शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आज कुणाला सापडेल का महाकवि कालिदास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

- आषाढस्य प्रथम दिवसे : महाकवी कालिदासाच्या स्मरण-विस्मरणाचा काळ प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रज्ञावंतांच्या चिंतन, ...

- आषाढस्य प्रथम दिवसे : महाकवी कालिदासाच्या स्मरण-विस्मरणाचा काळ

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रज्ञावंतांच्या चिंतन, मननातून भारतीय साहित्य संपदा समृद्ध झाली आहे. अगदी अस्तित्त्वात असलेल्या प्राचिन-पौराणिक ग्रंथसंपदेतून हे स्पष्ट होते आणि त्याचे प्रमाण जगाने मान्य केले आहे. कवी कुलगुरू म्हणून ओळख प्रदान करण्यात आलेल्या महाकवि कालिदासाची साहित्य संपदा जगभरासाठी उत्सुकतेचा विषय ठरली आहे. मात्र, आपल्याकडे ही उत्सुकता केवळ डीग्री मिळविण्यासाठीची दिसून येते. तेथेच हा महाकवि हरविल्याचे भासते. तो आज कुणाला सापडेल का? हा संशोधनाचा विषय ठरतो आहे.

प्रेयसी-पत्नी विद्योत्तमेने भ्रमातून एका मुर्खाला विद्वान म्हणून वरमाला घातली. पहिल्याच रात्री तिचा भ्रम तुटला आणि तिच्या तोंडून शब्द निघाले ‘अस्ति कश्चित् वाग्‌विशेषः?’ अर्थात तुझ्या वाणीत थोडे तरी विशेष आहे का? आणि तेथून सुरू झाला एका मुर्खाचा विद्वत्तेकडील प्रवास. पुढे अस्ति - कुमारसंभवची सुरुवात, कश्चित्-मेघदूताची सुरुवात आणि वाग् - रघुवंशाची सुरुवात, ही तीन महाकाव्ये त्याच शब्दाच्या प्रारंभाने रचली गेली. कालिदासाच्या अस्तित्त्वाबाबत आजही संशोधन सुरू आहे. सुमारे ३०० वर्षांच्या काळात तो कधीतरी होऊन गेल्याचे सांगितले जाते. मात्र, तो कधी झाला, याबाबत आजही स्पष्टता नाही. विद्योत्तमेने झिडगारल्यामुळे तो रामटेकमध्ये आला आणि पत्नीच्या विरहवेदनेत लिहिलेले यक्षगाणरूपी ‘मेघदूतम्’ हे काव्य फार प्रसिद्ध झाले आणि त्याचे वेड प्रेमात व्यथित झालेल्यांसाठी प्रेमग्रंथ झाले. कलिदासाच्या सर्वच साहित्यकृतींवर नाटके, गायन झाले. मात्र, त्यापलीकडे जाऊन व्हावयाचा विचार अजूनही उजागर झालेला दिसत नाही. मुळात कालिदास म्हणजे तरी कोण, हा विषय केवळ ऐकण्या-बोलण्यापुरताच राहिला आहे. मेघदूतम्मधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या ओळीमुळे कालिदासाच्या अस्तित्त्वाला ओळख देण्यासाठी कालिदास दिन म्हणून साजरा होतो, एवढाच तो विषय.

--------

शेख चिल्ली आणि कालिदास

झाडाची जी फांदी कापायची, त्याच फांदीवर तो कुऱ्हाड घेऊन बसला... अशी महामुर्खपणाची दंतकथा आहे. बऱ्याच काळापासून ही कथा महामुर्खपणाचे उदाहरण देण्यासाठी शेख चिल्लीच्या नावाचा वापर केला जात होता. अनेकांच्या अभ्यासातून ही कथा कालिदासाच्या संदर्भातीलच असल्याचे स्पष्ट होते. मात्र, कालिदास म्हणजे मुर्ख हा मुळात मुर्ख नसतो तर तो आपल्या महत्तम प्रयासाने विद्वान होऊ शकतो, ही प्रेरक कथा कधीच अस्तित्त्वात आली नाही. हा दोष कुणाचा?

------------

बाळकडूचे विस्मरण

स्वत्त्वाची जाणीव बळकट करण्यासाठी लहानपणीच बाळकडू देण्याची परंपरा सर्वदेशात, संस्कृतीत आढळून येते. भारतात मात्र, त्या बाळकडूचे विस्मरण झालेले दिसते. त्यामुळेच, कालिदास, भवभूती, अश्वघोष, भास आदी अनेक प्रज्ञावंतांचे हळूहळू विस्मरण झाले. त्याचा परिणाम वयात येईपर्यंत जेव्हा कानावर कालिदास किंवा अन्य कुणाचेही नाव आले तर हा कोण? असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडतो. मोठमोठी काव्यपदे, नाटके हा शालेय अभ्यासाचा विषय नक्कीच नाही. मात्र, या विभूतींसंदर्भातील कथा, दंतकथा आदी शिकविण्यात आल्यास मुले मोठी होईपर्यंत स्वत्त्वाची जाणीव बळकट होईल.

- अजेय गंपावार, मुलाखतकार

----------------

कालिदास केवळ स्मरणापुरताच

कालिदास म्हणा वा अश्वघोष किंवा अन्य कोणतेही प्राचित साहित्यिक आता केवळ नावापुरतेच उरलेले आहेत. काही मोजके लोक त्यांचे स्मरण करतात आणि कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, त्यापुढे जाऊन तो कोण, त्याचे कार्य कोणते, वैशिष्ट्ये कोणती आदींची चर्चा घडतच नाही. माझ्या काही विद्यार्थिनींनी कालिदास हा विषय पीएचडीसाठी घेतला. मात्र, त्यापलीकडे जाऊन कालिदासाच्या कल्पना विशेष का आहेत, त्यातून मिळणाऱ्या प्रेरणा कोणत्या, कलासक्ती काय... यावर कोणीच बोलत नाहीत.

- डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी, संस्कृत विद्वान

................