने मान्य केले आहे. कवी कुलगुरू म्हणून ओळख प्रदान करण्यात आलेल्या महाकवि कालिदासाची साहित्य संपदा जगभरासाठी उत्सुकतेचा विषय ठरली आहे. मात्र, आपल्याकडे ही उत्सुकता केवळ डीग्री मिळविण्यासाठीची दिसून येते. तेथेच हा महाकवि हरविल्याचे भासते. तो आज कुणाला सापडेल का? हा संशोधनाचा विषय ठरतो आहे.

प्रेयसी-पत्नी विद्योत्तमेने भ्रमातून एका मुर्खाला विद्वान म्हणून वरमाला घातली. पहिल्याच रात्री तिचा भ्रम तुटला आणि तिच्या तोंडून शब्द निघाले ‘अस्ति कश्चित् वाग्‌विशेषः?’ अर्थात तुझ्या वाणीत थोडे तरी विशेष आहे का? आणि तेथून सुरू झाला एका मुर्खाचा विद्वत्तेकडील प्रवास. पुढे अस्ति - कुमारसंभवची सुरुवात, कश्चित्-मेघदूताची सुरुवात आणि वाग् - रघुवंशाची सुरुवात, ही तीन महाकाव्ये त्याच शब्दाच्या प्रारंभाने रचली गेली. कालिदासाच्या अस्तित्त्वाबाबत आजही संशोधन सुरू आहे. सुमारे ३०० वर्षांच्या काळात तो कधीतरी होऊन गेल्याचे सांगितले जाते. मात्र, तो कधी झाला, याबाबत आजही स्पष्टता नाही. विद्योत्तमेने झिडगारल्यामुळे तो रामटेकमध्ये आला आणि पत्नीच्या विरहवेदनेत लिहिलेले यक्षगाणरूपी ‘मेघदूतम्’ हे काव्य फार प्रसिद्ध झाले आणि त्याचे वेड प्रेमात व्यथित झालेल्यांसाठी प्रेमग्रंथ झाले. कलिदासाच्या सर्वच साहित्यकृतींवर नाटके, गायन झाले. मात्र, त्यापलीकडे जाऊन व्हावयाचा विचार अजूनही उजागर झालेला दिसत नाही. मुळात कालिदास म्हणजे तरी कोण, हा विषय केवळ ऐकण्या-बोलण्यापुरताच राहिला आहे. मेघदूतम्मधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या ओळीमुळे कालिदासाच्या अस्तित्त्वाला ओळख देण्यासाठी कालिदास दिन म्हणून साजरा होतो, एवढाच तो विषय.

--------

शेख चिल्ली आणि कालिदास

झाडाची जी फांदी कापायची, त्याच फांदीवर तो कुऱ्हाड घेऊन बसला... अशी महामुर्खपणाची दंतकथा आहे. बऱ्याच काळापासून ही कथा महामुर्खपणाचे उदाहरण देण्यासाठी शेख चिल्लीच्या नावाचा वापर केला जात होता. अनेकांच्या अभ्यासातून ही कथा कालिदासाच्या संदर्भातीलच असल्याचे स्पष्ट होते. मात्र, कालिदास म्हणजे मुर्ख हा मुळात मुर्ख नसतो तर तो आपल्या महत्तम प्रयासाने विद्वान होऊ शकतो, ही प्रेरक कथा कधीच अस्तित्त्वात आली नाही. हा दोष कुणाचा?

------------

बाळकडूचे विस्मरण

स्वत्त्वाची जाणीव बळकट करण्यासाठी लहानपणीच बाळकडू देण्याची परंपरा सर्वदेशात, संस्कृतीत आढळून येते. भारतात मात्र, त्या बाळकडूचे विस्मरण झालेले दिसते. त्यामुळेच, कालिदास, भवभूती, अश्वघोष, भास आदी अनेक प्रज्ञावंतांचे हळूहळू विस्मरण झाले. त्याचा परिणाम वयात येईपर्यंत जेव्हा कानावर कालिदास किंवा अन्य कुणाचेही नाव आले तर हा कोण? असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडतो. मोठमोठी काव्यपदे, नाटके हा शालेय अभ्यासाचा विषय नक्कीच नाही. मात्र, या विभूतींसंदर्भातील कथा, दंतकथा आदी शिकविण्यात आल्यास मुले मोठी होईपर्यंत स्वत्त्वाची जाणीव बळकट होईल.

- अजेय गंपावार, मुलाखतकार

----------------

कालिदास केवळ स्मरणापुरताच

कालिदास म्हणा वा अश्वघोष किंवा अन्य कोणतेही प्राचित साहित्यिक आता केवळ नावापुरतेच उरलेले आहेत. काही मोजके लोक त्यांचे स्मरण करतात आणि कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, त्यापुढे जाऊन तो कोण, त्याचे कार्य कोणते, वैशिष्ट्ये कोणती आदींची चर्चा घडतच नाही. माझ्या काही विद्यार्थिनींनी कालिदास हा विषय पीएचडीसाठी घेतला. मात्र, त्यापलीकडे जाऊन कालिदासाच्या कल्पना विशेष का आहेत, त्यातून मिळणाऱ्या प्रेरणा कोणत्या, कलासक्ती काय... यावर कोणीच बोलत नाहीत.

- डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी, संस्कृत विद्वान

................